शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

तीन दिवस वाट पाहिल्यानंतर रत्नागिरीकरांना मिळणार आनंदाची माहिती- काय काय मिळणार सवलती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 13:09 IST

जिल्हाअंतर्गत काम सुरू करताना कामगारांचे स्थलांतर करून दिले जाणार नाही. त्या-त्या ठिकाणच्या कामगारांकडून ही कामे करून घेतली जाणार आहेत. तसेच दुकानं सुरू केली असली तरी घरपोच सुविधेवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे २० तारखेनंतर टाळेबंदीतून जिल्ह्याला काहीशी शिथिलता मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकाही उद्योगांना मिळणार परवानगी कामगारांचे स्थलांतर नाहीच मिठाई दुकाने होणार सुरू

रत्नागिरी : कोरोनाला अटकाव करण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. २० एप्रिलनंतर यात शिथिलता देण्यात येणार आहे. मात्र, शिथिलता देताना कठोर नियमावली लागू आहे. २०एप्रिल नंतर शासकीय कामे, काही उद्योग, पावसापूर्वी कामे, नरेगा, अत्यावश्यक वाहतूक, महामार्गाचे काम, चिरेखाणी, मिठाई दुकाने सुरू होणार आहे. मात्र, त्या-त्या ठिकाणच्या कामगारांच्या माध्यमातून ही कामे केले जाणार आहेत. कामगारांचे स्थलांतर करून दिले जाणार नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.२२ मार्च ते १४ मार्च अशी २१ दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आले. उद्योग, व्यवसाय, व्यापार, वाहतूक आदी जिथल्या तिथे थांबले. याचा सर्वच घटकांवर मोठा परिणाम झाला. उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातून देश, कामगार वर्ग उद्योग, व्यवसाय सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व अभ्यास करून जिल्हाअंतर्गत २० तारखेपासून शिथिलता आणली जाणार आहे.जिल्ह्यातील काही उद्योग सर्व अटी-शर्ती घालून सुरू करण्यात येत आहेत. शासकीय कामे, पावसापूवीर्ची कामे, नरेगा, अत्यावश्यक वाहतूक, खासगी दवाखाने, मुुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम, चिरेखानी, मिठाई, फरसाण दुकान, मॅन्युफॅक्चीरिंग आदी सुरू केले जाणार आहे. जिल्हाअंतर्गत काम सुरू करताना कामगारांचे स्थलांतर करून दिले जाणार नाही. त्या-त्या ठिकाणच्या कामगारांकडून ही कामे करून घेतली जाणार आहेत. तसेच दुकानं सुरू केली असली तरी घरपोच सुविधेवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे २० तारखेनंतर टाळेबंदीतून जिल्ह्याला काहीशी शिथिलता मिळण्याची शक्यता आहे.

 

 

 

टॅग्स :konkanकोकणcorona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी