शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

निर्दोष सुटल्यानंतर मनाई आदेशाचा भंग, ४० जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 12:53 IST

न्यायालयाने निर्दोष ठरविल्यानंतर मुन्ना देसाईसह ११ संशयितांना रत्नागिरीच्या कारागृहातून हातखंबा येथे परत नेले जात होते. मात्र, मारूती मंदिरच्या पुढे बॅँक आॅफ इंडियासमोरील रस्त्यावर रॅली काढून वाहने धोकादायकरित्या हाकली.

ठळक मुद्देनिर्दोष सुटल्यानंतर मनाई आदेशाचा भंग३० ते ४० जणांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : न्यायालयाने निर्दोष ठरविल्यानंतर मुन्ना देसाईसह ११ संशयितांना रत्नागिरीच्या कारागृहातून हातखंबा येथे परत नेले जात होते. मात्र, मारूती मंदिरच्या पुढे बॅँक आॅफ इंडियासमोरील रस्त्यावर रॅली काढून वाहने धोकादायकरित्या हाकली.

ओरडून किंचाळून दहशत निर्माण होईल, असे वातावरण तयार केले तसेच जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग केला, असे पोलिसांना ध्वनीचित्रफीतीमध्ये आढळले. याप्रकरणी मुन्ना देसाई, महेश तथा बाबू म्हाप व सागर म्हापुसकर यांच्यासह ३० ते ४० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश अरविंद कुबडे (रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. २१ आॅगस्ट रोजी मुन्ना देसाईसह ११ जणांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्यांची सुटका होणार असल्याने कारागृहाबाहेर गर्दी जमली होती. त्यासंदर्भात गोपनीय सुत्रांकडून पोलिसांना व्हिडिओ क्लीप मिळाली. त्यात वाहनांमध्ये धोकादायक पद्धतीने बसून धोकादायक स्थितीत वाहने चालविल्याचे दिसले.

तसेच गाड्यांचे इंडिकेटर, हेडलाईट्स लावून हॉर्नही जोरजोरात वाजविण्यात आले. वाहतुकीला अडथळा निर्माण करून रॅली काढली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पोलिसांनी ४० जणांविरोधात भारतीय दंड विधान कलम १४३, १४९, २७९, ३३६, महाराष्ट्र  पोलीस कायदा कलम ३७ (१) (३)चा भंग, तसेच १३५, ११०, ११२,/११७, मोटारवाहन कायदा कलम १८४, ६६ / १९२, १२२ / १७७, १२३ (१) (२) / १७७, १९० नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस