शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आबलोलीत पिटाळले वाघरु...  वाघबारशी उत्साहात, परंपरेचे जतन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 11:36 IST

आपल्या समृध्द संस्कृतीचा वारसा आजच्या आधुनिक युगातही जोपासताना गुहागर तालुक्यातील आबलोली-पागडेवाडी येथील अबालवृध्दांनी वाघबारशीची परंपरा गावातून वाघरु.... वाघरु... ओरडत वाघ पिटाळत कायम ठेवली आहे.

ठळक मुद्देहीच तर खरी आपल्या प्रगल्भ संस्कृतीची शिकवण आहे. वाघबारशी दिवशी सायंकाळी तुलसीविवाह पार पडतात.जंगलदेवाने मोकळ्या सोडलेल्या आपल्या गुरा-ढोरांचे रक्षण करावे, जंगली श्वापदांपासून रक्षण करावे, असे गाºहाणे घातले जाते

आबलोली : आपल्या समृध्द संस्कृतीचा वारसा आजच्या आधुनिक युगातही जोपासताना गुहागर तालुक्यातील आबलोली-पागडेवाडी येथील अबालवृध्दांनी वाघबारशीची परंपरा गावातून वाघरु.... वाघरु... ओरडत वाघ पिटाळत कायम ठेवली आहे.कार्तिक शुक्ल १

२ या दिवशी गावातील अबालवृध्द एकत्र येतात. काही तरुणांना वाघाचे मुखवटे, रंगभूषा करुन सजविले जाते. शेपट्या लावल्या जातात. अंगावर पट्टे ओढले जातात आणि या वाघांना गावातून पिटाळले जाते. त्यासाठी शेण, मातीचे गोळे करुन वाघांच्या अंगावर मारले जातात. वाघांना पिटाळत गावच्या सीमेबाहेर नेले जाते. 

शेतीची कामे आटोपल्यानंतर निवांत झालेला बळीराजा या परंपरा जोपासताना उत्साहित होतो. शेतकापणी झाल्यामुळे गुरेसुध्दा मोकळी सोडली जातात. त्यांच्या पाठीवर गुराखी नसतो. पावसाळ्यात गुरे राखताना गुराखी एका निवांत ठिकाणी आपली गुरे थांबवितात. त्या जागेस ‘गोठण’ म्हणतात. आपली चटणी-भाकरी खातात. गुराख्यांच्या देवाला म्हणजेच जंगलदेवाला त्यातीलच भाकरी-चटणी ठेवतात आणि त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. 

जंगलदेवाने मोकळ्या सोडलेल्या आपल्या गुरा-ढोरांचे रक्षण करावे, जंगली श्वापदांपासून रक्षण करावे, असे गाºहाणे घातले जाते. वाध पिटाळून गावचे, गुरा-ढोरांचे रक्षणाचे आर्जव केले जाते. पिटाळत आणलेले वाघ त्यांचे सहकारी शेवटी नदीवर येतात. स्रान करतात. तांदूळ-गुळाची बनविलेली खीर जंगलदेवाला दाखवितात. वाघांना खाऊ घालतात व सर्व सहकारी खातात. आजच्या एकविसाव्या शतकातही युवा पिढी ही परंपरा जोपासत आहे. हीच तर खरी आपल्या प्रगल्भ संस्कृतीची शिकवण आहे. वाघबारशी दिवशी सायंकाळी तुलसीविवाह पार पडतात.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRatnagiriरत्नागिरी