शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

संगमेश्वरची पाणीपातळी घटली

By admin | Updated: May 21, 2015 00:08 IST

पंचायत समिती : १६ गावातील ९ वाड्यांना पाणीटंचाईची झळ

देवरुख : वाढत्या उष्णतेमुळे संगमेश्वर तालुक्यात पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. तसेच पाण्याचे स्रोतही आटू लागल्याने तालुक्यात पाणीटंचाई तीव्र होत आहे. सध्या १६ गावांतील ९ वाड्यांना पाण्याची तीव्रता भासू लागली असून, त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तालुक्यातील १७ गावे आणि २३ वाड्यांना पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. तालुक्यात यावर्षी पहिला टँकर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु झाला. मात्र, पाणीटंचाईची झळ मार्च अखेरपासूनच चालू झाली होती. आता पाणीटंचाईची ही भीषणता दिवसागणीक वाढत आहे. १६ गावांतील २२ वाड्यांसाठी केवळ तीन टँकर तहान भागवण्यासाठी धावत आहेत.पाणीटंचाईग्रस्त वाड्यांची संख्या आणि वाढत्या उन्हाचा विचार करता किमान ४-५ टँकरची आवश्यकता आहे. मात्र, सध्या तीन टँकर्सवरच काम रेटून नेले जात आहे. या तीन टँकरमध्ये २ शासकीय व १ खासगी टँकरचा समावेश आहे. यापलिकडे काही गावांना पाणीटंचाई भासत आहे. मात्र त्या गावांनी टँकरची मागणी अद्याप केलेली नाही. त्यामुळे त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.कडवई घोसाळकरकोंड, पुर्येतर्फे देवळे, चव्हाणवाडी, बेलारी माचीवाडी, फुणगूस घडशीवाडी, धामापूरतर्फ देवरुख, पाचांबे, नेदरवाडी, दखीणपेठ, मेढे, निवळी धनगरवाडी, असुर्डेतील भिरकोंड, साखळकोंड, रांगवमधील गवळवाडी, धनगरवडी, शेनवडे, गवळवाडी तसेच सायले बौद्धवाडी, राजिवली येडगेवाडी, मधलीवाडी या गावांचा आणि वाड्यांचा पाणीटंचाईग्रस्तांमध्ये समावेश आहे.याखेरीज अजूनही काही गावांना पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. त्यांनी टँकरसाठी मागणी नोंदवली आहे. तालुक्यातील तांबेडी - धनगरवाडीतही टँकरची मागणी होत आहे. प्रस्ताव तयार झाला असून, पाहाणीनंतर गावाला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यावर्षी उन्हाचा पारा अधिकच वाढत असून, नागरिक पुरते हैराण झाले आहेत. (प्रतिनिधी)