शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला आयलॉग प्रकल्प हवा, समर्थनासाठी ग्रामस्थ सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:36 IST

राजापूर तालुक्यातील नाटे-आंबोळगड येथील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाला शासनाने तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती दिल्याने प्रकल्प परिसरात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

ठळक मुद्देआम्हाला आयलॉग प्रकल्प हवा, समर्थनासाठी ग्रामस्थ सरसावले स्थगिती आदेशामुळे परिसरात संताप

राजापूर : तालुक्यातील नाटे-आंबोळगड येथील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाला शासनाने तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती दिल्याने प्रकल्प परिसरात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.आम्हाला कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प हवा असतानाच शासनाने स्थानिक जनतेशी चर्चा न करता प्रकल्पाला स्थगिती देणे ही बाब दुर्दैवी असल्याची टीका आता प्रकल्प परिसरातून होऊ लागली आहे.

कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला येथील पर्यावरणाशी जोडून विरोधी वातावरण तयार करणाऱ्या काही संस्थांचीच शासनाने चौकशी करावी, असेही सूर आता ऐकायला मिळत आहेत.तालुक्यातील नाटे-आंबोळगड येथे आयलॉग हा जेटीचा प्रकल्प मंजूर झाला आणि प्रकल्पाविरोधात वातावरण तयार होऊ लागले. गतवर्षी या प्रकल्पाची जनसुनावणी आंबोळगडच्या पठारावर झाली होती. त्यावेळी प्रकल्प विरोधकांनी ती होऊ दिली नव्हती. एकीकडे प्रकल्पाला विरोध होत असतानाच आयलॉग प्रकल्प नाटे-आंबोळगड परिसरातच व्हावा, यासाठी स्थानिक ग्रामस्थ जोरदार आग्रही राहिले आहेत.राजापूर तालुक्यात रोजगाराची संधी नाही, त्यामुळे आयलॉगसारखे प्रकल्प निश्चितच उपयोगी ठरणार आहेत. परिसरासह तालुक्याच्या विकासात भर पडणार आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या प्रकल्पासाठी आम्ही जमिनी दिल्या आहेत. मात्र, आमच्या गावात या प्रकल्पाविरूध्द दिशाभूल करून जनतेला फसविण्याचे काम संस्थांच्या रुपात काही मंडळी करीत आहेत. यापूर्वी तालुक्यात आलेल्या प्रत्येक प्रकल्पाच्या विरोधात ही मंडळीच कशी काय पुढे असतात, असा सवाल या भागातील ग्रामस्थांनी केला आहे.नाटे-आंबोळगड येथील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाविरुध्द ६ फेब्रुवारीला राजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर काही प्रकल्प विरोधकांनी राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर पर्यावरण मंत्र्यांनी आयलॉगला तात्पुरती स्थगिती दिल्याची वृत्त प्रसिध्द झाली. त्यामुळे आयलॉगसाठी आग्रही असणारी समर्थक मंडळी समर्थनार्थ सरसावली आहेत.

आयलॉग जेटी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध नसतानाही तो विरोध भासवला जात आहे. ज्या लोकांचा याच्याशी काहीही संबंध नाही ते लोक एनजीओच्या माध्यमातून विरोध असल्याचे भासवत आहेत. मुळात चुकीची माहिती देणाऱ्या या संस्थांचीच चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे.- चंद्रकांत मिरासे,शाखाप्रमुख, नाटे 

आयलॉग प्रकल्पासाठी नाटे ग्रामपंचायतीने यापूर्वीच परवानगी दिली आहे. हा जेटी प्रकल्प असून, त्यापासून कोणत्याचे प्रकारचे प्रदूषण होणार नसल्याची खात्री करूनच ही परवानगी दिली गेलेली आहे. गेली १५ वर्षे नाटे ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यावेळी तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगण्यात येते. मात्र, असे प्रकल्प रद्द केले तर रोजगार कोठून देणार? नाटे आणि आंबोळगड या भागातील ७५ टक्के लोकांचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे.

 

या प्रकल्पामुळे आंबा बागायतदार, मच्छिमार यांना फायदा होणार असून, मालाची निर्यात करणे सोपे होणार आहे. मग प्रकल्प रद्द करण्याचे कारण काय? शिवसेनेचे वरिष्ठ नेते असे परस्पर निर्णय घेणार असतील तर ते दुर्दैवाचे आहे. प्रत्येक प्रकल्पाला विरोध करायचा असेल तर शिवसैनिकांनी नेमके काय करायचे, हे आता वरिष्ठांनी जाहीर करावे.- डॉ. सुनील राणे,विभागीय संघटक व माजी विभागप्रमुख

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना