शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोरबाळ अन् जनावरांना काय खायला घालायचं?, शेतकऱ्यांची आर्त विनवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 16:27 IST

क्यार वादाळामुळे बदललेल्या वातावरणातून अवेळी पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झालेला दिसत आहे. तसेच प्रशासनाने माहा चक्रीवादळाचा इशारा दिल्याने यापूर्वीच जमेल तेवढे पीक वाचविण्याची कसरत शेतकरी करत आहे. आता आम्ही कसं जगायचं? पोराबाळांना काय खायला घालायचं? असा सवाल रडवेल्या अवस्थेत केला.

ठळक मुद्देपोरबाळ अन् जनावरांना काय खायला घालायचं?, शेतकऱ्यांची आर्त विनवणीभौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या गुहागर तालुक्यात भातशेतीचे नुकसान

संकेत गोयथळेगुहागर : क्यार वादाळामुळे बदललेल्या वातावरणातून अवेळी पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झालेला दिसत आहे. तसेच प्रशासनाने माहा चक्रीवादळाचा इशारा दिल्याने यापूर्वीच जमेल तेवढे पीक वाचविण्याची कसरत शेतकरी करत आहे. आता आम्ही कसं जगायचं? पोराबाळांना काय खायला घालायचं? असा सवाल रडवेल्या अवस्थेत केला.शेतावर कामाच्या लगबगीत शेतकऱ्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता यामधून शेतकऱ्यांची मानसिक स्थिती किती ढासळली आहे हे लक्षात आले. शेतावर भेट घेतली असता साऱ्यांच्याच चेहऱ्यावर फक्त चिंता होती. साहेब काही तरी करा हो. एवढी मेहनत करुन थोडे पीक तरी हातात लागायला हवे होते.

आज बोलावलेल्या मजुरांना ४०० रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागते. पैसे खर्च होऊनही पूर्ण नुकसानच होणार असेल तर चालणार कसे? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी विचारले. वेळंब येथील सचिन माळी यांनी सांगितले की, गेले चार दिवस फक्त भिजलेला पेंढाच बाजूला करुन तो सुकवत आहोत.

बहुतांश पेंढा ओला होऊन फुकट गेला आहे. आता या शेतामधून जे मिळेल त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईमध्ये प्लंबिंग काम करतो. आई, बायको शेती बघतात. त्यांना मदत करण्यासाठी आलो. पण येथील स्थिती चिंताजनक आहे.तालुक्यात १२२ गावे असून, काम जलदगतीने व्हावे, यासाठी तलाठी २२ गावे, ग्रामसेवक ५७, तर कृषी सहाय्यक ४३ अशा विभागणीने पंचनामे करण्यात आले. दि. २ नोव्हेंबरला अंतिम तारीख देण्यात आली होती. या दिवशी रविवार असूनही तलाठ्यांकडून आवश्यक सातबारे उपलब्धता व अर्ज भरुन घेण्यात आले.

सोमवारी प्रांताधिकाऱ्यांनी विशेष भेट देऊन कामाचा आढावा घेतला व मंगळवारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्ज आल्याचे तालुका कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले.उत्पादन निम्म्याहून घटलेअनेक शेतकऱ्यांकडे गुरे आहेत. शेतातून आलेला पेंढा वर्षभर गुरांना पुरवतात. मात्र ओला पेंढा फेकून देण्याची वेळ आली आहे. या पेंढ्यात अळ्या होत आहेत. अनेक शेतकरी दुसऱ्याची शेती अर्धळीवर करत असतात. त्याची स्वत:ची शेती नसते. अशाच वेळंब येथील विजया कुंभार यांनी सांगितले की, गेल्यावर्षी २२ गुंठ्याला दोन खंडी भात मिळालं. आज १० मण मिळेल की, नाही सांगता येत नाही.किती क्षेत्र झाले बाधित?तालुक्यात ३ हजार १२८ इतकी शेतकरी संख्या आहे. यापैकी २ हजार ९४७ शेतकऱ्यांचे एकूण ५५१.२७ हे. आर. क्षेत्रापैकी ५२२.३ हेक्टर आर क्षेत्रात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अंदाजे ३७ कोटी ४८ हजार ६३६ एवढी नुकसान भरपाई मिळू शकते. शासनाच्या बदलत्या निकषानुसार यामध्ये कमी जास्त बदल होऊ शकतो, असे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.

गेले आठ दिवस शेतावरच आहोत. उरले सुरले पीक मिळविण्यासाठी पुन्हा पाऊस पडण्याआधीच ह्यमळणीह्ण काढायला घेत आहोत. शासनातर्फे चालू असलेले पंचनामे तसेच यासाठी अर्ज करण्याबाबत आपल्याला अद्याप काहीच माहिती नसल्याचे सांगत शेत वाचवायचं की, शासनाकडून मिळणाऱ्या तूटपुंज्या अनुदानासाठी फेऱ्या मारायच्या. त्यापेक्षा शासनाने सर्वांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी.- अनंत गावडे,कीर्तनवाडी, गुहागर

भिजलेल्या पेंढ्या हाताळतानाच भाताच्या लोंब्या (अर्ध्या अधिक) जमिनीवर पडत आहेत. यामुळे एवढ्या मेहनतीनंतरही फार कमी पीक शेवटी मिळत आहे. जमिनीवर पडलेला एक एक दाणा आणि भाताच्या लोंब्या एकत्रित ताडपत्रीवर घेऊन अनेक ठिकाणी सुकविताना शेतकरी दिसत आहे. पुन्हा पाऊस येण्याची शक्यता असल्याने अनेक शेतकरी घराची पडवी तसेच अंगणात आणलेले भात झोडताना दिसत आहेत.- सुनीता शिंदे, वरवेली शिंदेवाडी- सुनील माळी, वेळंब

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसRatnagiriरत्नागिरी