शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

‘पाचांबे’ला ग्रामपंचायत मिळेल का?

By admin | Updated: April 29, 2016 00:36 IST

ग्रामस्थांचा सवाल : सोयीसुविधांसह विकासाचाही खोळंबा

रवींद्र कोकाटे -- सावर्डे --चिपळूण तालुक्यातील खेरशेत पुनर्वसित पाचांबे वसाहतीचा विकास ग्रामपंचायतीच्या अभावामुळे रखडला आहे. ग्रामपंचायत नसल्याने शासनाकडून निधी मिळण्यात अडचण येत आहे. त्यामुळे गावाचा विकास रखडला आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी ग्रामपंचायतीकडून लागणारे दाखले आम्हाला मिळत नाहीत. त्या कामात वारंवार अडथळा निर्माण होतो, मुलांच्या शिक्षणापासून कामधंद्यातही अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. सन १९८७मध्ये धरणग्रस्त म्हणून शिक्का बसलेली गावे राजीवली, पाचांबे, कुटगिरी, कोंडभैरव, रातांबे या पाच गावांचे आरवली, खेरशेत, नांदगाव, आंबतखोल याठिकाणी स्थलांतर करण्यात आले. त्यापैकी खेरशेत हे गाव सध्या शासनाच्या विविध सोयींपासून वंचित आहे. त्यावेळेस धरणासाठी लागणाऱ्या आमच्या जमिनी शासनाने घेतल्याच; पण कोणत्याही प्रकारची एकही नोटीस न देता आम्हाला तत्काळ स्थलांतरित केले. धरणग्रस्त झालेल्या जमीनमालकांना एका गुंठ्याला १९० रुपये याप्रमाणे पैसे दिले. धरणग्रस्त झालेल्या जमीनमालकाना आश्वासन दिले की, प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तिला सरकारी नोकरी देण्यात येईल, ते आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. वाढत्या कुटुंबासाठी आम्हाला वाढीव भूखंड मिळावे. शासनाने आम्हाला घरापुरतीच जागा दिली. आता शेती नाही आणि नोकरीही नाही. मग धरणामध्ये गेलेली जमीन वगळून उर्वरित जमीन आम्हाला परत द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. त्या जमिनी विकायला गेल्यावर आम्हाला विचारल्याशिवाय विकायची नाही, अशी अधिकारी दमदाटी अधिकारी करत आहेत. मग आम्ही करायचे काय? असा प्रश्न खेरशेत पुनर्वसित ग्रामस्थांना पडला आहे. आम्हाला दिलेला सातबारा स्वतंत्र नसून, त्यावर महाराष्ट्र शासन सातबारा असे लिहिले जाते. शासनाने निवडून दिलेल्या डोंगराळ भागात आम्ही राहतोय. पण, कंत्राटी ठेकेदारामुळे अनेक सुविधांना आम्हाला मुकावे लागते. येथील पाण्याची अवस्था फार बिकट आहे. पाण्यासाठी ठेकेदाराने खोदलेल्या विहिरी कचऱ्याच्या खड्ड्याप्रमाणे खोदल्या आहेत. त्याला बांधकाम सर्वेक्षण व बांधकाम घेराही नाही. त्यानंतर कार्यरत केलेल्या नळपाणी योजनेची विहीर आरवली येथे, तर टाकी असुर्डेत आहे. तिथून अंतर लांब असल्याने पाणी खूप कमी प्रमाणात येते. शिवाय ठेकेदाराने वीजबिल न भरल्याने ती योजना खंडीत झाली आहे. त्यामुळे तेथील कुटुंबातील व्यक्तिंना पाणी पाणी करावे लागत आहे. शासनाने ठरवलेल्या कंत्राटी ठेकेदाराने पाच कुटुंब मिळून एक शौचालय बांधून दिले. त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने सध्या पाण्याअभावी येथील लोकांचे हाल होत आहेत. निवडलेल्या डोंगराळ भागात एकाखाली एक बांधकाम करण्यात आले. त्यावेळी प्रत्येक ठिकाणी संरक्षक भिंंती बांधण्यात आल्या. बांधकाम व्यवस्थितपणे न केल्याने त्या संरक्षक भिंंती कोसळून पडण्याची वेळ आली, तरी शासन दुर्लक्ष करत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना वारवार निवेदने देण्यात आली. महावितरणने उभारलेला लोखंडी पोल व त्यावर बसविण्यात आलेली डीपी उघडी असून, त्यामुळे जीवितास धक्का पोहोचला तर जबाबदार कोण? असा सवाल करण्यात येत आहे.कुटुंबाची अवस्था बिकट : जीवनावश्यक वस्तूंचीही मोतादसध्या येथे स्थलांतरित असलेल्या ८० कुटुंबातील ७५० लोकसंख्या असलेल्या वसाहतीची अवस्था फारच बिकट आहे. शासनाने त्यांना कोणत्याही सुविधा अजूनही उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. त्यांना किमान जीवनावश्यक गोष्टीही उपलब्ध होत नाहीत, अशा स्थितीत राहायचं कसं? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.