शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला गुंड नको, खासदार हवेत, उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 14:46 IST

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला एक परंपरा आहे. या आधी इथे गुंड होते , विनायक राऊत यांनी गुंडगिरी मोडीत काढलीत. आम्हाला गुंड नकोत खासदार हवे आहेत असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या नारायण राणेंना टोला लगावला. 

रत्नागिरी - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली असताना राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपात कुठेही कमी पडताना दिसत नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला एक परंपरा आहे. या आधी इथे गुंड होते , विनायक राऊत यांनी गुंडगिरी मोडीत काढलीत. आम्हाला गुंड नकोत खासदार हवे आहेत असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या नारायण राणेंना टोला लगावला. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रत्नागिरी येथे जाहीर सभा घेतली. खासदारांचे शिक्षण काढता. शिक्षण काय संतानी घेतले होते का ? बहिणाबाई न शिकता त्यांनी मोठी उंची गाठली. विनायक राऊत यांनी कधीही हातातला झेंडा बदलला नाही. निष्ठा हवी असते. समोरच्या उमेदवाराकडून तुम्ही काय निष्ठेची अपेक्षा ठेवता अशी टीका उद्धव यांनी नारायण राणे यांच्यावर केली. या मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे निवडणूक लढवत आहेत.  

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी महाराष्ट्रभर फिरतोय. नेते मंडळींनी भाषणात आपण काय करतोय हे मतदारांना सांगितले पाहिजे. एका कुटुंबात वेगवेगळे झेंडे लोक घेत आहेत. तसे इथे होऊन चालायचे नाही. काही लोकांच्या सभेला गर्दी असते. आमच्या सभेला जी गर्दी असते ती मनाने आलेली लोक असतात असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीलाही टीकेचं लक्ष्य केलं. कस खायचं हे यांच्या समोरच्याकडून शिकावे. a टू z  इतके घोटाळे आहेत. राहुल गांधी हे 124 A  हा देशद्रोहाचे कलम काढणार असे त्यांच्या जाहीरनाम्यात आहे. तुम्हाला देशद्रोह्यांना फासावर लटकवणारे सरकार पाहिजे की पाठीशी घालणार सरकार पाहिजे अशी टीका उद्धव यांनी काँग्रेसवर केली. तर शरद पवार बोलतात की गांधी घराण्याचा आदर केला पाहिजे. आम्ही त्या काँग्रेसला मानतो ज्यांनी स्वातंत्र्यसाठी लढा दिला. आम्ही त्या काँग्रेसला मानतो ज्यांनी स्वातंत्र्यसाठी लढा दिला. त्यांना पाहून मान आदरानं वर येते आणि आता मान शरमेने खाली जाते. नेहरू, महात्मा गांधी अनेक क्रांतिकारकांनी जर हाल भोगले नसते तर राहुल गांधी पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहू शकले असते का ? असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला. 

तसेच आम्ही युती केली ती युती शेतकऱ्यांसाठी देश हितासाठी केली. शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती आणि कर्जमाफी यासाठी युती केली. देव देश आणी धर्म साठी केली युती असा विश्वास व्यक्त करत धनुष्यबाणाला आणि कमळाला मत म्हणजे तुमचे स्वतःचे स्वतःला मत. आपल्या कुटुंबासाठी असलेल मत आहे असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरेंनी लोकांसमोर केलं.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019