शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आरजीपीपीएल कंपनीतील प्रदूषित पाण्यामुळे पाण्याचे स्रोत दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:32 IST

गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएल कंपनीतून साेडण्यात आलेल्या प्रदूषित पाण्यामुळे अंजनवेल परिसरातील पाण्याचे स्राेत दूषित झाले आहेत. लाेकमत न्यूज ...

गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएल कंपनीतून साेडण्यात आलेल्या प्रदूषित पाण्यामुळे अंजनवेल परिसरातील पाण्याचे स्राेत दूषित झाले आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्क

गुहागर/असगोली : तालुक्यातील आरजीपीपीएल कंपनीतून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील नैसर्गिक पाण्याचे झरे, विहिरी क्षारयुक्त आणि दूषित झाल्या आहेत. यामुळे पिण्याचे पाणी खारट आणि मचूळ झाले असून, हे पाणी पिण्यास धोक्याचे बनले आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. यापूर्वीही १९९९ मध्ये येथील अशाच प्रकारे पाणी दूषित झाले होते. त्यानंतर पुन्हा ही समस्या उभी राहिली आहे.

कंपनी आवारातील पाईपलाईन फुटल्यामुळे, त्याचप्रमाणे कुलिंग टॉवरमध्ये शितलीकरणासाठी वापरण्यात येणारे समुद्राचे क्षारयुक्त पाणी अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील डोंगर उतारावर असलेल्या नैसर्गिक गोड्या पाण्याचे झरे आणि विहिरी यामध्ये झिरपल्यामुळे गेल्या दोन

महिन्यांपासून हे नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित झाले आहेत. या पाण्याची चव खारट आणि मचूळ अशा स्वरुपाची झाली आहे. हे पाणी पिण्यास खूपच त्रासदायक होत आहे. नैसर्गिकरीत्या पाण्यातील क्षार अथवा मचूळपणा निघून जाईल याबाबत गेले पन्नास दिवस वाट पाहिली; परंतु अद्याप हे नैसर्गिक जलस्रोत पूर्ववत झालेले नाहीत. हे पाणी प्यायल्याने आता साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत तातडीने पाणी प्रदूषणाबाबतची योग्य ती अधिकृत चाचणी करून या अहवालाची प्रत आम्हाला पाठवावी. तसेच तातडीने उपाययोजना करून कंपनी अंतर्गत नादुरुस्त, फुटक्या जलवाहिन्या, कुलिंग टॉवरचे शितलीकरणाचे क्षारयुक्त पाण्याचे वाहते विस्कळीत प्रवाह याचा तातडीने शोध घेऊन ते दुरुस्त करावेत, असे पत्रही हे रत्नागिरी गॅस अँड पॉवर लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाला दिले आहे.

कंपनीमधून येणारे क्षारयुक्त प्रदूषित पाणी डोंगर उतारावरून विहिरी झरे यांच्यामध्ये मिसळत आहे ते तातडीने बंद करावे. याची दुरुस्ती न केल्यास क्षारयुक्त प्रदूषित पाणी येणे बंद होणे शक्य नाही. या प्रदूषणामुळे प्रभावित झालेल्या सर्व घरांना कंपनीकडून लवकरात लवकर शुद्ध गोड्या पाण्याचा पुरवठा केला जावा, अशी मागणी ग्रामस्थांनी रत्नागिरी गॅस अँड पॉवर लिमिटेड या कंपनीकडे केली आहे.