शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

रिफायनरी विरोधात आता रत्नागिरी ते सिंधुदुर्ग रास्ता रोको करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 15:59 IST

राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात येत्या काही दिवसांत मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीच्या सीमेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदापर्यंत रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देरिफायनरी विरोधात आता रत्नागिरी ते सिंधुदुर्ग रास्ता रोको करण्याचा इशाराप्रकल्पग्रस्तांकडून काळे झेंडे फडकावून निषेध

राजापूर : तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेतून विरोध केला जात असताना मुख्यमंत्र्यांनी या विरोधाकडे कानाडोळा केला आहे. प्रकल्प विरोधकांनी प्रकल्पाच्या विरोधात एकापाठोपाठ असे आंदोलन सत्र सुरू ठेवले आहे. नागपूर अधिवेशनात धरणे आंदोलन, मुंबईत दादर येथे निदर्शने झाल्यानंतर बुधवारी राजापूर तालुक्यातील डोंगर तिठा येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. येत्या काही दिवसांत मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीच्या सीमेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदापर्यंत रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

येत्या काही दिवसात दखल घेऊन प्रकल्प रद्द न केल्यास काही दिवसात रायगड रत्नागिरी सिमेपासून थेट बांदापर्यंत रास्ता रोको करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नाणार प्रकल्पाला प्रकल्पग्रस्त जनतेचा कडाडून विरोध होत असताना शासन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाणारबाबत पर्यावरणीय बाबींचा अभ्यास करून समृध्दीप्रमाणे चर्चा करण्याची भाषा करत आहेत. प्रकल्प विरोधकांनी आंदोलन, मोर्चे, निवेदने यांच्या माध्यमातून आपला विरोध शासनापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांना प्रकल्पग्रस्त जनतेचा विरोध दिसत नाही. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात आंदोलनाचे सत्र सुरू करण्यात आले असल्याचे यावेळी प्रकल्पग्रस्तांनी सांगितले.दरम्यान, प्रथम नागपूर अधिवेशनात धरणे आंदोलन, नंतर मुंबई दादर येथे निदर्शने झाल्यानंतर बुधवारी राजापूर तालुक्यातील डोंगर येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रकल्पाला विरोध माहिती असूनही येथील जनतेसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री येणार असे सांगत आहेत. मात्र आता येथील ग्रामस्थांना या प्रकल्पाबाबत चर्चा करण्याची इच्छाच नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. या प्रकल्पाला येथील जनतेचा सुरूवातीपासूनच विरोध आहे व आजही तो कायम आहे. हा प्रकल्प येथून रद्द करण्यात यावा, या एकमेव मागणीशिवाय येथील जनतेची अन्य कोणतीही मागणी नाही. शासनाला हा विरोध कळत नसेल तर भविष्यात प्रकल्पाविरोधात उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी काळे झेंडे फडकावत निषेध केला.यावेळी रिफायनरीविरोधी शेतकरी, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम, ओंकार प्रभुदेसाई, सचिव भाई सामंत यांच्यासह अन्य पदाधिकारी, सदस्य तसेच शिवसेनेचे नूतन राजापूर तालुका संपर्कप्रमुख व अवजड वाहतूक सेनेचे कोकण विभाग महाराष्ट्र राज्य सचिव दिनेश जैतापकर, राजापूर तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुकाप्रमुख, राजापूर सभापती अभिजीत तेली, जिल्हा परिषद सदस्य दरपक नागले आदी सेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक उपस्थित होते.आता रत्नागिरीपासून बांदापर्यंत रास्ता रोकोयेथील प्रकल्पग्रस्तांची प्रकल्प रद्द ही एकच जिद्द आहे. शासनाने या मागणीचा विचार करून प्रकल्प रद्द करावा, अन्यथा येत्या काही दिवसांत मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीच्या सीमेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदापर्यंत रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत विधान परिषदेचे अधिवेशन संपल्यानंतर रास्ता रोकोचे नियोजन व तारीख नक्की केली जाणार असल्याची माहिती अरविंद उर्फ भाई सामंत यांनी दिली.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी