शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

.....त्यामुळेच रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त ठरला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 13:16 IST

लॉकडाऊनची अंमलबजावणी जनतेकडून करण्यात येत आहे़ लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरही पोलीस यंत्रणेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे़  मात्र, शासनाला सहकार्य करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

ठळक मुद्दे१३ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण नाहीकायदा मोडणाऱ्यांवर कारवाई- जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी तिन्ही यंत्रणांची कसोटी

रत्नागिरी :  जिल्ह्यात कोरोनाचे ६ रुग्ण होते़ शनिवारी जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले़ मात्र, गेल्या १३ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोनाबाधित एकही रुग्ण आढळलेला नाही़ त्यामुळे संपूर्ण यंत्रणेने सुटकेचा श्वास घेतला आहे़ तरीही जिल्ह्याचे आरोग्य कोरोनामुक्त कसे राहील, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा या सर्वांसाठीच पुढील दिवस कसोटीचे ठरणार आहेत़१८ मार्च रोजी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता़ त्यानंतर काही दिवसातच खेड तालुक्यातील अलसुरे, रत्नागिरीतील  राजीवडा-शिवखोल मोहल्ला येथे प्रत्येकी एक आणि साखरतर येथे ३ असे एकूण ६ रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते़ खेडमधील रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता़ या कालावधीतच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले ५३७ संशयित होते़ मात्र, ६ कोरोनाग्रस्तांव्यतिरिक्त ते निगेटिव्ह असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला होता़लॉकडाऊनची अंमलबजावणी जनतेकडून करण्यात येत आहे़ लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरही पोलीस यंत्रणेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे़  मात्र, शासनाला सहकार्य करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.तिन्ही यंत्रणा एकत्रजिल्ह्यातील तिन्ही यंत्रणा हातात हात घालून काम करीत असल्याने या महामारीच्या दिवसांमध्ये त्याचा मोठा फायदा जिल्हावासियांना झाला आहे़ जिल्हा शासकीय रुग्णालयात तर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ अशोक बोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत़साऱ्यांचेच परिश्रमजिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेने जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली़ जिल्हा रूग्णालयातील इतर विभाग अन्यत्र हलवून हे रूग्णालय केवळ कोरोना रूग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी हे लोकांसाठी देवदूत ठरले आहेत़ त्यामुळेच जिल्हा कोरोनामुक्त ठरला आहे़ 

 

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरी