शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

शेवटच्या संधीला आता मतदारच कंटाळले,नव्यांची उपेक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:14 IST

Elecation Ratnagiri -आता एक शेवटची संधी द्या, असे म्हणत वर्षानुवर्षे राजकीय बस्तान मांडणाऱ्या उमेदवारांना आता मतदारही कंटाळले आहेत. वर्षानुवर्षे निवडणूक म्हणजे आपलीच खोतकी असल्याचे समजणाऱ्यांना मतदारांकडूनच आता विरोध होऊ लागला आहे. निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी कधी मिळणार, असा प्रश्न करत अहो दादा, भाई, मामा, आबा आता तरी थांबा, असे म्हणण्याची वेळ रत्नागिरी शहरानजीकच्या एका ग्रामपंचायत हद्दीत आली आहे.

ठळक मुद्दे वर्षानुवर्षांच्या खोतकीला विरोध, ग्रामपंचायत निवडणूक रंगात नवीन उमेदवारांना संधी मिळत नसल्याची खंत, लोकप्रतिनिधीही नव्यांना डावलतात 

रत्नागिरी : आता एक शेवटची संधी द्या, असे म्हणत वर्षानुवर्षे राजकीय बस्तान मांडणाऱ्या उमेदवारांना आता मतदारही कंटाळले आहेत. वर्षानुवर्षे निवडणूक म्हणजे आपलीच खोतकी असल्याचे समजणाऱ्यांना मतदारांकडूनच आता विरोध होऊ लागला आहे. निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी कधी मिळणार, असा प्रश्न करत अहो दादा, भाई, मामा, आबा आता तरी थांबा, असे म्हणण्याची वेळ रत्नागिरी शहरानजीकच्या एका ग्रामपंचायत हद्दीत आली आहे.ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा होताच अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. रत्नागिरी शहरानजीकच्या शिवसेनेचे वर्चस्व असणाऱ्या एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. तालुक्यातील उमेदवारांची अंतिम यादी शिवसेनेतील वजनदार लोकप्रतिनिधी ठरविणार असल्याने त्यांची मनधरणी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी कधी रत्नागिरीत तर कधी त्यांच्या घरापर्यंत जाऊन उमेदवारीसाठी विनंत्या करत आहेत.शहरानजीकच्या या ग्रामपंचायत निवडणुकीत वर्षानुवर्षे तेच उमेदवार उभे राहात असल्याने नव्यांना संधी मिळत नाही. ग्रामपंचायतीपासून निवडणूक रिंगणात उभे राहणारे पुढे आमदार, खासदार होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, याठिकाणी चक्क उलटा प्रवास सुरू असून, एक शेवटची संधी द्या म्हणत अनेकांनी बस्तान मांडले आहे. तर काहीजण पुढच्यावेळी दुसऱ्याला संधी देऊ, असा शब्द देऊनही पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे नव्याने निवडणूक लढविणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. त्यातच वरिष्ठ स्तरावर नेहमीच्याच चेहऱ्यांना संधी दिली जात असल्याने नेमके काय गौडबंगाल आहे, याची चर्चा रंगत आहे. गेली अनेक वर्षे ग्रामपंचायत निवडणुकीला आपली खोतकी समजणाऱ्यांना आता तरी थांबा म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे....तर बहिष्कार टाकूग्रामपंचायत हद्दीतील एका प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र, गेल्या १५ वर्षात येथील स्थानिकांना संधी दिलेली नाही. यावेळी येथील ग्रामस्थांनी स्थानिकच उमेदवार हवा, असे सांगितले आहे. गावातील उमेदवार न दिल्यास निवडणुकीवरच बहिष्कार टाकू, असा इशारा दिला आहे.केवळ स्वत:च्या फायद्यासाठीच सदस्यत्वग्रामपंचायतीचा सदस्य होऊन ग्रामपंचायतीच्या निधीतून आपली पोळी भाजून घेण्याचा काहींना सपाटाच लावला आहे. त्यामुळे निवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अजून किती वर्ष संधी द्यायची, असा प्रश्न करत त्याच प्रभागात अन्य एकाने उमेदवारी मागितल्याने वादाची ठिणगी पडली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकRatnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण