शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

आंबा पिकाचे अर्थकारण बिघडणार?, बदलत्या हवामानाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 12:58 IST

Winter Mango Ratnagiri- गेले चार दिवस कडकडीत पडलेली थंडी पुन्हा गायब झाली आहे. कोकणच्या अर्थकारणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या आंबा पिकाचा हंगाम थंडीअभावी लांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते. मात्र, डिसेंबर संपत आला तरी अधूनमधून थंडी गायब असल्याने आंबा कलमांची मोहोर प्रक्रिया तुरळक स्वरुपात सुरु झाली आहे.

ठळक मुद्देआंबा पिकाचे अर्थकारण बिघडणार?, बदलत्या हवामानाचा परिणामपुन्हा थंडी गायब झाल्याने बागायतदार धास्तावले, मोहोराची प्रक्रिया लांबली

रत्नागिरी : गेले चार दिवस कडकडीत पडलेली थंडी पुन्हा गायब झाली आहे. कोकणच्या अर्थकारणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या आंबा पिकाचा हंगाम थंडीअभावी लांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते. मात्र, डिसेंबर संपत आला तरी अधूनमधून थंडी गायब असल्याने आंबा कलमांची मोहोर प्रक्रिया तुरळक स्वरुपात सुरु झाली आहे.थंडीऐवजी वारंवार ढगाळ वातावरण त्यातच अवकाळी पावसाची हजेरी राहिली आहे. जमिनीतील ओलाव्यामुळे ८० टक्के कलमांना पालवी आली. उर्वरित २० टक्के कलमे मोहोरण्याची प्रतीक्षा असताना केवळ ५ ते १० टक्के इतकाच मोहोर झाला आहे. शिवाय मतलई वारेही नसल्याने मोहोर प्रक्रिया सुरु झालेली नाही. पालवी नसलेल्या झाडांना नोव्हेंबर महिन्यात येणारा मोहोर डिसेंबरच्या सुरुवातीला आल्याने मोहोराची प्रक्रिया लांबली आहे.गेले काही दिवस कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २५ अंश सेल्सिअस इतके राहिले आहे. १८ ते २० अंश सेल्सिअस इतके तापमान खाली आल्यास ते हवामान आंब्याला पोषक ठरते. थंडी गायब असून, हवामानातील आर्द्रता वाढली आहे. थंडीऐवजी उकाडा होत आहे. असे वातावरण कीड रोगासाठी पोषक ठरत आहे.मोहोर येणार कधी?रात्री थंडी व दुपारी उष्मा यामुळे झाडांवर ताण येऊन मोहोर प्रक्रिया सुरु होते. ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत हिवाळा ऋतू असल्याने मकर संक्रांतीनंतर हवामानात बदल होत जातो. हिवाळ्यातील शेवटचा महिना शिल्लक राहिल्याने थंडी पडणार कधी व मोहोर येणार कधी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

ढगाळ वातारणामुळे कीड, बुरशीजन्य रोगाचा परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना पालवीचे संरक्षण करावे लागत आहे. पालवी जून होण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी तुडतुडा व खार यांचा प्रादुर्भाव सुरू आहे. यावर्षीचा आंबा हंगाम लांबणीवर गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटणार आहे.- टी. एस. घवाळीबागायतदार, रत्नागिरी

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन