शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वरची पाणीपातळी घटली

By admin | Updated: May 21, 2015 00:08 IST

पंचायत समिती : १६ गावातील ९ वाड्यांना पाणीटंचाईची झळ

देवरुख : वाढत्या उष्णतेमुळे संगमेश्वर तालुक्यात पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. तसेच पाण्याचे स्रोतही आटू लागल्याने तालुक्यात पाणीटंचाई तीव्र होत आहे. सध्या १६ गावांतील ९ वाड्यांना पाण्याची तीव्रता भासू लागली असून, त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तालुक्यातील १७ गावे आणि २३ वाड्यांना पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. तालुक्यात यावर्षी पहिला टँकर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु झाला. मात्र, पाणीटंचाईची झळ मार्च अखेरपासूनच चालू झाली होती. आता पाणीटंचाईची ही भीषणता दिवसागणीक वाढत आहे. १६ गावांतील २२ वाड्यांसाठी केवळ तीन टँकर तहान भागवण्यासाठी धावत आहेत.पाणीटंचाईग्रस्त वाड्यांची संख्या आणि वाढत्या उन्हाचा विचार करता किमान ४-५ टँकरची आवश्यकता आहे. मात्र, सध्या तीन टँकर्सवरच काम रेटून नेले जात आहे. या तीन टँकरमध्ये २ शासकीय व १ खासगी टँकरचा समावेश आहे. यापलिकडे काही गावांना पाणीटंचाई भासत आहे. मात्र त्या गावांनी टँकरची मागणी अद्याप केलेली नाही. त्यामुळे त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.कडवई घोसाळकरकोंड, पुर्येतर्फे देवळे, चव्हाणवाडी, बेलारी माचीवाडी, फुणगूस घडशीवाडी, धामापूरतर्फ देवरुख, पाचांबे, नेदरवाडी, दखीणपेठ, मेढे, निवळी धनगरवाडी, असुर्डेतील भिरकोंड, साखळकोंड, रांगवमधील गवळवाडी, धनगरवडी, शेनवडे, गवळवाडी तसेच सायले बौद्धवाडी, राजिवली येडगेवाडी, मधलीवाडी या गावांचा आणि वाड्यांचा पाणीटंचाईग्रस्तांमध्ये समावेश आहे.याखेरीज अजूनही काही गावांना पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. त्यांनी टँकरसाठी मागणी नोंदवली आहे. तालुक्यातील तांबेडी - धनगरवाडीतही टँकरची मागणी होत आहे. प्रस्ताव तयार झाला असून, पाहाणीनंतर गावाला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यावर्षी उन्हाचा पारा अधिकच वाढत असून, नागरिक पुरते हैराण झाले आहेत. (प्रतिनिधी)