शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

ST Strike : काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या शाळा पुन्हा पडू लागल्या ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 15:21 IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णत: विस्कळीत झाली आहे. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती शाळांमध्ये पाहायला मिळत आहे. शाळेत जाण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी अत्यंत आतुरतेने एसटी केव्हा सुरू होणार याची वाट पाहत आहेत.

टेंभ्ये : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांविना ओस पडलेल्या शाळा काही दिवसांपूर्वीच सुरू झाल्या होत्या.  त्यानंतर दिवाळी सुट्टीचा कालावधी संपताच ११ नोव्हेंबरपासून पुन्हा शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र याचदरम्यान झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शाळा पुन्हा ओस पडू लागल्या आहेत. संपामुळे गाड्याच सुटत नसल्याने विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे.

कोरोना काळामध्ये केवळ ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. दिवाळी सुट्टीनंतर असाच अनुभव ग्रामीण भागातील शाळांना येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या  संपामुळे सार्वजनिक  वाहतूक व्यवस्था पूर्णत: विस्कळीत झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शहर व ग्रामीण बससेवा पूर्णतः बंद आहे. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती शाळांमध्ये पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यांमध्ये मार्च  २०१९ पासून शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती बंद करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांविना चालणाऱ्या शाळा सर्वत्र पाहायला मिळत होत्या.

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग  ऑक्टोबर महिन्यापासून पासून सुरू करण्यात आले आहेत. जेमतेम एक महिन्याचे प्रत्यक्ष अध्यापन झाल्यानंतर दिवाळी सुट्टी सुरू झाली होती. सुट्टीनंतर दि.११ नोव्हेंबर रोजी शाळा पुन्हा सुरू झाल्या. परंतु संप सुरू झाल्यामुळे शहर व ग्रामीण बससेवा बंद आहे. यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. शहरी भागांमध्येही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळत होते. शाळेत जाण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी अत्यंत आतुरतेने एसटी केव्हा सुरू होणार याची वाट पाहत आहेत.

टॅग्स :ST Strikeएसटी संपSchoolशाळाStudentविद्यार्थी