शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

gram panchayat election: ग्रामपंचायत निवडणुकीत गावपॅनल ‘बॅकफुटवर’, मतदार संभ्रमित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 18:54 IST

विकास कामात राजकारण नको? गावचा विकास महत्त्वाचा? गावच्या विकासात राजकारण्यांना वेशीबाहेर ठेवू या? या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहिल्या आहेत.

प्रशांत सुर्वेमंडणगड : मंडणगड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका  १८ डिसेंबर २०२२ रोजी होत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी दुरंगी लढत पाहायला मिळत आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय असणारे गावपॅनल राजकारणाच्या गर्तेत ‘बॅकफुट’वर राहिले आहे.राज्यातील राजकारणाचे बदलते समीकरण पाहता ग्रामीण भागातील मतदार संभ्रमित आहेत. निवडणुकीत मात्र वाडीवाडीवर बैठका होऊन शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास  आघाडी विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) अशी समोरासमोरील थेट दुरंगी लढत होत आहे. गावच्या विकासाकरिता पक्षविरही राजकारण करू या? विकास कामात राजकारण नको? गावचा विकास महत्त्वाचा? गावच्या विकासात राजकारण्यांना वेशीबाहेर ठेवू या? या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहिल्या आहेत.गावागावांमध्ये गटातटाचे राजकारण शिरलेले दिसत आहे. जनतेमधून थेट सरपंच निवडीमुळे पक्षाचा झेंडा महत्त्वाचा बनला आहे. ग्रामीण भागात  ‘गावचा विकास तर पक्षाचा झेंडा हमखास’ असाच प्रचार हाेत आहे. बदलत्या राजकारणात गावपॅनलही गावाबाहेरच राहिले आहे.कधी रात्री तर कधी पहाटे अर्ज भरणानिवडणुकीसाठी ऑनलाइन अर्ज भरणे व त्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवताना कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ आले होते. वेबसाईट नीट चालत नाही, सर्व्हर डाऊन, इंटरनेट जाणे त्याचबरोबर अटींची परिपूर्ण माहिती भरेपर्यंत असंख्य अडचणींना पार करणे निवडणुकीपेक्षा कठीण बनले होते. सर्व्हर डाउन यामुळे काही जणांनी रात्री १२ नंतर अर्ज भरले तर अनेक जण पहाटे ४ वाजल्यापासून अर्ज भरत होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक