शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

महिनाभरात रत्नागिरीत १६ व्यक्ती आल्या इंग्लंडमधून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 16:27 IST

CoronaVirus Ratnagiri-ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या रूपामुळे जिल्हा प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात १६ परदेशी व्यक्ती आल्या आहेत. यापैकी १५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एका व्यक्तीचा अहवाल अजून येणे बाकी आहे.

ठळक मुद्देमहिनाभरात रत्नागिरीत १६ व्यक्ती आल्या इंग्लंडमधून१५ जणांच्या स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह, एकाचा अहवाल अद्याप बाकी

शोभना कांबळेरत्नागिरी : ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या रूपामुळे जिल्हा प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात १६ परदेशी व्यक्ती आल्या आहेत. यापैकी १५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एका व्यक्तीचा अहवाल अजून येणे बाकी आहे.कोरोनाचे संकट कमी होते न होते तोच इंग्लंडमधील या नव्या विषाणूने पुन्हा आव्हान निर्माण केले असून, जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आलेल्या परदेशी व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले.

२५ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत १६ व्यक्ती इंग्लंडमधून आल्या आहेत. या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करून स्वॅब घेण्यात आले होते. त्यांपैकी १५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या सर्वांचे २८ दिवस निरीक्षण करण्यात येणार आहे.एप्रिलपासून विदेशातून एकूण कितीजण आले?एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ९३० विदेशी आले. कोरोनाच्या काळात ग्रामकृती दलाच्या माध्यमातून अशा व्यक्तींची माहिती घेतली जात होती. त्याचप्रमाणे परदेशांतून येणाऱ्या व्यक्तींचे तातडीने संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत होते. त्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जात.विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?विदेशातून येणाऱ्यांची यादी देशाकडून राज्यांना पाठविली जात आहे. राज्यांकडून या व्यक्ती ज्या जिल्ह्यात जाणार आहेत, त्या जिल्ह्यांकडे यादी पाठविली जाते. त्यानंतर या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवून त्यांचे स्राव तपासणीसाठी पाठविले जात आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहितीही आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे.

 

आरोग्य विभाग सतर्कजिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची माहिती घेतली जात असून, त्यांना तातडीने संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात आहे. त्याचबरोबर त्यांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १६ व्यक्ती परदेशातून आल्या आहेत. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेणे सुरु आहे. मात्र, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.- डॉ. बबिता कमलापूरकर, आरोग्य अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी