शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी निवळी ग्रामस्थांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 12:23 IST

water shortage ratnagirinews-वारंवार मागणी करूनही निवळीवासीयांना बावनदीचे पाणी देण्यात येत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. अखेर पाण्यासाठी रवळनाथ गाव विकास पॅनलच्या माध्यमातून ग्रामस्थांनी बावनदी येथे उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देबावनदीचे पाणी जिंदलला ग्रामस्थांचा पाण्यासाठी पत्रव्यवहार

रत्नागिरी : वारंवार मागणी करूनही निवळीवासीयांना बावनदीचे पाणी देण्यात येत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. अखेर पाण्यासाठी रवळनाथ गाव विकास पॅनलच्या माध्यमातून ग्रामस्थांनी बावनदी येथे उपोषण सुरू केले आहे.रत्नागिरी तालुक्यातील बावनदी येथील पाणी जयगड येथील जिंदल कंपनीचा कोळसा विझविण्यासाठी पुरविले जाते. हे पाणी येथील निवळीवासीयांना देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. याबाबत ग्रामस्थांनी २०१८ सालापासून एमआयडीसीकडे पत्रव्यवहार केला होता, तरीही ग्रामस्थांना पाणी देण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे.

निवळी हे गाव टंचाइग्रस्त असून, येथील ४,५०० लोकांना पाणी मिळावे, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. या मागणीकडे दुर्लक्ष करून कंपनीला पाणीपुरवठा सुरूच होता. अखेर जेथून पाणी सोडण्यात येते, त्याच बावनदीच्या ठिकाणी रवळनाथ गाव विकास पॅनलच्या माध्यमातून ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली.या उपोषणामध्ये संजय निवळकर, विनय मुकादम, सुनील गावडे, विवेक मुळ्ये, सचिन सावंत, सौरभ निवळकर यांचा सहभाग होता. ग्रामस्थ उपोषणाला बसल्याची माहिती मिळताच, एमआयडीसीचे अधिकारी सचिन राकसे आणि बी.एन. पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जिंदल कंपनीला सोडण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

टॅग्स :water shortageपाणीकपातRatnagiriरत्नागिरी