शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

तीन दिवस वाट पाहिल्यानंतर रत्नागिरीकरांना मिळणार आनंदाची माहिती- काय काय मिळणार सवलती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 13:09 IST

जिल्हाअंतर्गत काम सुरू करताना कामगारांचे स्थलांतर करून दिले जाणार नाही. त्या-त्या ठिकाणच्या कामगारांकडून ही कामे करून घेतली जाणार आहेत. तसेच दुकानं सुरू केली असली तरी घरपोच सुविधेवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे २० तारखेनंतर टाळेबंदीतून जिल्ह्याला काहीशी शिथिलता मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकाही उद्योगांना मिळणार परवानगी कामगारांचे स्थलांतर नाहीच मिठाई दुकाने होणार सुरू

रत्नागिरी : कोरोनाला अटकाव करण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. २० एप्रिलनंतर यात शिथिलता देण्यात येणार आहे. मात्र, शिथिलता देताना कठोर नियमावली लागू आहे. २०एप्रिल नंतर शासकीय कामे, काही उद्योग, पावसापूर्वी कामे, नरेगा, अत्यावश्यक वाहतूक, महामार्गाचे काम, चिरेखाणी, मिठाई दुकाने सुरू होणार आहे. मात्र, त्या-त्या ठिकाणच्या कामगारांच्या माध्यमातून ही कामे केले जाणार आहेत. कामगारांचे स्थलांतर करून दिले जाणार नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.२२ मार्च ते १४ मार्च अशी २१ दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आले. उद्योग, व्यवसाय, व्यापार, वाहतूक आदी जिथल्या तिथे थांबले. याचा सर्वच घटकांवर मोठा परिणाम झाला. उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातून देश, कामगार वर्ग उद्योग, व्यवसाय सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व अभ्यास करून जिल्हाअंतर्गत २० तारखेपासून शिथिलता आणली जाणार आहे.जिल्ह्यातील काही उद्योग सर्व अटी-शर्ती घालून सुरू करण्यात येत आहेत. शासकीय कामे, पावसापूवीर्ची कामे, नरेगा, अत्यावश्यक वाहतूक, खासगी दवाखाने, मुुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम, चिरेखानी, मिठाई, फरसाण दुकान, मॅन्युफॅक्चीरिंग आदी सुरू केले जाणार आहे. जिल्हाअंतर्गत काम सुरू करताना कामगारांचे स्थलांतर करून दिले जाणार नाही. त्या-त्या ठिकाणच्या कामगारांकडून ही कामे करून घेतली जाणार आहेत. तसेच दुकानं सुरू केली असली तरी घरपोच सुविधेवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे २० तारखेनंतर टाळेबंदीतून जिल्ह्याला काहीशी शिथिलता मिळण्याची शक्यता आहे.

 

 

 

टॅग्स :konkanकोकणcorona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी