शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांपुरतेच पाणी शिल्लक : पाऊस न झाल्यास ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 13:56 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून रत्नागिरी (मिरजोळे व झाडगाव) औद्योगिक क्षेत्र रत्नागिरी, नगरपरिषद काही भाग, ग्रामपंचायती, शिरगाव, नाचणे, कुवारबाव, कर्ला, मिऱ्या, मिरजोळे, टिके, पोमेंडी, चिंद्रवली व इतर खासगी ग्राहकांना नियमित पाणी पुरवठा केला जातो. मात्र, महामंडळाकडील धरणांमध्ये आता केवळ ८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उरल्याने पाऊस न पडल्यास पाणीपुरवठा बंद करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रत्नागिरी यांनी केले आहे.

ठळक मुद्देआठ दिवसांपुरतेच पाणी शिल्लक : एमआयडीसी धरणांतील साठा संपलापाऊस न झाल्यास ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा बंद!

रत्नागिरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून रत्नागिरी (मिरजोळे व झाडगाव) औद्योगिक क्षेत्र रत्नागिरी, नगरपरिषद काही भाग, ग्रामपंचायती, शिरगाव, नाचणे, कुवारबाव, कर्ला, मिऱ्या, मिरजोळे, टिके, पोमेंडी, चिंद्रवली व इतर खासगी ग्राहकांना नियमित पाणी पुरवठा केला जातो. मात्र, महामंडळाकडील धरणांमध्ये आता केवळ ८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उरल्याने पाऊस न पडल्यास पाणीपुरवठा बंद करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रत्नागिरी यांनी केले आहे.गेल्यावर्षी परतीचा पाऊस पुरेसा न झाल्याने बाष्पीभवनाने बंधाºयातील पाणीसाठा प्रचंड प्रमाणामध्ये कमी झाला. त्यावर पर्याय म्हणून महामंडळाने पाटबंधारे विभाग कुवारबाव यांच्याकडे त्यांच्या शिपोशी धरणातून तीन लाख घनमीटर पाण्याची मागणी केली होती. त्यासाठी १४ लाख ८३२ रुपये एवढी रक्कम एमआयडीसीने जमा केली. त्यानुसार ३ एप्रिल २०१९ पासून शिपोशी धरणातून पाणी सोडण्यात आले. पाणी हरचेरी येथील धरणामध्ये पोहोचण्यासाठी अंदाजे ३२ किलोमीटर अंतर पार करावे लागले.महामंडळाने उपलब्ध पाणीसाठा पुरविण्याच्या दृष्टीने प्रथम २५ टक्के कपातीचे धोरण अवलंबिले. त्यानंतर साठा कमी होत गेल्यामुळे २ जून २०१९पासून अधिक २५ टक्के कपात करण्यात आली होती. ७ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु ठेवला. साठाच अल्प राहिल्याने अखेर १३ जूनपासून उर्वरित पाणी दोन दिवसाआड पुरविले जाऊ लागले. आता फक्त आठ दिवसाचा पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस पडला नाही तर पुरवठा शक्य होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.सहकार्याचे आवाहनपाणी पुरवठा बंद झाल्यास जनप्रक्षोभ निर्माण होण्याची शक्यता आहे. महामंडळाने पाणीपुरवठा करण्याकरीता आटोकाट प्रयत्न केले आहे तथापि परिस्थिती हाताबाहेर चालल्याने पाणीपुरवठा करणे अशक्य होईल. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पाऊस आला...एकिकडे एमआयडिसीने ८ दिवस पुरेल इतकाच पाणी साठा असल्याचे स्पष्ट केले आहे तर दुसरीकडे बुधवारी सायंकाळपासून रत्नागिरी परिसरात दमदार हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रातही पाऊस सुरू झाल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे या पावसामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRatnagiriरत्नागिरी