शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
2
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
3
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
5
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
6
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
7
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
8
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
9
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
10
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
11
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
12
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
13
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
14
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
15
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
16
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
17
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
18
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
19
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
20
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या १४ पुलांच्या कामातील अडसर दूर, मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:41 IST

मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणात येणाऱ्या १४ जुन्या पुलांच्या कामातील अडसर आता दूर झाला आहे. अनेक अडथळ्यांशी शर्यत करीत चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, महामार्गावरील ब्रिटीशकालीन पुलांची नव्याने उभारणी करणे आवश्यक असताना या पुलांची कामे आधीच्या ठेकेदारांनी अर्धवट सोडली होती.

ठळक मुद्देजुन्या १४ पुलांच्या कामातील अडसर दूर, मुंबई -गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरूचौपदरीकरण ठेकेदारांकडेच पुलांचे काम सोपवले, संयुक्त पाहणीनंतर कामाला सुरुवात

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणात येणाऱ्या १४ जुन्या पुलांच्या कामातील अडसर आता दूर झाला आहे. अनेक अडथळ्यांशी शर्यत करीत चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, महामार्गावरील ब्रिटीशकालीन पुलांची नव्याने उभारणी करणे आवश्यक असताना या पुलांची कामे आधीच्या ठेकेदारांनी अर्धवट सोडली होती. त्यामुळे आता चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडेच ही कामे वर्ग करण्यात आली आहेत. मात्र, जुने ठेकेदार व चौपदरीकरणाचे काम करणारे ठेकेदार हे संयुक्तरित्या या पुलांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर तातडीने पूल उभारणीच्या कामाला सुरूवात होणार आहे.मुंबई-गोवा महामार्गाचे कॉँक्रिटीकरणातून चौपदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण भागात चौपदरीकरणाचे काम वेगात आहे तर रत्नागिरीच्या दोन टप्प्यांमध्ये रखडलेले चौपदरीकरणाचे काम आता सुरू झाले आहे. मात्र, अन्य टप्प्यांच्या तुलनेत हे काम खूपच मागे आहे. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार, याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहे.

मोदी सरकारच्या काळात चौपदरीकरणाच्या कामाला वेग देण्यात आला. आता पुन्हा एकदा मोदी सरकारच केंद्रात सत्तेवर आले आहे. त्यामुळे चौपदरीकरणाचे हे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.पुलांच्या कामातील अडसर दूर झाला असला तरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना भराव नुसताच ओढून ठेवण्यात आला आहे. रत्नागिरी ते आरवली या मार्गावर रस्त्याचे रुंदीकरण करताना भराव, कटींग्जची माती ही त्याचठिकाणी रस्त्यावर दाबून ठेवण्यात आली आहे. मात्र, पावसात ही माती पुन्हा रस्त्यावर पसरण्याचा धोका आहे.पावसाळ्यातील धोका कायममहामार्गावरील १४ पुलांचे काम पूर्णत्वासाठी चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडेच सोपविण्यात आले आहे. मात्र, अद्यापही पुलांचे काम अपूर्ण आहे. जुन्या ब्रिटीशकालीन पुलांचे आयुष्य संपलेले असल्याने व नवीन पुलांचे काम पूर्ण झालेले नसल्याने जुन्या पुलांचा पावसाळ्यातील धोका कायम आहे.निविदांना अल्प प्रतिसादपुलांचे बांधकाम मूळ ठेकेदारांनी सोडल्यानंतर महामार्ग विभागाने पुलांच्या कामासाठी दोनवेळा निविदाही काढल्या. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुलांच्या पूर्णत्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्यानंतर चौपदरीकरण काम करणाऱ्या ठेकेदारांकडेच पुलांचे काम वर्ग करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे काम आता त्या ठेकेदारांकडे सोपविण्यात आले आहे. परिणामी पुलांच्या कामातील अडसर दूर झाला आहे.कामांची विभागणीचौपदरीकरणाचे काम लवकर व्हावे, यासाठी हे काम वेगळ्या ठेकेदारांकडे तर मार्गावरील जुन्या पुलांच्या उभारणीचे काम अन्य ठेकेदार कंपन्यांकडे सोपविण्यात आले होते. परंतु, पुलांचे काम घेतलेल्या संबंधित ठेकेदार कंपन्यांनी उपठेकेदार नियुक्त केले. त्यांनी पुलांची कामेही सुरू केली. मात्र, उपठेकेदारांना वेळेत कामाचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी पुलाचे पुढील काम करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून पुलांचे काम अर्धवट स्थितीत आहे.अर्धवट काम सोडलेमुळातच चौपदरीकरण काम रडत-रखडत सुरू असताना ब्रिटीशकालीन पुलांचे काम ठेकेदारांनी अर्धवट स्थितीत सोडल्याने चौपदरीकरणाच्या कामात मोठा अडसर निर्माण झाला होता. मूळ ठेकेदारांनी हे काम करण्यास नकार दिल्यानंतर पुलांचे उर्वरित काम सध्या चौपदरीकरणाचे काम करणाºया ठेकेदारांकडे सोपवावे, अशी भूमिका मांडण्यात आली होती. परंतु, त्याचा पाठपुरावा झाला नाही.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागRatnagiriरत्नागिरी