शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

निर्बंध कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

शनिवारी, रविवारी समुद्रकिनारे गर्दीने फुलत आहेत. गर्दी पाहून सोशल डिस्टन्सिंग हरवल्याची प्रचिती येत आहे. काही मंडळी तर विनामास्क फिरत ...

शनिवारी, रविवारी समुद्रकिनारे गर्दीने फुलत आहेत. गर्दी पाहून सोशल डिस्टन्सिंग हरवल्याची प्रचिती येत आहे. काही मंडळी तर विनामास्क फिरत आहेत. अशामुळे कोरोना संक्रमण वाढेल की कमी होईल, याबाबत मात्र शंका आहे.

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा अहोरात्र धडपडत आहे. ऊन-पावसाचा सामना करत पोलीस यंत्रणा रस्त्यावर तैनात आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार सरकारी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे. काेरोना संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत तर नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य यंत्रणा खबरदारी घेत आहे. असे असताना नागरिकांमधील बेजबाबदार वृत्तीमुळे कोरोना संक्रमण वाढतच आहे.

एकीकडे कोरोनाच्या निर्बंधांमुळे व्यावसायिक वैतागले आहेत. दुसरीकडे महागाईने सर्वसामान्य पोळत आहेत. गेल्या दीड वर्षात उद्योग-व्यवसायांना झळ बसल्यामुळे कित्येकांना नोकरी, रोजगार गमवावे लागले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार सुरू करण्याची मागणी केली जात आहे. लाॅकडाऊन व अनलाॅक काळातील रूग्णसंख्या थोड्याफार फरकाने सारखीच आहे. त्यामुळे निर्बंध हटविण्याची मागणी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने प्रशासन धोका पत्करायला तयार नाही. कोरोनामुळे सर्वसामान्य माणूस मात्र चांगलाच भरडला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्याने ऑनलाईनचा पर्याय निवडण्यात आला आहे. मात्र ऑनलाईन अध्यापनाचे फायदे-तोटे सर्वांनाच उमगले आहेत. या पध्दतीमुळे मुलांना कितपत आकलन होत आहे, हा जरी प्रश्न असला तरी मोबाईलच विश्व मानून तासनतास मुले त्यामध्ये व्यस्त राहात आहेत. या पध्दतीमुळे मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. जागरुक पालक मुलांची काळजी घेत असले तरी कित्येक मुले अबोल, चिडचिडी झाली आहेत. खासगी शिकवण्या, अन्य कलेबाबतच जादा वर्ग शिवाय ऑनलाईन अध्यापन पध्दतीमुळे मुलांची जीवनपध्दतीच बदलली आहे. मुले, खेळ-मैदाने विसरली आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुले शाळेत जात नसली तरी ऑनलाईन अध्यापन मात्र खर्चिक झाल्याने पालक हैराण आहेत. ग्रामीण भागात ज्याठिकाणी नेटवर्क उपलब्ध नाही, तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे बाधित क्षेत्र घोषित केले असल्याने मुलांना स्वाध्याय पुस्तिकांव्दारेच अध्यापन करावे लागत आहे. एकूणच शैक्षणिक क्षेत्रातही बोजवारा उडाला आहे. कोरोनामुळे ‘काही सुपात तर काही जात्यात’ अशी विचित्र स्थिती निर्माण झाली असून, त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.