शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

५० ग्रामपंचायतींसाठी १९ डिसेंबरला मतदान

By admin | Updated: November 21, 2015 23:58 IST

राज्य निवडणूक आयुक्त सहारीया यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला

रत्नागिरी : राज्यातील विविध २७ जिल्ह्यातील १७३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १९ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारीया यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दि. १९ रोजी मतदान झाल्यानंतर दि. २१ रोजी मतमोजणी होणार आहे. संबंधित सर्व ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी ते एप्रिल २०१६ अखेर संपत आहे. ग्रामपंचायती क्षेत्रात शनिवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे. ठाणे ३, रायगड ५, रत्नागिरी ५०, सिंधुदुर्ग २ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक नोेटीस दि. २७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारण्याची तारीख ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर असणार आहे. नामनिर्देशनाची छाननी ५ रोजी तर मागे घेणे व निवडणूक चिन्हांचे वाटप ८ रोजी होणार आहे. (प्रतिनिधी) निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती राजापूर तालुका- मोगरे, वडदहसोळ, राजवाडी, आंगले, देवाचे गोठणे, भालावली, केळवली, मूर, सागवे. मंडणगड तालुका- घराडी, निगडी. दापोली तालुका- इनामपांगरी, नवसे, गावतळे, फणसू. खेड तालुका- सुसेरी, नांदगाव, तळघर, वडगाव बु., देवघर, आस्तान, असगणी. चिपळूण तालुका- पोफळी. गुहागर तालुका- अंजनवेल, वेलदूर, वेळंब, चिंद्रवळे. संगमेश्वर तालुका- असुर्डे, कोंड असुर्डे, आंबेडबुद्रुक. रत्नागिरी तालुका- फणसोप, शिरगाव, पोमेंडीबुद्रुक. लांजा- वेरवली बुद्रुक, कोचरी, कोर्ले, गोविळ, ताम्हाणे, कोल्हे, रिंगणे, शिरवली, व्हेळ, हर्चे, देवधे, कोंड्ये, झापडे, प्रभानवल्ली, उपळे.