शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
4
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
5
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
6
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
7
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
8
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
9
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
10
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
11
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
13
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
14
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
15
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
16
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
18
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
19
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
20
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा

जुन्या १४ पुलांच्या कामातील अडसर दूर, मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:41 IST

मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणात येणाऱ्या १४ जुन्या पुलांच्या कामातील अडसर आता दूर झाला आहे. अनेक अडथळ्यांशी शर्यत करीत चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, महामार्गावरील ब्रिटीशकालीन पुलांची नव्याने उभारणी करणे आवश्यक असताना या पुलांची कामे आधीच्या ठेकेदारांनी अर्धवट सोडली होती.

ठळक मुद्देजुन्या १४ पुलांच्या कामातील अडसर दूर, मुंबई -गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरूचौपदरीकरण ठेकेदारांकडेच पुलांचे काम सोपवले, संयुक्त पाहणीनंतर कामाला सुरुवात

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणात येणाऱ्या १४ जुन्या पुलांच्या कामातील अडसर आता दूर झाला आहे. अनेक अडथळ्यांशी शर्यत करीत चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, महामार्गावरील ब्रिटीशकालीन पुलांची नव्याने उभारणी करणे आवश्यक असताना या पुलांची कामे आधीच्या ठेकेदारांनी अर्धवट सोडली होती. त्यामुळे आता चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडेच ही कामे वर्ग करण्यात आली आहेत. मात्र, जुने ठेकेदार व चौपदरीकरणाचे काम करणारे ठेकेदार हे संयुक्तरित्या या पुलांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर तातडीने पूल उभारणीच्या कामाला सुरूवात होणार आहे.मुंबई-गोवा महामार्गाचे कॉँक्रिटीकरणातून चौपदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण भागात चौपदरीकरणाचे काम वेगात आहे तर रत्नागिरीच्या दोन टप्प्यांमध्ये रखडलेले चौपदरीकरणाचे काम आता सुरू झाले आहे. मात्र, अन्य टप्प्यांच्या तुलनेत हे काम खूपच मागे आहे. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार, याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहे.

मोदी सरकारच्या काळात चौपदरीकरणाच्या कामाला वेग देण्यात आला. आता पुन्हा एकदा मोदी सरकारच केंद्रात सत्तेवर आले आहे. त्यामुळे चौपदरीकरणाचे हे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.पुलांच्या कामातील अडसर दूर झाला असला तरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना भराव नुसताच ओढून ठेवण्यात आला आहे. रत्नागिरी ते आरवली या मार्गावर रस्त्याचे रुंदीकरण करताना भराव, कटींग्जची माती ही त्याचठिकाणी रस्त्यावर दाबून ठेवण्यात आली आहे. मात्र, पावसात ही माती पुन्हा रस्त्यावर पसरण्याचा धोका आहे.पावसाळ्यातील धोका कायममहामार्गावरील १४ पुलांचे काम पूर्णत्वासाठी चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडेच सोपविण्यात आले आहे. मात्र, अद्यापही पुलांचे काम अपूर्ण आहे. जुन्या ब्रिटीशकालीन पुलांचे आयुष्य संपलेले असल्याने व नवीन पुलांचे काम पूर्ण झालेले नसल्याने जुन्या पुलांचा पावसाळ्यातील धोका कायम आहे.निविदांना अल्प प्रतिसादपुलांचे बांधकाम मूळ ठेकेदारांनी सोडल्यानंतर महामार्ग विभागाने पुलांच्या कामासाठी दोनवेळा निविदाही काढल्या. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुलांच्या पूर्णत्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्यानंतर चौपदरीकरण काम करणाऱ्या ठेकेदारांकडेच पुलांचे काम वर्ग करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे काम आता त्या ठेकेदारांकडे सोपविण्यात आले आहे. परिणामी पुलांच्या कामातील अडसर दूर झाला आहे.कामांची विभागणीचौपदरीकरणाचे काम लवकर व्हावे, यासाठी हे काम वेगळ्या ठेकेदारांकडे तर मार्गावरील जुन्या पुलांच्या उभारणीचे काम अन्य ठेकेदार कंपन्यांकडे सोपविण्यात आले होते. परंतु, पुलांचे काम घेतलेल्या संबंधित ठेकेदार कंपन्यांनी उपठेकेदार नियुक्त केले. त्यांनी पुलांची कामेही सुरू केली. मात्र, उपठेकेदारांना वेळेत कामाचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी पुलाचे पुढील काम करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून पुलांचे काम अर्धवट स्थितीत आहे.अर्धवट काम सोडलेमुळातच चौपदरीकरण काम रडत-रखडत सुरू असताना ब्रिटीशकालीन पुलांचे काम ठेकेदारांनी अर्धवट स्थितीत सोडल्याने चौपदरीकरणाच्या कामात मोठा अडसर निर्माण झाला होता. मूळ ठेकेदारांनी हे काम करण्यास नकार दिल्यानंतर पुलांचे उर्वरित काम सध्या चौपदरीकरणाचे काम करणाºया ठेकेदारांकडे सोपवावे, अशी भूमिका मांडण्यात आली होती. परंतु, त्याचा पाठपुरावा झाला नाही.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागRatnagiriरत्नागिरी