शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

‘जलयुक्त शिवार’मधील गावेही टंचाई कृती आराखड्यात

By admin | Updated: March 23, 2016 00:20 IST

राजापूर तालुका : पंचायत समिती सदस्यही अनभिज्ञच

राजापूर : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणात खर्च होऊनदेखील नियुक्त केलेली गावे तालुक्याच्या टंचाईकृती आराखड्यात समाविष्ट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पंचायत समितीमधील सदस्यच याबाबत अनभिज्ञ राहिल्याने वर्षभराहून अधिक कालावधी लोटला तरी जलयुक्त शिवार या योजनेचा मुद्दा एकाही मासिक बैठकीत उपस्थित न झाल्याचे यामुळे धक्कादायकरित्या पुढे आले आहे.राजापूर पंचायत समितीच्या मासिक बैठकीत गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांनी प्रथम जलयुक्त शिवार योजनेबाबतचा मुद्दा सभागृहात उपस्थित करताना मागील वर्षी शासनाने पाच गावे निवडली होती व चालू वर्षासाठी आणखी तीन गावे निवडण्यात आल्याची माहिती दिली व प्रथमच जलयुक्त शिवार या विषयावर सभागृहात चर्चा झाली.गतवर्षी शासनाने निकषानुसार राजापूर तालुक्यातील मोरोशी, कारवली, ताम्हाने, खरवते व झर्ये ही गावे निवडली होती. त्यानंतर त्या गावात जलयुक्त शिवार योजनेतील कामे ठरवून ती सुरु करण्यात आली. त्यावर खर्चदेखील मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. तथापि, एवढा खर्च करण्यात येऊन देखील ती पाचही गावे राजापूर तालुका टंचाईकृती आराखड्यात समाविष्ट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जर ही गावे तालुका टंचाईकृती आराखड्यात समाविष्ट होत असतील तर मग जलयुक्त शिवार योजनेतून त्या गावात कोणती कामे मार्गी लागली व शासनाकडून खर्च कशावर करण्यात आला? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. शासनाने यावर्षी आणखी तीन गावे जलयुक्त शिवार योजनेत निवडली असून, त्यामध्ये तालुक्यातील करक, तळवडे व जवळेथर या गावांचा समावेश आहे.दोन वर्षात निवडलेल्या या आठ गावांपैकी मोरोशी, खरवते व जवळेथर ही तीन गावे वगळता उर्वरित पाच गावांमध्ये धरण प्रकल्पांची कामे पूर्ण किंवा अपूर्ण अवस्थेत आहेत. यामध्ये तळवडे, करक या गावांमधील धरणे पूर्ण बांधून झाली आहेत. तर पूर्व परिसरातील सर्वात मोठ्या अशा अर्जुना प्रकल्पाच्या लगतच कारवली गाव येते. झर्ये, ताम्हाने या गावांमधील धरण व पाझर तलाव हे अपूर्णावस्थेत आहेत. जर या पाणी योजना सुरळीत चालल्या असत्या, तर जलयुक्त शिवार योजनेत त्यांचा समावेश करावा लागला नसता. असा आंधळा कारभार सुरु असताना ही योजना सुरु झाल्यानंतर सुमारे वर्षाहून अधिक कालखंड उलटला, तरी राजापूर पंचायत समितीच्या एकाही मासिक सभेत त्यावर चर्चा न झाल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत खुद्द पंचायत समिती सदस्यच अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे. यामुळेच एकाही सभेला जलयुक्त शिवार या योजनेबाबत साधी चर्चाही सभागृहात पार पडली नाही. दुसरीकडे ही योजना यशस्वी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर प्रामुख्याने होती, त्या तालुका कृषी विभागाने देखील कधीच या योजनेबाबत सभागृहाला माहिती देण्याचा प्रयत्न केला नाही, ही दुसरी बाजूदेखील यामुळे पुढे आली आहे.तसेच शासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च होऊन देखील या योजनेतील गावे ही टंचाईकृती आराखड्यात कशी काय समाविष्ट झाली? याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)योजनेबाबत अनास्थाया योजनेला चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून प्रयत्न सुरु असतानाच पंचायत समितीच्या दर महिन्याला होणाऱ्या मासिक सभेत वर्षभरात या योजनेवर कुठल्याच प्रकारचे भाष्य झाले नाही. त्यावरुन स्थानिक प्रशासन व शासन यांना जलयुक्त शिवार योजनेबाबत किती आस्था आहे, हेच दिसून आले आहे.