शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मुंबई ते दाभोळ मार्गावर जल वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 17:38 IST

दाभोळ धक्क्याला आता पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार आहेत. मुंबई ते दाभोळ या मार्गावर जल वाहतूक सुरू झाली असून सकाळी ११ वाजता मुंबईहून दाभोळला रवाना झालेली बोट आता दिघी बंदरातून दाभोळकडे निघाली आहे.

ठळक मुद्देदाभोळ धक्क्याला आता पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार बोट दिघी बंदरातून दाभोळकडे निघाली मेरिटाइम बोर्डाने सुरू केली प्रवासी जल वाहतूक सेवा

शिवाजी गोरे

दापोली : दाभोळ धक्क्याला आता पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार आहेत. मुंबई ते दाभोळ या मार्गावर जल वाहतूक सुरू झाली असून सकाळी ११ वाजता मुंबईहून दाभोळला रवाना झालेली बोट आता दिघी बंदरातून दाभोळकडे निघाली आहे.

महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी व पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी मेरिटाइम बोर्डाने प्रवासी सेवा सुरू केली असून, या सेवेचा आनंद लुटण्यासाठी हौशी पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे.

कोकणातील महामार्गावरील वाहतूक कोंडी पर्यटकांची डोकेदुखी बनली असून, महामार्ग अनेक ठिकाणी मृत्यूचा सापळा झाला आहे. या रस्त्यावर दरवर्षी शेकडो निष्पाप लोकांचे प्राण जात आहेत. रस्त्यावरील ताण कमी करून पर्यायी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने मेरिटाइम बोर्डाने हे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे पर्यटकांची गैरसोय दूर होऊन पर्यटनाला मोठी उभारी मिळणार आहे.दापोलीचे पर्यटन तज्ज्ञ माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल यांनी दाभोळ - धोपावे , तवसाळ - जयगड , वेसवी - बागमंडले , दिघी - आगरदांडा पाच खाड्यांवर फेरीबोट सेवा सुरू केली आहे. त्यामुळे पर्यटनासाठी जोड मिळाली आहे.मुंबई -दाभोळ बोट सेवेचे दिघी बंदर येथे दिघी बंदर अधीक्षक अरविंद सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत मोकल, डॉ. विद्या मोकल यांनी स्वागत केले. मुंबई - दाभोळ अशी जाणारी रावे नावाची ही बोट 35 प्रवासी घेऊन आली आहे.

टॅग्स :konkanकोकणTravelप्रवास