शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
2
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
3
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
4
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
5
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
6
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
7
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
8
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
9
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
10
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
11
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
12
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
13
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
14
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
15
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
16
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
17
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
18
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
19
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
20
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!

रत्नागिरी पालिका कारभारावर अंकुश कोणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2015 23:42 IST

विकासाबाबत भ्रमनिरास : सार्वत्रिक निवडणुकीत पडसाद उमटणार

रत्नागिरी : शहरातील अनेक विकासकामे सत्तेत असलेल्या या सेना - भाजपमधील अंतर्गत वादामुळे अद्याप खोळंबलेली आहेत. पालिकेतील सेना - भाजपमधील कुरबुरींमुळे शहर विकासाबाबत जनतेचा भ्रमनिरास झाल्याचे उघडपणे बोलले जात असून, त्याचे पडसाद २०१६मध्ये होणाऱ्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या कारभारावर नक्की अंकुश कोणाचा, सत्ता कोणाची, असा प्रश्न पडण्याजोगी स्थिती असल्याचाही अनुभव नागरिकांना घ्यावा लागत असल्याची चर्चा आहे. रत्नागिरी नगरपरिषदेत चार वर्षांपूर्वी रत्नागिरीकरांनी मोठ्या विश्वासाने शहराची सत्ता सेना-भाजप युतीच्या हाती सोपवली. त्यानंतर अडीच वर्षांच्या काळात काही प्रमाणात तरी चांगला कारभार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यानंतर पालिकेत कोणाचा कोणाला पायपोस नाही, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.शिवसेना व भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मैत्रीचे हात काढून घेतले. त्याचे पडसाद रत्नागिरी पालिकेतही उमटले. त्यामुळे आधीचे तोंडी ठरलेले करार कालबाह्य ठरवण्यात आले. त्यामुळे या-ना त्या कारणावरून सेना-भाजपमध्ये तू तू मै मै सुरू आहे. या विसंवादामुळे शहर विकासाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.शहर एलइडी दिव्यांनी झळाळून निघणार असल्याच्या घोषणेने रत्नागिरीकर भारावून गेले. मात्र, एलइडी प्रकल्पासाठी जास्त दराने निविदा स्वीकारण्यात आली असून, बाजारभाव कमी असल्याचा आक्षेप जिल्हा प्रशासनानेच घेतल्यानंतर हा प्रकल्प रखडला तो रखडलाच. गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील ५० टक्के पथदीप बंद आहेत. त्याजागी एलइडी बसवले जाणार असल्याचे स्वप्न दाखवत सहा महिने गेले तरी साधे बल्बही लावले गेलेले नाहीत. गणेशोत्सवात काही बंद पथदीप सुरू करण्यात आले. दीवाळीतही शहरातील रस्त्यांवर नागरिकांना अंधारच पाहावा लागणार काय, असा संतप्त सवाल केला जात आहे. रत्नागिरी शहरात दररोज जमा होणारा २२ टन कचरा साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारात टाकला जात आहे. या कचऱ्याचे ढीग वाढत चालले आहेत. येथे कचरा जाळला जात असल्याने परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. घनकचरा प्रकल्प उभारून कचऱ्याची समस्या सोडवण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. शहरानजीकच असलेल्या दांडेआडोम येथे घनकचरा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. शहर वा एमआयडीसी परिसरात घनकचरा प्रकल्प उभारण्याबाबत केवळ चर्चाच होत आल्या. प्रत्यक्षात काहीच घडत नाही, अशी पालिकेबाबत रत्नागिरी शहरातील नागरिकांचीच तक्रार सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)समस्या अन आश्वासने...शहराबाहेरील संकुलांना पाणी जोडणी देण्यासाठी पालिकेतीलच काहीजण आग्रह धरतात. मात्र, शहरातील कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा ही समस्या सोडविण्याकडे लक्ष दिले जात नाही. अनेक भागात कमी दाबाने पाणी येते, पाणीच येत नाही, अशा तक्रारी पालिकेत रोज घेऊन येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. त्यांना आश्वासनापलिकडे काहीच मिळत नाही, अशी चर्चाही शहरात आहे.