शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

आम्हाला आयलॉग प्रकल्प हवा, समर्थनासाठी ग्रामस्थ सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:36 IST

राजापूर तालुक्यातील नाटे-आंबोळगड येथील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाला शासनाने तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती दिल्याने प्रकल्प परिसरात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

ठळक मुद्देआम्हाला आयलॉग प्रकल्प हवा, समर्थनासाठी ग्रामस्थ सरसावले स्थगिती आदेशामुळे परिसरात संताप

राजापूर : तालुक्यातील नाटे-आंबोळगड येथील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाला शासनाने तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती दिल्याने प्रकल्प परिसरात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.आम्हाला कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प हवा असतानाच शासनाने स्थानिक जनतेशी चर्चा न करता प्रकल्पाला स्थगिती देणे ही बाब दुर्दैवी असल्याची टीका आता प्रकल्प परिसरातून होऊ लागली आहे.

कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला येथील पर्यावरणाशी जोडून विरोधी वातावरण तयार करणाऱ्या काही संस्थांचीच शासनाने चौकशी करावी, असेही सूर आता ऐकायला मिळत आहेत.तालुक्यातील नाटे-आंबोळगड येथे आयलॉग हा जेटीचा प्रकल्प मंजूर झाला आणि प्रकल्पाविरोधात वातावरण तयार होऊ लागले. गतवर्षी या प्रकल्पाची जनसुनावणी आंबोळगडच्या पठारावर झाली होती. त्यावेळी प्रकल्प विरोधकांनी ती होऊ दिली नव्हती. एकीकडे प्रकल्पाला विरोध होत असतानाच आयलॉग प्रकल्प नाटे-आंबोळगड परिसरातच व्हावा, यासाठी स्थानिक ग्रामस्थ जोरदार आग्रही राहिले आहेत.राजापूर तालुक्यात रोजगाराची संधी नाही, त्यामुळे आयलॉगसारखे प्रकल्प निश्चितच उपयोगी ठरणार आहेत. परिसरासह तालुक्याच्या विकासात भर पडणार आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या प्रकल्पासाठी आम्ही जमिनी दिल्या आहेत. मात्र, आमच्या गावात या प्रकल्पाविरूध्द दिशाभूल करून जनतेला फसविण्याचे काम संस्थांच्या रुपात काही मंडळी करीत आहेत. यापूर्वी तालुक्यात आलेल्या प्रत्येक प्रकल्पाच्या विरोधात ही मंडळीच कशी काय पुढे असतात, असा सवाल या भागातील ग्रामस्थांनी केला आहे.नाटे-आंबोळगड येथील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाविरुध्द ६ फेब्रुवारीला राजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर काही प्रकल्प विरोधकांनी राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर पर्यावरण मंत्र्यांनी आयलॉगला तात्पुरती स्थगिती दिल्याची वृत्त प्रसिध्द झाली. त्यामुळे आयलॉगसाठी आग्रही असणारी समर्थक मंडळी समर्थनार्थ सरसावली आहेत.

आयलॉग जेटी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध नसतानाही तो विरोध भासवला जात आहे. ज्या लोकांचा याच्याशी काहीही संबंध नाही ते लोक एनजीओच्या माध्यमातून विरोध असल्याचे भासवत आहेत. मुळात चुकीची माहिती देणाऱ्या या संस्थांचीच चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे.- चंद्रकांत मिरासे,शाखाप्रमुख, नाटे 

आयलॉग प्रकल्पासाठी नाटे ग्रामपंचायतीने यापूर्वीच परवानगी दिली आहे. हा जेटी प्रकल्प असून, त्यापासून कोणत्याचे प्रकारचे प्रदूषण होणार नसल्याची खात्री करूनच ही परवानगी दिली गेलेली आहे. गेली १५ वर्षे नाटे ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यावेळी तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगण्यात येते. मात्र, असे प्रकल्प रद्द केले तर रोजगार कोठून देणार? नाटे आणि आंबोळगड या भागातील ७५ टक्के लोकांचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे.

 

या प्रकल्पामुळे आंबा बागायतदार, मच्छिमार यांना फायदा होणार असून, मालाची निर्यात करणे सोपे होणार आहे. मग प्रकल्प रद्द करण्याचे कारण काय? शिवसेनेचे वरिष्ठ नेते असे परस्पर निर्णय घेणार असतील तर ते दुर्दैवाचे आहे. प्रत्येक प्रकल्पाला विरोध करायचा असेल तर शिवसैनिकांनी नेमके काय करायचे, हे आता वरिष्ठांनी जाहीर करावे.- डॉ. सुनील राणे,विभागीय संघटक व माजी विभागप्रमुख

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना