शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

आंबा पिकाचे अर्थकारण बिघडणार?, बदलत्या हवामानाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 12:58 IST

Winter Mango Ratnagiri- गेले चार दिवस कडकडीत पडलेली थंडी पुन्हा गायब झाली आहे. कोकणच्या अर्थकारणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या आंबा पिकाचा हंगाम थंडीअभावी लांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते. मात्र, डिसेंबर संपत आला तरी अधूनमधून थंडी गायब असल्याने आंबा कलमांची मोहोर प्रक्रिया तुरळक स्वरुपात सुरु झाली आहे.

ठळक मुद्देआंबा पिकाचे अर्थकारण बिघडणार?, बदलत्या हवामानाचा परिणामपुन्हा थंडी गायब झाल्याने बागायतदार धास्तावले, मोहोराची प्रक्रिया लांबली

रत्नागिरी : गेले चार दिवस कडकडीत पडलेली थंडी पुन्हा गायब झाली आहे. कोकणच्या अर्थकारणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या आंबा पिकाचा हंगाम थंडीअभावी लांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते. मात्र, डिसेंबर संपत आला तरी अधूनमधून थंडी गायब असल्याने आंबा कलमांची मोहोर प्रक्रिया तुरळक स्वरुपात सुरु झाली आहे.थंडीऐवजी वारंवार ढगाळ वातावरण त्यातच अवकाळी पावसाची हजेरी राहिली आहे. जमिनीतील ओलाव्यामुळे ८० टक्के कलमांना पालवी आली. उर्वरित २० टक्के कलमे मोहोरण्याची प्रतीक्षा असताना केवळ ५ ते १० टक्के इतकाच मोहोर झाला आहे. शिवाय मतलई वारेही नसल्याने मोहोर प्रक्रिया सुरु झालेली नाही. पालवी नसलेल्या झाडांना नोव्हेंबर महिन्यात येणारा मोहोर डिसेंबरच्या सुरुवातीला आल्याने मोहोराची प्रक्रिया लांबली आहे.गेले काही दिवस कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २५ अंश सेल्सिअस इतके राहिले आहे. १८ ते २० अंश सेल्सिअस इतके तापमान खाली आल्यास ते हवामान आंब्याला पोषक ठरते. थंडी गायब असून, हवामानातील आर्द्रता वाढली आहे. थंडीऐवजी उकाडा होत आहे. असे वातावरण कीड रोगासाठी पोषक ठरत आहे.मोहोर येणार कधी?रात्री थंडी व दुपारी उष्मा यामुळे झाडांवर ताण येऊन मोहोर प्रक्रिया सुरु होते. ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत हिवाळा ऋतू असल्याने मकर संक्रांतीनंतर हवामानात बदल होत जातो. हिवाळ्यातील शेवटचा महिना शिल्लक राहिल्याने थंडी पडणार कधी व मोहोर येणार कधी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

ढगाळ वातारणामुळे कीड, बुरशीजन्य रोगाचा परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना पालवीचे संरक्षण करावे लागत आहे. पालवी जून होण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी तुडतुडा व खार यांचा प्रादुर्भाव सुरू आहे. यावर्षीचा आंबा हंगाम लांबणीवर गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटणार आहे.- टी. एस. घवाळीबागायतदार, रत्नागिरी

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन