शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

केंद्रीय मंत्र्यांचे लोकसभा मतदारसंघात दौरे; मात्र, प्रसारमाध्यमांचे वावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 18:40 IST

पुढील १८ महिन्यांच्या कालावधीत तब्बल सहावेळा केंद्रीय मंत्री त्यांच्यावर जबाबदारी दिलेल्या मतदार संघांचा दौरा करणार आहेत.

हर्षल शिरोडकरखेड : सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला पावणेदोन वर्षांचा कालावधी शिल्लक असला, तरी भाजपने राज्यातील काही महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी केंद्रीय मंत्री लोकसभा मतदार संघांचा दौरा करत असून, सोमवार (दि. २२; पासून केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी रायगड लोकसभा मतदार संघाचा दौरा खेडमधून सुरू केला. मात्र, या दौऱ्यात त्यांनी माध्यम प्रतिनिधींना दूर ठेवले.रविवारी (दि.२१) मंत्र्यांचे खेडमध्ये आगमन झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अपयश आलेल्या १६ मतदार संघांवर भाजपने विशेष लक्ष दिले असून, नऊ केंद्रीय मंत्री या मतदारसंघांत ठाण मांडणार आहेत. पुढील १८ महिन्यांच्या कालावधीत तब्बल सहावेळा केंद्रीय मंत्री त्यांच्यावर जबाबदारी दिलेल्या मतदार संघांचा दौरा करणार आहेत. यानुसार रायगड आणि शिर्डी मतदार संघाची जबाबदारी प्रल्हाद पटेल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.प्रत्येकी तीन दिवसांच्या या दौऱ्यात २१ कार्यक्रमांची रचना करण्यात आली असून, या काळात पक्षीय बदल, स्थानिक पातळीवरील अडचणी, संघटनात्मक कार्यक्रम, धार्मिक स्थळांना भेटी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असे कार्यक्रम नियोजित करण्यात आले आहेत. रायगड मतदार संघात भाजपची ताकद अत्यल्प आहे. मात्र, शिवसेनेने पडलेल्या फुटीमुळे आगामी निवडणुकीत चमत्कार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या दौऱ्यात केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या आहेत की नाही, धार्मिक स्थळांना भेटी, आध्यात्मिक गुरूंच्या गाठीभेटी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी, सहकार क्षेत्रातील अग्रणी नेते, व्यापारी, वकील, डॉक्टरांच्या वेगवेगळ्या बैठका, पत्रकार संवाद, सर्व स्तरावरील संघटनात्मक, शासकीय अधिकारी यांच्या बैठका तसेच स्वस्त धान्याच्या दुकानांतही भेट देणे अपेक्षित आहे.मात्र, पटेल यांनी पत्रकार संवाद साधलाच नाही. केंद्र सरकारकडून राबवविलेल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत नीटपणे पोहोचत आहेत का? याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री जागोजागी जातील व आपल्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या जिल्ह्यातील कार्यवाहीविषयी माहिती देतील अशी अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षा त्यांच्या पहिल्या वहिल्या दौऱ्यात फोल ठरल्या आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlok sabhaलोकसभाministerमंत्री