शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

आंबा पिकाचे अर्थकारण बिघडणार?, बदलत्या हवामानाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 12:58 IST

Winter Mango Ratnagiri- गेले चार दिवस कडकडीत पडलेली थंडी पुन्हा गायब झाली आहे. कोकणच्या अर्थकारणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या आंबा पिकाचा हंगाम थंडीअभावी लांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते. मात्र, डिसेंबर संपत आला तरी अधूनमधून थंडी गायब असल्याने आंबा कलमांची मोहोर प्रक्रिया तुरळक स्वरुपात सुरु झाली आहे.

ठळक मुद्देआंबा पिकाचे अर्थकारण बिघडणार?, बदलत्या हवामानाचा परिणामपुन्हा थंडी गायब झाल्याने बागायतदार धास्तावले, मोहोराची प्रक्रिया लांबली

रत्नागिरी : गेले चार दिवस कडकडीत पडलेली थंडी पुन्हा गायब झाली आहे. कोकणच्या अर्थकारणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या आंबा पिकाचा हंगाम थंडीअभावी लांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते. मात्र, डिसेंबर संपत आला तरी अधूनमधून थंडी गायब असल्याने आंबा कलमांची मोहोर प्रक्रिया तुरळक स्वरुपात सुरु झाली आहे.थंडीऐवजी वारंवार ढगाळ वातावरण त्यातच अवकाळी पावसाची हजेरी राहिली आहे. जमिनीतील ओलाव्यामुळे ८० टक्के कलमांना पालवी आली. उर्वरित २० टक्के कलमे मोहोरण्याची प्रतीक्षा असताना केवळ ५ ते १० टक्के इतकाच मोहोर झाला आहे. शिवाय मतलई वारेही नसल्याने मोहोर प्रक्रिया सुरु झालेली नाही. पालवी नसलेल्या झाडांना नोव्हेंबर महिन्यात येणारा मोहोर डिसेंबरच्या सुरुवातीला आल्याने मोहोराची प्रक्रिया लांबली आहे.गेले काही दिवस कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २५ अंश सेल्सिअस इतके राहिले आहे. १८ ते २० अंश सेल्सिअस इतके तापमान खाली आल्यास ते हवामान आंब्याला पोषक ठरते. थंडी गायब असून, हवामानातील आर्द्रता वाढली आहे. थंडीऐवजी उकाडा होत आहे. असे वातावरण कीड रोगासाठी पोषक ठरत आहे.मोहोर येणार कधी?रात्री थंडी व दुपारी उष्मा यामुळे झाडांवर ताण येऊन मोहोर प्रक्रिया सुरु होते. ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत हिवाळा ऋतू असल्याने मकर संक्रांतीनंतर हवामानात बदल होत जातो. हिवाळ्यातील शेवटचा महिना शिल्लक राहिल्याने थंडी पडणार कधी व मोहोर येणार कधी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

ढगाळ वातारणामुळे कीड, बुरशीजन्य रोगाचा परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना पालवीचे संरक्षण करावे लागत आहे. पालवी जून होण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी तुडतुडा व खार यांचा प्रादुर्भाव सुरू आहे. यावर्षीचा आंबा हंगाम लांबणीवर गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटणार आहे.- टी. एस. घवाळीबागायतदार, रत्नागिरी

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन