शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी पालिका कारभारावर अंकुश कोणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2015 23:42 IST

विकासाबाबत भ्रमनिरास : सार्वत्रिक निवडणुकीत पडसाद उमटणार

रत्नागिरी : शहरातील अनेक विकासकामे सत्तेत असलेल्या या सेना - भाजपमधील अंतर्गत वादामुळे अद्याप खोळंबलेली आहेत. पालिकेतील सेना - भाजपमधील कुरबुरींमुळे शहर विकासाबाबत जनतेचा भ्रमनिरास झाल्याचे उघडपणे बोलले जात असून, त्याचे पडसाद २०१६मध्ये होणाऱ्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या कारभारावर नक्की अंकुश कोणाचा, सत्ता कोणाची, असा प्रश्न पडण्याजोगी स्थिती असल्याचाही अनुभव नागरिकांना घ्यावा लागत असल्याची चर्चा आहे. रत्नागिरी नगरपरिषदेत चार वर्षांपूर्वी रत्नागिरीकरांनी मोठ्या विश्वासाने शहराची सत्ता सेना-भाजप युतीच्या हाती सोपवली. त्यानंतर अडीच वर्षांच्या काळात काही प्रमाणात तरी चांगला कारभार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यानंतर पालिकेत कोणाचा कोणाला पायपोस नाही, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.शिवसेना व भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मैत्रीचे हात काढून घेतले. त्याचे पडसाद रत्नागिरी पालिकेतही उमटले. त्यामुळे आधीचे तोंडी ठरलेले करार कालबाह्य ठरवण्यात आले. त्यामुळे या-ना त्या कारणावरून सेना-भाजपमध्ये तू तू मै मै सुरू आहे. या विसंवादामुळे शहर विकासाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.शहर एलइडी दिव्यांनी झळाळून निघणार असल्याच्या घोषणेने रत्नागिरीकर भारावून गेले. मात्र, एलइडी प्रकल्पासाठी जास्त दराने निविदा स्वीकारण्यात आली असून, बाजारभाव कमी असल्याचा आक्षेप जिल्हा प्रशासनानेच घेतल्यानंतर हा प्रकल्प रखडला तो रखडलाच. गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील ५० टक्के पथदीप बंद आहेत. त्याजागी एलइडी बसवले जाणार असल्याचे स्वप्न दाखवत सहा महिने गेले तरी साधे बल्बही लावले गेलेले नाहीत. गणेशोत्सवात काही बंद पथदीप सुरू करण्यात आले. दीवाळीतही शहरातील रस्त्यांवर नागरिकांना अंधारच पाहावा लागणार काय, असा संतप्त सवाल केला जात आहे. रत्नागिरी शहरात दररोज जमा होणारा २२ टन कचरा साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारात टाकला जात आहे. या कचऱ्याचे ढीग वाढत चालले आहेत. येथे कचरा जाळला जात असल्याने परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. घनकचरा प्रकल्प उभारून कचऱ्याची समस्या सोडवण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. शहरानजीकच असलेल्या दांडेआडोम येथे घनकचरा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. शहर वा एमआयडीसी परिसरात घनकचरा प्रकल्प उभारण्याबाबत केवळ चर्चाच होत आल्या. प्रत्यक्षात काहीच घडत नाही, अशी पालिकेबाबत रत्नागिरी शहरातील नागरिकांचीच तक्रार सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)समस्या अन आश्वासने...शहराबाहेरील संकुलांना पाणी जोडणी देण्यासाठी पालिकेतीलच काहीजण आग्रह धरतात. मात्र, शहरातील कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा ही समस्या सोडविण्याकडे लक्ष दिले जात नाही. अनेक भागात कमी दाबाने पाणी येते, पाणीच येत नाही, अशा तक्रारी पालिकेत रोज घेऊन येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. त्यांना आश्वासनापलिकडे काहीच मिळत नाही, अशी चर्चाही शहरात आहे.