शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike : काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या शाळा पुन्हा पडू लागल्या ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 15:21 IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णत: विस्कळीत झाली आहे. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती शाळांमध्ये पाहायला मिळत आहे. शाळेत जाण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी अत्यंत आतुरतेने एसटी केव्हा सुरू होणार याची वाट पाहत आहेत.

टेंभ्ये : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांविना ओस पडलेल्या शाळा काही दिवसांपूर्वीच सुरू झाल्या होत्या.  त्यानंतर दिवाळी सुट्टीचा कालावधी संपताच ११ नोव्हेंबरपासून पुन्हा शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र याचदरम्यान झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शाळा पुन्हा ओस पडू लागल्या आहेत. संपामुळे गाड्याच सुटत नसल्याने विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे.

कोरोना काळामध्ये केवळ ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. दिवाळी सुट्टीनंतर असाच अनुभव ग्रामीण भागातील शाळांना येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या  संपामुळे सार्वजनिक  वाहतूक व्यवस्था पूर्णत: विस्कळीत झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शहर व ग्रामीण बससेवा पूर्णतः बंद आहे. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती शाळांमध्ये पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यांमध्ये मार्च  २०१९ पासून शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती बंद करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांविना चालणाऱ्या शाळा सर्वत्र पाहायला मिळत होत्या.

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग  ऑक्टोबर महिन्यापासून पासून सुरू करण्यात आले आहेत. जेमतेम एक महिन्याचे प्रत्यक्ष अध्यापन झाल्यानंतर दिवाळी सुट्टी सुरू झाली होती. सुट्टीनंतर दि.११ नोव्हेंबर रोजी शाळा पुन्हा सुरू झाल्या. परंतु संप सुरू झाल्यामुळे शहर व ग्रामीण बससेवा बंद आहे. यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. शहरी भागांमध्येही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळत होते. शाळेत जाण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी अत्यंत आतुरतेने एसटी केव्हा सुरू होणार याची वाट पाहत आहेत.

टॅग्स :ST Strikeएसटी संपSchoolशाळाStudentविद्यार्थी