शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

ST Strike : काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या शाळा पुन्हा पडू लागल्या ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 15:21 IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णत: विस्कळीत झाली आहे. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती शाळांमध्ये पाहायला मिळत आहे. शाळेत जाण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी अत्यंत आतुरतेने एसटी केव्हा सुरू होणार याची वाट पाहत आहेत.

टेंभ्ये : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांविना ओस पडलेल्या शाळा काही दिवसांपूर्वीच सुरू झाल्या होत्या.  त्यानंतर दिवाळी सुट्टीचा कालावधी संपताच ११ नोव्हेंबरपासून पुन्हा शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र याचदरम्यान झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शाळा पुन्हा ओस पडू लागल्या आहेत. संपामुळे गाड्याच सुटत नसल्याने विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे.

कोरोना काळामध्ये केवळ ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. दिवाळी सुट्टीनंतर असाच अनुभव ग्रामीण भागातील शाळांना येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या  संपामुळे सार्वजनिक  वाहतूक व्यवस्था पूर्णत: विस्कळीत झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शहर व ग्रामीण बससेवा पूर्णतः बंद आहे. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती शाळांमध्ये पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यांमध्ये मार्च  २०१९ पासून शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती बंद करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांविना चालणाऱ्या शाळा सर्वत्र पाहायला मिळत होत्या.

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग  ऑक्टोबर महिन्यापासून पासून सुरू करण्यात आले आहेत. जेमतेम एक महिन्याचे प्रत्यक्ष अध्यापन झाल्यानंतर दिवाळी सुट्टी सुरू झाली होती. सुट्टीनंतर दि.११ नोव्हेंबर रोजी शाळा पुन्हा सुरू झाल्या. परंतु संप सुरू झाल्यामुळे शहर व ग्रामीण बससेवा बंद आहे. यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. शहरी भागांमध्येही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळत होते. शाळेत जाण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी अत्यंत आतुरतेने एसटी केव्हा सुरू होणार याची वाट पाहत आहेत.

टॅग्स :ST Strikeएसटी संपSchoolशाळाStudentविद्यार्थी