शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

cyclone : निसर्ग चक्रीवादळामुळे पर्यटकांचे खास आकर्षण असलेले गाव संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 15:25 IST

हिरवीगर्द झाडी, सुंदर सागरी किनारा आणि नारळी पोफळीच्या बागा असे चित्रात आणि कथा कवितांमध्ये उल्लेख असलेल्या कासवांचे गाव वेळासचे आज रूपच पालटले आहे. निसर्गाने भरभरुन दिलेल्या वेळासकरांना आज निसर्गानेच मारले आहे.

ठळक मुद्देनिसर्ग चक्रीवादळामुळे पर्यटकांचे खास आकर्षण असलेले गाव संकटातवेळास गाव ५० वर्षे आणखीन मागे, निसर्गाने भरभरून दिले अन् सारे हिरावून नेले

मंडणगड : हिरवीगर्द झाडी, सुंदर सागरी किनारा आणि नारळी पोफळीच्या बागा असे चित्रात आणि कथा कवितांमध्ये उल्लेख असलेल्या कासवांचे गाव वेळासचे आज रूपच पालटले आहे. निसर्गाने भरभरुन दिलेल्या वेळासकरांना आज निसर्गानेच मारले आहे.निसर्ग चक्रीवादळात निसर्गरम्य वेळास गावचे रूपच पालटले आहे. इथली बागायत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. नारळी, पोफळी, आंबा, रातांबा, फणस व मसाल्यांची झाडे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तीन तासांकरिता आलेल्या या वादळाने वेळासकरांना ५० वर्षांहून अधिक मागे नेवून ठेवले आहे.

हजारो लागती झाडे या वादळात गवताप्रमाणे उखडून गेली आहेत. घर संसाराचे नुकसान झाले आहे. एकवेळ घराचे झालेले नुकसान पचवता येईल पण वाडीचे नाही, अशी स्थिती आज इथल्या प्रत्येक ग्रामस्थाची झालेली आहे. एका बाजूला डोंगर, तर दुसरीकडे समुद्र यामुळे मर्यादित जागा असूनही बागायती फुलवलेल्या वेळासकरांना आता पुढे काय करायचे, असा प्रश्न पडला आहे.याआधी सुमारे ५० ते ६० वर्षांपूर्वी या गावात समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरले होते. यामुळे गावातील दांडा परिसरातील अनेक गावे उधाणच्या आहारी गेली होती. मोठ्या प्रमाणात हानी व घरांचे नुकसान झाले होते. आता निसर्गाच्या प्रकोपामुळे वेळास गाव पूर्णपणे नेस्तनाबूत झाले आहे.कासवांचे गाव म्हणून ओळखवेळास गावची आणखी एक ओळख म्हणजे हे गाव कासवांचे प्रजननस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. कासव येत असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील सुरुची बने वादळामुळे नष्ट झाली आहेत. वादळामुळे कासवांच्या विणी हंगामाला फटका बसू शकतो. तसे झाल्यास वेळास गावच्या पर्यटन विकासावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. या परिसरात असणाऱ्या समुद्र घारी आणि काही दुर्मीळ पक्षी (गरुड) प्रजातींच्या घरट्यांवरही निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे.ऐतिहासिक वारसापेशव्यांच्या दरबारातील ह्यनानाह्ण हे मूळचे वेळास गावचेच. एका बाजूने अरबी समुद्र, तर दुसरीकडे बाणकोटचा किल्ला. नारळी-पोफळीच्या वडिलोपार्जित बागा, असा डौल या वेळास गावचा होता. दोन अडीचशे घरे असलेले हजार बाराशे लोकवस्तीचे हे वेळास गाव. नाना फडणवीस यांच्या वारशाने हे गाव आजही ओळखले जात आहे.कोरोनाचाही विसरतालुक्यातील कमावता मोठा वर्ग मुंबईमध्ये रोजगाराला आहे. त्यामुळे गावातील घरे बंद आहेत. वादळामुळे बंद घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शनिवारपासून तालुक्यात चाकरमानी मोठ्या संख्येने परत येत आहेत. ही सर्व मंडळी कोरोनाला विसरुन आपापली घरे स्थानिकांच्या मदतीने दुरुस्त करुन घेण्यात गुंतलेली आहेत. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळRatnagiriरत्नागिरी