शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

रत्नागिरी जिल्ह्यात वळीव पावसाची हजेरी, आंबा बागायतदार चिंतेत

By अरुण आडिवरेकर | Updated: May 9, 2023 11:44 IST

पावसामुळे काही भागातील वीजपुरवठही खंडीत

रत्नागिरी : जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळनंतर जिल्ह्यातील काही भागात वळीव पावसाने हजेरी लावली. आज पहाटेपासून रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या परिसरात वळीव पावसाने हजेरी लावली.काल चिपळुणातील पूर्व भागात पावसाने हजेरी लावली होती. तर रात्री राजापूर तालुक्यातही पाऊस पडला. पावसामुळे काही भागातील वीजपुरवठही खंडीत झाला होता. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.आज सकाळी रत्नागिरी शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली होती. अचानक आलेल्या पावसामुळे सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. अचानक पडलेल्या पावसामुळे मुळात अडचणीत आलेल्या आंबा व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मंगळवारी काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.सध्या पावसाच्या आधी मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे तसेच नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे. त्यावरही वळीव पावसामुळे अडचणी येत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अंदमानसह बंगालच्या उपसागरातील बेटांवर जोरदार पाऊस सुरू झाला. दक्षिण किनारपट्ट्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस