शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आठवीचे वर्गच संकटात येणार? गुहागरातील दहा शाळांमध्ये पाचची पटसंख्या

By admin | Updated: June 22, 2015 00:23 IST

जिल्हा परिषद : पटसंख्याच कमी असल्याने भीती

रत्नागिरी : पटसंख्येच्या अभावी जिल्ह्यातील ५० आठवीचे वर्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. गतवर्षी चौथीच्या शाळांना पाचवी व सातवीच्या शाळांना आठवीचे वर्ग जोडण्यात आले होते. प्राथमिक शाळांना २३० आठवीचे वर्ग जोडले गेले होते. मात्र हायस्कूलकडे असलेला विद्यार्थ्यांचा ओढा लक्षात घेता ५० वर्गाला याचा फटका बसला आहे.शासनाकडून मोठा गाजावाजा करुन प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय अंमलबजावणीही जिल्ह्यात करण्यात आली. पदवीधर शिक्षकांअभावी पहिले वर्ष रडत खडत पूर्ण करण्यात आले. मात्र यावर्षी आठवीच्या वर्गाला फटका बसला आहे.गतवर्षी २३० आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले. त्यापैकी यावर्षी ५० वर्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरु असलेल्या आठवीच्या वर्गात पाल्याला न घालण्याचा पालकांचा कल लक्षात घेता भविष्यात अन्य वर्गांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.ज्या प्राथमिक शाळांमध्ये आठवीचे वर्ग जोडण्यात आले आहेत त्या ठिकाणी सर्व शैक्षणिक सोईसुविधा, पदवीधर शिक्षक असणे गरजेचे आहे. मात्र शैक्षणिक सोईसुविधा तसेच प्रयोगशाळा यांचा अभाव दिसून येत आहे. जिल्हा परिषदेकडून या सुविधा पुरविल्या न गेल्याने विद्यार्थ्यांची परवड झाली आहे.समाजातील सर्व घटकांना शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्याच्या अनुषंगाने बालकांचा सक्तीचा व मोफत कायदा शासनाने सुरु केला. अंमलबजावणीदेखील सुरु करण्यात आली. मात्र संबंधित अंमलबजावणी करीत असताना काही शाळांना पटसंख्येचा फटका बसला आहे. सुरवातीला विद्यार्थी व पालकांकडून आठवीच्या वर्गाला प्रतिसाद मिळाला. मात्र वर्षभरामध्ये विविध समस्यांना सामोरे जावे लागल्याने विद्यार्थ्यांनी या वर्गाकडे पाठ फिरविली आहे. भविष्यात अन्य आठवीच्या वर्गांनादेखील याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील वर्षी आता या सर्व गोष्टींचा त्रास विद्यार्थ्यांना होणार आहे. जिल्हापरिषद मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची संख्या कमी असून या सर्व पार्श्वभूमिवर आठवीच्या ५० वर्गावर बंंंद पडण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती बदलणार कधी असा प्रश्न विचारला ्जात आहे. (प्रतिनिधी)पटसंख्येचा प्रश्न गंभीरशासनाकडून पूर्व प्राथमिक शाळांना पाचवीचे वर्ग जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.आठवीच्या वर्गाची अवस्था गंभीर आहे. प्राथमिक शाळांना २३० वर्ग जोडले गेले मात्र त्यापैकी ५० वर्ग बंद होण्याच्या स्थितीत आहेत. आठवीचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणीही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली . मात्र या सर्वाची परिणती वर्ग बंद होण्यात झाली आहे. आता पुढे काय होणार हा प्रश्न आहे. गुहागरातील दहा शाळांमध्ये पाचची पटसंख्याअसगोली : गुहागर तालुक्यातील दहा शाळांमध्ये पाच विद्यार्थी आहेत. दुर्गम भागातील या शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या शाळांमधील पट कमी होत असल्याने या शाळा अन्य शाळांमध्ये विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गुहागर तालुक्यातील १० शाळांमध्ये पाच पट असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या मुलाला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून पालक शहरांकडे धाव घेत आहेत.गुहागर तालुक्यातील १ ली ते ४ थीच्या १० शाळांमध्ये यावर्षी पटसंख्या ४ ते ५ वर आली आहे. यामध्ये मासू शाळा क्र. ३ मध्ये ५ मुले व २ शिक्षक, पेवे आमशेतभाई येथे ४ मुले व २ शिक्षक, पेवे गुरवकोंड येथे २ मुले व १ शिक्षक, वेलदूर उर्दूमध्ये ५ मुले व २ शिक्षक, झोंबडी शाळा क्र. २ मध्ये ५ मुले व २ शिक्षक, पोमेंडी आडीमध्ये ५ मुले व २ शिक्षक, उमराठ शाळा क्र. २ मध्ये २ मुले २ शिक्षक, पाली शाळा क्र. २ मध्ये ५ मुले व २ शिक्षक, कुटगिरी शाळा क्र. २ मध्ये ५ मुले व २ शिक्षक, तर सुरळ उर्दू शाळेमध्ये ५ मुले व २ शिक्षक अशी स्थिती आहे. येथील कमी पटसंख्या असली तरी येथील विद्यार्थ्यांसाठी या शाळा महत्वाच्या ठरल्या आहेत. (वार्ताहर)