शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पोरबाळ अन् जनावरांना काय खायला घालायचं?, शेतकऱ्यांची आर्त विनवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 16:27 IST

क्यार वादाळामुळे बदललेल्या वातावरणातून अवेळी पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झालेला दिसत आहे. तसेच प्रशासनाने माहा चक्रीवादळाचा इशारा दिल्याने यापूर्वीच जमेल तेवढे पीक वाचविण्याची कसरत शेतकरी करत आहे. आता आम्ही कसं जगायचं? पोराबाळांना काय खायला घालायचं? असा सवाल रडवेल्या अवस्थेत केला.

ठळक मुद्देपोरबाळ अन् जनावरांना काय खायला घालायचं?, शेतकऱ्यांची आर्त विनवणीभौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या गुहागर तालुक्यात भातशेतीचे नुकसान

संकेत गोयथळेगुहागर : क्यार वादाळामुळे बदललेल्या वातावरणातून अवेळी पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झालेला दिसत आहे. तसेच प्रशासनाने माहा चक्रीवादळाचा इशारा दिल्याने यापूर्वीच जमेल तेवढे पीक वाचविण्याची कसरत शेतकरी करत आहे. आता आम्ही कसं जगायचं? पोराबाळांना काय खायला घालायचं? असा सवाल रडवेल्या अवस्थेत केला.शेतावर कामाच्या लगबगीत शेतकऱ्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता यामधून शेतकऱ्यांची मानसिक स्थिती किती ढासळली आहे हे लक्षात आले. शेतावर भेट घेतली असता साऱ्यांच्याच चेहऱ्यावर फक्त चिंता होती. साहेब काही तरी करा हो. एवढी मेहनत करुन थोडे पीक तरी हातात लागायला हवे होते.

आज बोलावलेल्या मजुरांना ४०० रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागते. पैसे खर्च होऊनही पूर्ण नुकसानच होणार असेल तर चालणार कसे? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी विचारले. वेळंब येथील सचिन माळी यांनी सांगितले की, गेले चार दिवस फक्त भिजलेला पेंढाच बाजूला करुन तो सुकवत आहोत.

बहुतांश पेंढा ओला होऊन फुकट गेला आहे. आता या शेतामधून जे मिळेल त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईमध्ये प्लंबिंग काम करतो. आई, बायको शेती बघतात. त्यांना मदत करण्यासाठी आलो. पण येथील स्थिती चिंताजनक आहे.तालुक्यात १२२ गावे असून, काम जलदगतीने व्हावे, यासाठी तलाठी २२ गावे, ग्रामसेवक ५७, तर कृषी सहाय्यक ४३ अशा विभागणीने पंचनामे करण्यात आले. दि. २ नोव्हेंबरला अंतिम तारीख देण्यात आली होती. या दिवशी रविवार असूनही तलाठ्यांकडून आवश्यक सातबारे उपलब्धता व अर्ज भरुन घेण्यात आले.

सोमवारी प्रांताधिकाऱ्यांनी विशेष भेट देऊन कामाचा आढावा घेतला व मंगळवारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्ज आल्याचे तालुका कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले.उत्पादन निम्म्याहून घटलेअनेक शेतकऱ्यांकडे गुरे आहेत. शेतातून आलेला पेंढा वर्षभर गुरांना पुरवतात. मात्र ओला पेंढा फेकून देण्याची वेळ आली आहे. या पेंढ्यात अळ्या होत आहेत. अनेक शेतकरी दुसऱ्याची शेती अर्धळीवर करत असतात. त्याची स्वत:ची शेती नसते. अशाच वेळंब येथील विजया कुंभार यांनी सांगितले की, गेल्यावर्षी २२ गुंठ्याला दोन खंडी भात मिळालं. आज १० मण मिळेल की, नाही सांगता येत नाही.किती क्षेत्र झाले बाधित?तालुक्यात ३ हजार १२८ इतकी शेतकरी संख्या आहे. यापैकी २ हजार ९४७ शेतकऱ्यांचे एकूण ५५१.२७ हे. आर. क्षेत्रापैकी ५२२.३ हेक्टर आर क्षेत्रात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अंदाजे ३७ कोटी ४८ हजार ६३६ एवढी नुकसान भरपाई मिळू शकते. शासनाच्या बदलत्या निकषानुसार यामध्ये कमी जास्त बदल होऊ शकतो, असे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.

गेले आठ दिवस शेतावरच आहोत. उरले सुरले पीक मिळविण्यासाठी पुन्हा पाऊस पडण्याआधीच ह्यमळणीह्ण काढायला घेत आहोत. शासनातर्फे चालू असलेले पंचनामे तसेच यासाठी अर्ज करण्याबाबत आपल्याला अद्याप काहीच माहिती नसल्याचे सांगत शेत वाचवायचं की, शासनाकडून मिळणाऱ्या तूटपुंज्या अनुदानासाठी फेऱ्या मारायच्या. त्यापेक्षा शासनाने सर्वांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी.- अनंत गावडे,कीर्तनवाडी, गुहागर

भिजलेल्या पेंढ्या हाताळतानाच भाताच्या लोंब्या (अर्ध्या अधिक) जमिनीवर पडत आहेत. यामुळे एवढ्या मेहनतीनंतरही फार कमी पीक शेवटी मिळत आहे. जमिनीवर पडलेला एक एक दाणा आणि भाताच्या लोंब्या एकत्रित ताडपत्रीवर घेऊन अनेक ठिकाणी सुकविताना शेतकरी दिसत आहे. पुन्हा पाऊस येण्याची शक्यता असल्याने अनेक शेतकरी घराची पडवी तसेच अंगणात आणलेले भात झोडताना दिसत आहेत.- सुनीता शिंदे, वरवेली शिंदेवाडी- सुनील माळी, वेळंब

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसRatnagiriरत्नागिरी