शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात रत्नागिरीत १६ व्यक्ती आल्या इंग्लंडमधून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 16:27 IST

CoronaVirus Ratnagiri-ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या रूपामुळे जिल्हा प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात १६ परदेशी व्यक्ती आल्या आहेत. यापैकी १५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एका व्यक्तीचा अहवाल अजून येणे बाकी आहे.

ठळक मुद्देमहिनाभरात रत्नागिरीत १६ व्यक्ती आल्या इंग्लंडमधून१५ जणांच्या स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह, एकाचा अहवाल अद्याप बाकी

शोभना कांबळेरत्नागिरी : ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या रूपामुळे जिल्हा प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात १६ परदेशी व्यक्ती आल्या आहेत. यापैकी १५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एका व्यक्तीचा अहवाल अजून येणे बाकी आहे.कोरोनाचे संकट कमी होते न होते तोच इंग्लंडमधील या नव्या विषाणूने पुन्हा आव्हान निर्माण केले असून, जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आलेल्या परदेशी व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले.

२५ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत १६ व्यक्ती इंग्लंडमधून आल्या आहेत. या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करून स्वॅब घेण्यात आले होते. त्यांपैकी १५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या सर्वांचे २८ दिवस निरीक्षण करण्यात येणार आहे.एप्रिलपासून विदेशातून एकूण कितीजण आले?एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ९३० विदेशी आले. कोरोनाच्या काळात ग्रामकृती दलाच्या माध्यमातून अशा व्यक्तींची माहिती घेतली जात होती. त्याचप्रमाणे परदेशांतून येणाऱ्या व्यक्तींचे तातडीने संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत होते. त्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जात.विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?विदेशातून येणाऱ्यांची यादी देशाकडून राज्यांना पाठविली जात आहे. राज्यांकडून या व्यक्ती ज्या जिल्ह्यात जाणार आहेत, त्या जिल्ह्यांकडे यादी पाठविली जाते. त्यानंतर या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवून त्यांचे स्राव तपासणीसाठी पाठविले जात आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहितीही आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे.

 

आरोग्य विभाग सतर्कजिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची माहिती घेतली जात असून, त्यांना तातडीने संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात आहे. त्याचबरोबर त्यांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १६ व्यक्ती परदेशातून आल्या आहेत. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेणे सुरु आहे. मात्र, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.- डॉ. बबिता कमलापूरकर, आरोग्य अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी