शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
7
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
8
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
9
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
10
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
11
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
12
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
13
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
14
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
15
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
16
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
17
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
18
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
19
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
20
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु

रत्नागिरी पालिका कारभारावर अंकुश कोणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2015 23:42 IST

विकासाबाबत भ्रमनिरास : सार्वत्रिक निवडणुकीत पडसाद उमटणार

रत्नागिरी : शहरातील अनेक विकासकामे सत्तेत असलेल्या या सेना - भाजपमधील अंतर्गत वादामुळे अद्याप खोळंबलेली आहेत. पालिकेतील सेना - भाजपमधील कुरबुरींमुळे शहर विकासाबाबत जनतेचा भ्रमनिरास झाल्याचे उघडपणे बोलले जात असून, त्याचे पडसाद २०१६मध्ये होणाऱ्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या कारभारावर नक्की अंकुश कोणाचा, सत्ता कोणाची, असा प्रश्न पडण्याजोगी स्थिती असल्याचाही अनुभव नागरिकांना घ्यावा लागत असल्याची चर्चा आहे. रत्नागिरी नगरपरिषदेत चार वर्षांपूर्वी रत्नागिरीकरांनी मोठ्या विश्वासाने शहराची सत्ता सेना-भाजप युतीच्या हाती सोपवली. त्यानंतर अडीच वर्षांच्या काळात काही प्रमाणात तरी चांगला कारभार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यानंतर पालिकेत कोणाचा कोणाला पायपोस नाही, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.शिवसेना व भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मैत्रीचे हात काढून घेतले. त्याचे पडसाद रत्नागिरी पालिकेतही उमटले. त्यामुळे आधीचे तोंडी ठरलेले करार कालबाह्य ठरवण्यात आले. त्यामुळे या-ना त्या कारणावरून सेना-भाजपमध्ये तू तू मै मै सुरू आहे. या विसंवादामुळे शहर विकासाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.शहर एलइडी दिव्यांनी झळाळून निघणार असल्याच्या घोषणेने रत्नागिरीकर भारावून गेले. मात्र, एलइडी प्रकल्पासाठी जास्त दराने निविदा स्वीकारण्यात आली असून, बाजारभाव कमी असल्याचा आक्षेप जिल्हा प्रशासनानेच घेतल्यानंतर हा प्रकल्प रखडला तो रखडलाच. गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील ५० टक्के पथदीप बंद आहेत. त्याजागी एलइडी बसवले जाणार असल्याचे स्वप्न दाखवत सहा महिने गेले तरी साधे बल्बही लावले गेलेले नाहीत. गणेशोत्सवात काही बंद पथदीप सुरू करण्यात आले. दीवाळीतही शहरातील रस्त्यांवर नागरिकांना अंधारच पाहावा लागणार काय, असा संतप्त सवाल केला जात आहे. रत्नागिरी शहरात दररोज जमा होणारा २२ टन कचरा साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारात टाकला जात आहे. या कचऱ्याचे ढीग वाढत चालले आहेत. येथे कचरा जाळला जात असल्याने परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. घनकचरा प्रकल्प उभारून कचऱ्याची समस्या सोडवण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. शहरानजीकच असलेल्या दांडेआडोम येथे घनकचरा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. शहर वा एमआयडीसी परिसरात घनकचरा प्रकल्प उभारण्याबाबत केवळ चर्चाच होत आल्या. प्रत्यक्षात काहीच घडत नाही, अशी पालिकेबाबत रत्नागिरी शहरातील नागरिकांचीच तक्रार सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)समस्या अन आश्वासने...शहराबाहेरील संकुलांना पाणी जोडणी देण्यासाठी पालिकेतीलच काहीजण आग्रह धरतात. मात्र, शहरातील कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा ही समस्या सोडविण्याकडे लक्ष दिले जात नाही. अनेक भागात कमी दाबाने पाणी येते, पाणीच येत नाही, अशा तक्रारी पालिकेत रोज घेऊन येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. त्यांना आश्वासनापलिकडे काहीच मिळत नाही, अशी चर्चाही शहरात आहे.