शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

संगमेश्वरची पाणीपातळी घटली

By admin | Updated: May 21, 2015 00:08 IST

पंचायत समिती : १६ गावातील ९ वाड्यांना पाणीटंचाईची झळ

देवरुख : वाढत्या उष्णतेमुळे संगमेश्वर तालुक्यात पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. तसेच पाण्याचे स्रोतही आटू लागल्याने तालुक्यात पाणीटंचाई तीव्र होत आहे. सध्या १६ गावांतील ९ वाड्यांना पाण्याची तीव्रता भासू लागली असून, त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तालुक्यातील १७ गावे आणि २३ वाड्यांना पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. तालुक्यात यावर्षी पहिला टँकर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु झाला. मात्र, पाणीटंचाईची झळ मार्च अखेरपासूनच चालू झाली होती. आता पाणीटंचाईची ही भीषणता दिवसागणीक वाढत आहे. १६ गावांतील २२ वाड्यांसाठी केवळ तीन टँकर तहान भागवण्यासाठी धावत आहेत.पाणीटंचाईग्रस्त वाड्यांची संख्या आणि वाढत्या उन्हाचा विचार करता किमान ४-५ टँकरची आवश्यकता आहे. मात्र, सध्या तीन टँकर्सवरच काम रेटून नेले जात आहे. या तीन टँकरमध्ये २ शासकीय व १ खासगी टँकरचा समावेश आहे. यापलिकडे काही गावांना पाणीटंचाई भासत आहे. मात्र त्या गावांनी टँकरची मागणी अद्याप केलेली नाही. त्यामुळे त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.कडवई घोसाळकरकोंड, पुर्येतर्फे देवळे, चव्हाणवाडी, बेलारी माचीवाडी, फुणगूस घडशीवाडी, धामापूरतर्फ देवरुख, पाचांबे, नेदरवाडी, दखीणपेठ, मेढे, निवळी धनगरवाडी, असुर्डेतील भिरकोंड, साखळकोंड, रांगवमधील गवळवाडी, धनगरवडी, शेनवडे, गवळवाडी तसेच सायले बौद्धवाडी, राजिवली येडगेवाडी, मधलीवाडी या गावांचा आणि वाड्यांचा पाणीटंचाईग्रस्तांमध्ये समावेश आहे.याखेरीज अजूनही काही गावांना पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. त्यांनी टँकरसाठी मागणी नोंदवली आहे. तालुक्यातील तांबेडी - धनगरवाडीतही टँकरची मागणी होत आहे. प्रस्ताव तयार झाला असून, पाहाणीनंतर गावाला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यावर्षी उन्हाचा पारा अधिकच वाढत असून, नागरिक पुरते हैराण झाले आहेत. (प्रतिनिधी)