शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

आठ दिवसांपुरतेच पाणी शिल्लक : पाऊस न झाल्यास ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 13:56 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून रत्नागिरी (मिरजोळे व झाडगाव) औद्योगिक क्षेत्र रत्नागिरी, नगरपरिषद काही भाग, ग्रामपंचायती, शिरगाव, नाचणे, कुवारबाव, कर्ला, मिऱ्या, मिरजोळे, टिके, पोमेंडी, चिंद्रवली व इतर खासगी ग्राहकांना नियमित पाणी पुरवठा केला जातो. मात्र, महामंडळाकडील धरणांमध्ये आता केवळ ८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उरल्याने पाऊस न पडल्यास पाणीपुरवठा बंद करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रत्नागिरी यांनी केले आहे.

ठळक मुद्देआठ दिवसांपुरतेच पाणी शिल्लक : एमआयडीसी धरणांतील साठा संपलापाऊस न झाल्यास ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा बंद!

रत्नागिरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून रत्नागिरी (मिरजोळे व झाडगाव) औद्योगिक क्षेत्र रत्नागिरी, नगरपरिषद काही भाग, ग्रामपंचायती, शिरगाव, नाचणे, कुवारबाव, कर्ला, मिऱ्या, मिरजोळे, टिके, पोमेंडी, चिंद्रवली व इतर खासगी ग्राहकांना नियमित पाणी पुरवठा केला जातो. मात्र, महामंडळाकडील धरणांमध्ये आता केवळ ८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उरल्याने पाऊस न पडल्यास पाणीपुरवठा बंद करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रत्नागिरी यांनी केले आहे.गेल्यावर्षी परतीचा पाऊस पुरेसा न झाल्याने बाष्पीभवनाने बंधाºयातील पाणीसाठा प्रचंड प्रमाणामध्ये कमी झाला. त्यावर पर्याय म्हणून महामंडळाने पाटबंधारे विभाग कुवारबाव यांच्याकडे त्यांच्या शिपोशी धरणातून तीन लाख घनमीटर पाण्याची मागणी केली होती. त्यासाठी १४ लाख ८३२ रुपये एवढी रक्कम एमआयडीसीने जमा केली. त्यानुसार ३ एप्रिल २०१९ पासून शिपोशी धरणातून पाणी सोडण्यात आले. पाणी हरचेरी येथील धरणामध्ये पोहोचण्यासाठी अंदाजे ३२ किलोमीटर अंतर पार करावे लागले.महामंडळाने उपलब्ध पाणीसाठा पुरविण्याच्या दृष्टीने प्रथम २५ टक्के कपातीचे धोरण अवलंबिले. त्यानंतर साठा कमी होत गेल्यामुळे २ जून २०१९पासून अधिक २५ टक्के कपात करण्यात आली होती. ७ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु ठेवला. साठाच अल्प राहिल्याने अखेर १३ जूनपासून उर्वरित पाणी दोन दिवसाआड पुरविले जाऊ लागले. आता फक्त आठ दिवसाचा पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस पडला नाही तर पुरवठा शक्य होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.सहकार्याचे आवाहनपाणी पुरवठा बंद झाल्यास जनप्रक्षोभ निर्माण होण्याची शक्यता आहे. महामंडळाने पाणीपुरवठा करण्याकरीता आटोकाट प्रयत्न केले आहे तथापि परिस्थिती हाताबाहेर चालल्याने पाणीपुरवठा करणे अशक्य होईल. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पाऊस आला...एकिकडे एमआयडिसीने ८ दिवस पुरेल इतकाच पाणी साठा असल्याचे स्पष्ट केले आहे तर दुसरीकडे बुधवारी सायंकाळपासून रत्नागिरी परिसरात दमदार हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रातही पाऊस सुरू झाल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे या पावसामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRatnagiriरत्नागिरी