शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

वेळप्रसंगी मुंबई-गाेवा महामार्ग राखून धरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:31 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. ही लढाई केवळ एका तालुक्याची न राहता संपूर्ण ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. ही लढाई केवळ एका तालुक्याची न राहता संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याची व्हावी. यासाठी प्रचंड मोठे आंदोलन उभे करण्यासाठी सज्ज रहा, असे ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार मोहिते यांनी सांगितले. या प्रश्नांसाठी येत्या ऑक्टोबरमध्ये संपूर्ण जिल्ह्यात ओबीसींचे मोठे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार सभेत घेण्यात आला. वेळप्रसंगी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरण्याचा निर्णय रत्नागिरी येथे झालेल्या ओबीसी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

ओबीसी संघर्ष समिती रत्नागिरी तालुक्याच्यावतीने येथील शासकीय विश्रामगृह येथे विचारविनियम सभा पार पडली. या सभेला ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार मोहिते, राज्य ओबीसी जनमोर्चा कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, तसेच समितीचे शरदचंद्र गीते (देवरुख), कुमार शेट्ये, राजू कीर, दीपक राऊत, रूपेंद्र शिवलकर, सुरेश भायजे, सुहास वासावे, रघुवीर शेलार, भाई पोस्टुरे (मंडणगड), रवींद्र घडवले (माजी पोलीस आयुक्त, मुंबई), प्रकाश ऊर्फ बावा साळवी, महेश म्हाप, मंगेश साळवी, साक्षी रावणंग, वसंत घडशी, स्नेहा चव्हाण, संदीप ऊर्फ बावा नाचणकर, संध्या कोसुंबकर उपस्थित होते.

ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना, आरक्षणाबाबत झालेला अन्याय व ओबीसी समाजाच्या समस्यांबाबतीत या सभेत उपस्थित मान्यवरांनी आपापली मते मांडली. शासनाला जाब विचारण्याची वेळ आल्याचे या वेळी उपस्थितांनी सांगितले. ओबीसींचे संघटन मजबूत करण्यासाठी आता सर्वांनी एकत्रित येऊन लढा उभारण्यासाठी सज्ज राहण्याचे प्रतिपादन ओबीसी जनमोर्चा कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी केले.

यासाठी तालुका संघटनेने जोर धरला आहे. याविषयी संपूर्ण जिह्यातील ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन संघटना बांधणी व पुढील ध्येयधोरणे निश्चित करण्यासाठी जिल्हाभरातून ओबीसी समाजाचे नेतृत्व केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात आणखीन एक मध्यवर्ती ठिकाणी या संघर्ष समितीची बैठक घेतली जाणार आहे. जिल्हा ओबीसी समाजाच्या या सभेला ओबीसी संघर्ष समिती तालुका रत्नागिरी पदाधिकारी व सदस्य, तालुक्यातील सर्व समाजाचे अध्यक्ष, ओबीसी नेते, सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, महिला उपस्थित होते.