शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

लसीकरण कुणासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST

त्यातच लस कमी आणि केंद्रांवर नागरिकांची गर्दी जास्त यामुळे अनेक केंद्रांवर आरोग्य कर्मचारी आणि नागरिक यांच्यात मोठ्या प्रमाणावर वाद ...

त्यातच लस कमी आणि केंद्रांवर नागरिकांची गर्दी जास्त यामुळे अनेक केंद्रांवर आरोग्य कर्मचारी आणि नागरिक यांच्यात मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण होऊ लागले आहेत. यामुळेच काही ग्रामपंचायती आणि नगरपरिषदांनी आपापल्या कार्यक्षेत्रात लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात सुरुवात केली आहे. अर्थात, तसं पाहिलं तर ग्रामपंचायतींनी किंवा नगरपरिषदांनी आरोग्य विभागाच्या सहकार्याने लसीकरण आयोजित करून गावातील लोकांच्या सुविधाच उपलब्ध करून दिली होती. मात्र, ही सुविधा सुरू झाली असली तरी स्थानिक ग्रामस्थांपेक्षा इतर लोकांनाच त्याचा फायदा होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी काही डोस राखीव असणे, हे समजू शकते. मात्र, प्रत्येक वेळीच ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरपरिषदेचे नगरसेवक हे आपले हितसंबंध जपण्यासाठी इतरांना लसीकरण करून घेत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे.

सध्या काेरोनाचा संसर्ग वाढू लागला असल्याने सर्वांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. ज्यांना सहव्याधी आहे किंवा ६० वर्षांवरील नागरिक यांना कोरोनाचा धोका अधिक असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण अधिक आहे. त्यातच शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाही सरसकट लसीकरण सुरू केले आहे. त्यामुळे आता देशभरातच लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. जिल्ह्यासाठी दहा अकरा हजार एवढेच डोस येतात. प्रत्येक केंद्रांवर ५० किंवा १०० एवढेच डोस दिले तर ते पुरणार कसे? मात्र, काही ग्रामपंचायती किंवा नगरपरिषदा लसीकरणाचे नियोजन करीत आहेत, त्याठिकाणी ऑनलाइन नोंदणी करून सकाळी साडेपाच - सहा वाजेपासून तासन‌्तास रांगेत उभ्या राहाणाऱ्या नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना तसेच रखडत थांबावे लागते. मात्र, दुसऱ्या ठिकाणचे आधार कार्ड असलेल्या आणि ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकांच्या मर्जीतल्या लोकांना पुढे घुसविले जाते. यामुळेच लसीकरणातील गोंधळ अधिकच वाढला आहे. सध्या कोरोनाचे संकट लक्षात घेऊन ज्यांना लस घेणे गरजेचे आहे. पहिला डोस घेऊन बरेच दिवस झाले तरीही ज्यांना दुसरा डोस मिळालेला नाही, त्यांना अग्रक्रमाने तो मिळवून देण्यासाठी खरे तर या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करायला हवेत. पण चित्र उलट दिसते.