शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

पाण्यासाठी निवळी ग्रामस्थांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 12:23 IST

water shortage ratnagirinews-वारंवार मागणी करूनही निवळीवासीयांना बावनदीचे पाणी देण्यात येत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. अखेर पाण्यासाठी रवळनाथ गाव विकास पॅनलच्या माध्यमातून ग्रामस्थांनी बावनदी येथे उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देबावनदीचे पाणी जिंदलला ग्रामस्थांचा पाण्यासाठी पत्रव्यवहार

रत्नागिरी : वारंवार मागणी करूनही निवळीवासीयांना बावनदीचे पाणी देण्यात येत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. अखेर पाण्यासाठी रवळनाथ गाव विकास पॅनलच्या माध्यमातून ग्रामस्थांनी बावनदी येथे उपोषण सुरू केले आहे.रत्नागिरी तालुक्यातील बावनदी येथील पाणी जयगड येथील जिंदल कंपनीचा कोळसा विझविण्यासाठी पुरविले जाते. हे पाणी येथील निवळीवासीयांना देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. याबाबत ग्रामस्थांनी २०१८ सालापासून एमआयडीसीकडे पत्रव्यवहार केला होता, तरीही ग्रामस्थांना पाणी देण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे.

निवळी हे गाव टंचाइग्रस्त असून, येथील ४,५०० लोकांना पाणी मिळावे, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. या मागणीकडे दुर्लक्ष करून कंपनीला पाणीपुरवठा सुरूच होता. अखेर जेथून पाणी सोडण्यात येते, त्याच बावनदीच्या ठिकाणी रवळनाथ गाव विकास पॅनलच्या माध्यमातून ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली.या उपोषणामध्ये संजय निवळकर, विनय मुकादम, सुनील गावडे, विवेक मुळ्ये, सचिन सावंत, सौरभ निवळकर यांचा सहभाग होता. ग्रामस्थ उपोषणाला बसल्याची माहिती मिळताच, एमआयडीसीचे अधिकारी सचिन राकसे आणि बी.एन. पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जिंदल कंपनीला सोडण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

टॅग्स :water shortageपाणीकपातRatnagiriरत्नागिरी