शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

corona virus-कोरोनाच्या भीतीने आखाती नोकरदार परतीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 16:57 IST

कोरोना व्हायरसचा झपाट्याने होत असल्याने आखाती प्रदेशात नोकरीला गेलेल्या मंडळींवर नोकरीचे संकट उद्भवले आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या भीतीने आखाती नोकरदार परतीच्या मार्गावरगेलेल्या मंडळींवर नोकरीचे संकट

रत्नागिरी : कोरोना व्हायरसचा झपाट्याने होत असल्याने आखाती प्रदेशात नोकरीला गेलेल्या मंडळींवर नोकरीचे संकट उद्भवले आहे.आखातील प्रदेशातच नव्हे; तर देश-विदेशातून परदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे हॉटेल्स, लॉजिंग्स, वाहतूक व्यवसायावर परिणाम झाला आहे.

काम नसल्याने या क्षेत्रातील नोकरदारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. वाहन चालक, वेटर, शेप, गाईड, सफाई कामगार अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कित्येक मंडळींना कामच नसल्याने संबंधित कंपन्यांनी मायदेशी परत पाठविले आहे. सौदी अरेबिया, कुवेत, मस्कत, दुबई येथून कित्येक कोकणी मंडळी काम नसल्याने परत आली आहेत. परदेशातील काही कंपन्यांनी मात्र भारतात सुट्टीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने परत बोलावले आहे.

कोकणातील अनेक मंडळी आखाती प्रदेशात कार्यरत आहेत. परदेशातील मंडळी वर्षातून एक महिना भारतात सुट्टीवर येतात. त्यामुळे सुट्टीसाठी आलेल्या भारतीयांना ८ मार्चपर्यंत कामावर हजर होण्यासाठी तातडीची सूचना काढली आहे, अन्यथा नंतर येणाऱ्या मंडळींना भारतीय राजदुतावासांतर्गत वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र सादर करून हजर व्हावे लागेल, अशी सूचना केल्याने अनेक भारतीय नोकरीसाठी परदेशात परतीच्या मार्गाला लागले आहेत.

यामध्ये कोकणातील युवकांचाही समावेश आहे. अस्थैर्याचे हे संकट टाळण्यासाठी अनेकांनी सुट्टी अर्ध्यावर टाकून नोकरीच्या ठिकाणी जाण्याची तयारी केली आहे.मांसाहारावर परिणामकोरोना व्हायरसचा धसका रत्नागिरीकरांनीही घेतला आहे. त्यामुळे कित्येकांना चिकन खाणे बंद केले आहे. याचा परिणाम चायनीज विक्रेत्यांवर झाला आहे. चिकन विक्री करणाऱ्यांनी खप थांबल्याने दरच खाली आणले आहेत.

शहरातील ठिकठिकाणी चिकन विक्रेत्यांच्या दुकानात ३५ रूपये किलो दराने विक्री सुरू होती. जेमतेम १० टक्केच मंडळी चिकन खात आहेत. त्यामुळे दिवसाला १५० ते २०० किलो चिकन विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे व्यवसाय मंदावले आहेत. ग्राहकांची वाट पाहात विक्रेत्यांना दुकानात बसावे लागत आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाKonkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी