शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

आठ दिवसांपुरतेच पाणी शिल्लक : पाऊस न झाल्यास ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 13:56 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून रत्नागिरी (मिरजोळे व झाडगाव) औद्योगिक क्षेत्र रत्नागिरी, नगरपरिषद काही भाग, ग्रामपंचायती, शिरगाव, नाचणे, कुवारबाव, कर्ला, मिऱ्या, मिरजोळे, टिके, पोमेंडी, चिंद्रवली व इतर खासगी ग्राहकांना नियमित पाणी पुरवठा केला जातो. मात्र, महामंडळाकडील धरणांमध्ये आता केवळ ८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उरल्याने पाऊस न पडल्यास पाणीपुरवठा बंद करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रत्नागिरी यांनी केले आहे.

ठळक मुद्देआठ दिवसांपुरतेच पाणी शिल्लक : एमआयडीसी धरणांतील साठा संपलापाऊस न झाल्यास ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा बंद!

रत्नागिरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून रत्नागिरी (मिरजोळे व झाडगाव) औद्योगिक क्षेत्र रत्नागिरी, नगरपरिषद काही भाग, ग्रामपंचायती, शिरगाव, नाचणे, कुवारबाव, कर्ला, मिऱ्या, मिरजोळे, टिके, पोमेंडी, चिंद्रवली व इतर खासगी ग्राहकांना नियमित पाणी पुरवठा केला जातो. मात्र, महामंडळाकडील धरणांमध्ये आता केवळ ८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उरल्याने पाऊस न पडल्यास पाणीपुरवठा बंद करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रत्नागिरी यांनी केले आहे.गेल्यावर्षी परतीचा पाऊस पुरेसा न झाल्याने बाष्पीभवनाने बंधाºयातील पाणीसाठा प्रचंड प्रमाणामध्ये कमी झाला. त्यावर पर्याय म्हणून महामंडळाने पाटबंधारे विभाग कुवारबाव यांच्याकडे त्यांच्या शिपोशी धरणातून तीन लाख घनमीटर पाण्याची मागणी केली होती. त्यासाठी १४ लाख ८३२ रुपये एवढी रक्कम एमआयडीसीने जमा केली. त्यानुसार ३ एप्रिल २०१९ पासून शिपोशी धरणातून पाणी सोडण्यात आले. पाणी हरचेरी येथील धरणामध्ये पोहोचण्यासाठी अंदाजे ३२ किलोमीटर अंतर पार करावे लागले.महामंडळाने उपलब्ध पाणीसाठा पुरविण्याच्या दृष्टीने प्रथम २५ टक्के कपातीचे धोरण अवलंबिले. त्यानंतर साठा कमी होत गेल्यामुळे २ जून २०१९पासून अधिक २५ टक्के कपात करण्यात आली होती. ७ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु ठेवला. साठाच अल्प राहिल्याने अखेर १३ जूनपासून उर्वरित पाणी दोन दिवसाआड पुरविले जाऊ लागले. आता फक्त आठ दिवसाचा पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस पडला नाही तर पुरवठा शक्य होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.सहकार्याचे आवाहनपाणी पुरवठा बंद झाल्यास जनप्रक्षोभ निर्माण होण्याची शक्यता आहे. महामंडळाने पाणीपुरवठा करण्याकरीता आटोकाट प्रयत्न केले आहे तथापि परिस्थिती हाताबाहेर चालल्याने पाणीपुरवठा करणे अशक्य होईल. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पाऊस आला...एकिकडे एमआयडिसीने ८ दिवस पुरेल इतकाच पाणी साठा असल्याचे स्पष्ट केले आहे तर दुसरीकडे बुधवारी सायंकाळपासून रत्नागिरी परिसरात दमदार हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रातही पाऊस सुरू झाल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे या पावसामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRatnagiriरत्नागिरी