शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

शेवटच्या संधीला आता मतदारच कंटाळले,नव्यांची उपेक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:14 IST

Elecation Ratnagiri -आता एक शेवटची संधी द्या, असे म्हणत वर्षानुवर्षे राजकीय बस्तान मांडणाऱ्या उमेदवारांना आता मतदारही कंटाळले आहेत. वर्षानुवर्षे निवडणूक म्हणजे आपलीच खोतकी असल्याचे समजणाऱ्यांना मतदारांकडूनच आता विरोध होऊ लागला आहे. निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी कधी मिळणार, असा प्रश्न करत अहो दादा, भाई, मामा, आबा आता तरी थांबा, असे म्हणण्याची वेळ रत्नागिरी शहरानजीकच्या एका ग्रामपंचायत हद्दीत आली आहे.

ठळक मुद्दे वर्षानुवर्षांच्या खोतकीला विरोध, ग्रामपंचायत निवडणूक रंगात नवीन उमेदवारांना संधी मिळत नसल्याची खंत, लोकप्रतिनिधीही नव्यांना डावलतात 

रत्नागिरी : आता एक शेवटची संधी द्या, असे म्हणत वर्षानुवर्षे राजकीय बस्तान मांडणाऱ्या उमेदवारांना आता मतदारही कंटाळले आहेत. वर्षानुवर्षे निवडणूक म्हणजे आपलीच खोतकी असल्याचे समजणाऱ्यांना मतदारांकडूनच आता विरोध होऊ लागला आहे. निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी कधी मिळणार, असा प्रश्न करत अहो दादा, भाई, मामा, आबा आता तरी थांबा, असे म्हणण्याची वेळ रत्नागिरी शहरानजीकच्या एका ग्रामपंचायत हद्दीत आली आहे.ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा होताच अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. रत्नागिरी शहरानजीकच्या शिवसेनेचे वर्चस्व असणाऱ्या एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. तालुक्यातील उमेदवारांची अंतिम यादी शिवसेनेतील वजनदार लोकप्रतिनिधी ठरविणार असल्याने त्यांची मनधरणी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी कधी रत्नागिरीत तर कधी त्यांच्या घरापर्यंत जाऊन उमेदवारीसाठी विनंत्या करत आहेत.शहरानजीकच्या या ग्रामपंचायत निवडणुकीत वर्षानुवर्षे तेच उमेदवार उभे राहात असल्याने नव्यांना संधी मिळत नाही. ग्रामपंचायतीपासून निवडणूक रिंगणात उभे राहणारे पुढे आमदार, खासदार होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, याठिकाणी चक्क उलटा प्रवास सुरू असून, एक शेवटची संधी द्या म्हणत अनेकांनी बस्तान मांडले आहे. तर काहीजण पुढच्यावेळी दुसऱ्याला संधी देऊ, असा शब्द देऊनही पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे नव्याने निवडणूक लढविणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. त्यातच वरिष्ठ स्तरावर नेहमीच्याच चेहऱ्यांना संधी दिली जात असल्याने नेमके काय गौडबंगाल आहे, याची चर्चा रंगत आहे. गेली अनेक वर्षे ग्रामपंचायत निवडणुकीला आपली खोतकी समजणाऱ्यांना आता तरी थांबा म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे....तर बहिष्कार टाकूग्रामपंचायत हद्दीतील एका प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र, गेल्या १५ वर्षात येथील स्थानिकांना संधी दिलेली नाही. यावेळी येथील ग्रामस्थांनी स्थानिकच उमेदवार हवा, असे सांगितले आहे. गावातील उमेदवार न दिल्यास निवडणुकीवरच बहिष्कार टाकू, असा इशारा दिला आहे.केवळ स्वत:च्या फायद्यासाठीच सदस्यत्वग्रामपंचायतीचा सदस्य होऊन ग्रामपंचायतीच्या निधीतून आपली पोळी भाजून घेण्याचा काहींना सपाटाच लावला आहे. त्यामुळे निवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अजून किती वर्ष संधी द्यायची, असा प्रश्न करत त्याच प्रभागात अन्य एकाने उमेदवारी मागितल्याने वादाची ठिणगी पडली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकRatnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण