शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

अपघातग्रस्त महिलेच्या मदतीसाठी गाव सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 13:05 IST

accident Ratnagiri- गाव करील ते राव न करील ही म्हण सार्थ ठरवत हातखंबा आणि झरेवाडी येथील ग्रामस्थ अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला आर्थिक मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

ठळक मुद्देअपघातग्रस्त महिलेच्या मदतीसाठी गाव सरसावलेआर्थिक स्थिती हलाखीची असल्याने ऋतुजा यांना मदतीची गरज

हातखंबा : गाव करील ते राव न करील ही म्हण सार्थ ठरवत हातखंबा आणि झरेवाडी येथील ग्रामस्थ अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला आर्थिक मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा गावामध्ये दि. २७ रोजी एका मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्याने झरेवाडी येथील मोटारसायकलस्वार राजेश धुमक या तरूणाचा जागीच मृत्यु झाला होता. त्याचा मुलगा साहिश (६) याला व त्याची आई ऋतुजा धुमक हे दोघेजण गंभीर जखमी झाले. या दोघांना अधिक उपचाराकरिता कोल्हापूर येथे नेत असताना वाटेतच साहिश याचा मृत्यू झाला.ऋतुजा धुमक या गंभीर जखमी झाल्याने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातग्रस्त दाम्पत्याच्या घरी वृध्द आई-वडील आहेत. त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने ऋतुजा यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे हातखंबा व झरेवाडी येथील अनेकांनी घरोघरी जाऊन निधी गोळा केला आहे. धुमक कुटुंबाच्या मदतीसाठी सर्वजण फिरत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी