शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

रत्नागिरीतील २ लाख रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा, १०८ रूग्णवाहिका ठरतेय लाईफलाईन  

By शोभना कांबळे | Updated: July 3, 2024 17:33 IST

रत्नागिरी : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २६ जानेवारी २०१४ रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला सेवा देण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रमासह महाराष्ट्र आपत्कालीन ...

रत्नागिरी : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २६ जानेवारी २०१४ रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला सेवा देण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रमासह महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS) सुरू केली. या आपत्कालीन वैद्यकीय सेवेने जून २०२४ या १० वर्षांच्या कालावधीत १,००,००,७८७ आपत्कालीन रुग्णांना दिवसरात्र आरोग्य सेवा दिली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील २,११,४२५ रूग्णांसाठी लाईफलाईन ठरली आहे. या सेवेने राज्यातील १ कोटीहून अधिक रुग्णांच्या तातडीच्या वैद्यकीय गरजा पूर्ण केल्या आहेत, १०८ ही वैद्यकीय सेवा वेळेवर आणि जीव वाचवणारी जीवनदायिनी ठरली आहे. महाराष्ट्रामध्ये २३३ ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट (ALS) आणि ७०४ बेसिक लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका (BLS) अत्याधुनिक रुग्णवाहिका प्रगत वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असलेल्या आणि उच्च प्रशिक्षित कर्मचारी असलेल्या ९३७ रुग्णवाहिकांच्या ताफ्यासह काम करत आहेत. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा, आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसादात नवीन बेंचमार्क सेट करण्याचे आश्वासन दिले जाते. विशेषत: गंभीर परिस्थितीत रुग्णांपर्यंत जलद पोहोचण्यासाठी शहरी भाग, दुर्गम आणि आदिवासी भाग आणि महामार्ग यांचा समावेश करून ही सेवा २४ तास कार्यरत असते.एमईएमएस १०८ रुग्णवाहिका सेवा आपत्कालीन आरोग्य सेवांमधील अंतर भरून काढण्यासाठी आणि गरजूंना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी कार्यरत आहे. ही रुग्णवाहिका विविध वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सुसज्ज असते. अपघातांपासून ते हृदयविकाराच्या घटनांमधील रुग्णांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना शक्य तितकी सर्वोत्तम काळजी घेतली जाते.कोरोना काळात देखील या १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवेमार्फत अनेक रुग्णाचे प्राण वाचविण्याचे उत्तम कार्य केले आहे. दहा वर्षांमध्ये रत्नागिरी जिल्हातील २,११,४२५ रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हातील रुग्णवाहिकांवर कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णवाहिका चालक यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या या अविरत सेवेबद्दल जिल्ह्यातील जनतेकडून व लोकप्रतिनिधींकडून कौतुक होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध प्रकारच्या रूग्णांना १० वर्षात मिळालेली सेवा

  • वाहन अपघात : ७०४५
  • हल्ला : ४६१
  • जळित : ७१७
  • हृदयविकार : १४व२
  • पडण्यामुळे अपघात : २७१०
  • विषबाधा : ४२९८
  • अवघड प्रसुती : १८,४४३
  • विजेचा शाॅक : ५९
  • सामुहिक अपघात : ८९८
  • वैद्यकीय मदत : १,४४,२७८
  • इतर : २७३२२
  • पाॅली ट्रामा : ३६६४
  • आत्महत्या- आत्मघाताचा प्रयत्न : १२८
  • एकूण : २,११,४२५
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटल