शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:38 IST

Political, shivsena, ncp, ratnagirinews राज्यातील सरकार बनवताना वापरलेल्या सुत्राप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही महाविकास आघाडी सामोरी जाणार का, असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठी असल्याने ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेणार का, हाही प्रश्न कार्यकर्ते करत आहेत.

ठळक मुद्देस्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होणार?कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेते एकत्र येणार का?

मनोज मुळ्येरत्नागिरी : राज्यातील सरकार बनवताना वापरलेल्या सुत्राप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही महाविकास आघाडी सामोरी जाणार का, असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठी असल्याने ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेणार का, हाही प्रश्न कार्यकर्ते करत आहेत.भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडी केली. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी हा पॅटर्न वापरला जाण्याची अपेक्षा केली जात आहे. त्यानंतर अजून कोणत्याही निवडणुका झालेल्या नाहीत. त्यातही चिपळूण नगर परिषदेत भाजपच्या नगराध्यक्षांना पदावरून खाली आणण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडी बनवली आहे. त्याखेरीज अजून हे तीन पक्ष कोठेही एकत्र आलेले नाहीत.कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता मोठ्या प्रमाणात होत आहेत. पुढील आठवड्यात सरपंच आरक्षणाची सोडत निघणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की नाही, हीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाविकास आघाडीची अपेक्षा आहे. मात्र, शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष असल्याने शिवसेनेत मात्र अजून त्याबाबत कोणतीही चर्चा नाही. शिवसेनेची ताकद मोठी असल्याने होणाऱ्या निवडणुकांमध्ये वाटेकरी नकोत, असा एक मतप्रवाह असून, राज्य सरकारमध्ये सोबत असल्याने जिल्ह्यातही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घ्यावे, असे मत काही कार्यकर्ते मांडत आहेत. आता नेते एकत्र येऊन यातून काही तोडगा काढतात का, असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात उभा राहिला आहे.चिपळूण पंचायत समितीत महाविकास आघाडीचिपळूण पंचायत समितीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पक्षीय बलाबल सारखे आहे. येथेही महाविकास आघाडी करून पदांचे वाटप करण्यात आले आहे. सध्या कार्यरत असलेल्या सभापती, उपसभापतींची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे. त्यांना मुदतवाढ द्यावी की नवी चेहऱ्यांना संधी द्यावी, याचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते रत्नागिरीतील बैठकीत घेतील, असे खासदार विनायक राऊत यांनी याआधीच जाहीर केले आहे. हाच पॅटर्न इतरत्र राबवला जाणार आहे का, याची उत्सुकता कायम आहे.जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला वाटा नाहीराज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषदेत शिवसेनेकडून राष्ट्रवादीला त्यात सामावून घेतली जाण्याची अपेक्षा केली जात होती. मात्र तसे कोणतेच बदल झाले नाहीत. ग्रामपंचायत निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे आता नेत्यांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा कार्यकर्ते करत आहेत.

 

शिवसेना आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी करण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी होणे आवश्यक आहे. त्याबाबत पक्षाचे नेते, खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम निर्णय घेतील. महाआघाडीसाठी कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे आहे.- बाबाजी जाधव, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसRatnagiriरत्नागिरी