शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

रत्नागिरी जिल्ह्यात भूमिगत वीजवाहिन्यांचा निधी होणार भूमिगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 12:57 IST

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात १६१.५ किलोमीटरपर्यंत भूमिगत वाहिनी टाकली जाणार आहे. ही वाहिनी टाकण्यासाठीचे खोदकाम करण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी देण्यास विलंब होत आहे. तसेच खोदाईसाठी कमीत कमी दर लावण्यात यावा, अशी मागणी महावितरणकडून करण्यात येऊनसुध्दा अद्याप तसे दर न देण्यात आल्यामुळे भूमिगत वाहिन्यांचे काम रखडले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात भूमिगत वीजवाहिन्यांचा निधी होणार भूमिगत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी देण्यास विलंबनिधी परत जाण्याची शक्यता

रत्नागिरी : एकात्मिक ग्रामीण विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात १६१.५ किलोमीटरपर्यंत भूमिगत वाहिनी टाकली जाणार आहे. ही वाहिनी टाकण्यासाठीचे खोदकाम करण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी देण्यास विलंब होत आहे.

खोदाईसाठी कमीत कमी दर लावण्यात यावा, अशी मागणी महावितरणकडून करण्यात येऊनसुध्दा अद्याप तसे दर न देण्यात आल्यामुळे भूमिगत वाहिन्यांचे काम रखडले आहे. यामुळे त्यासाठी मंजूर असलेला १० कोटी ८० लाख २७ हजार रूपयांचा निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाल्याने भूमिगत वाहिन्याच भूमिगत होण्याची शक्यता आहे.उच्चदाब भूमिगत वाहिनी चिपळुणात ५ किलोमीटर, खेडमध्ये ३२ किलोमीटर, दापोलीत ५२ किलोमीटर अशी एकूण ८९ किलोमीटर टाकण्यात येणार आहे. लघुदाब वाहिनी अंतर्गत रत्नागिरीमध्ये ३.५ किलोमीटर, चिपळुणात ९ किलोमीटर, राजापुरात १० किलोमीटर, खेडमध्ये ५० किलोमीटर मिळून एकूण ७२.५ किलोमीटर भूमिगत वाहिन्यांचे काम करण्यात येणार आहे.

लघुदाब वाहिनीच्या कामासाठी एकूण ३ कोटी ५९ लाख ६० हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे, तर उच्चदाब वाहिनीसाठी ७ कोटी २० लाख ६७ हजार रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, भूमिगत वाहिन्यांच्या खोदकामाला स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी देण्यास विलंब होत असल्यामुळे कामे सुरू होण्यापूर्वीच थांबली आहेत. तसेच काही ग्रामपंचायतींनी खोदाईसाठी परवानगी देताना आकारलेल्या कराची रक्कम ही भूमिगत वाहिनीसाठी मंजूर निधीपेक्षा अधिक आहे.एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३६ कोटी ३९ लाखांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली शहरांमधील महावितरण व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासह या शहरांची वाढती लोकसंख्या गृहीत धरून ट्रान्स्फॉर्मर क्षमता वाढवणे, नवीन ट्रान्स्फॉर्मर बसवणे, गंजलेले कंडक्टर, तारा, विद्युतखांब बदलणे, महावितरण बॉक्स (डीपी) बसवणे, नवीन वीजवाहिनी तसेच भूमिगत वाहिन्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत.या कामांसाठी रत्नागिरी शहराला ६ कोटी ३९ लाख रुपये, राजापूर - १ करिता ३ कोटी २२ लाख रुपये, चिपळूण शहरासाठी ७ कोटी ९ लाख रुपये, खेडकरिता १० लाख ५६ हजार रुपये, दापोली - १ साठी ७ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर असून, या निधीतून ही कामे सुरू आहेत. याशिवाय सौरऊर्जा पॅनेलची कामे पूर्ण केली जाणार आहे.

रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड, दापोलीमध्ये प्रत्येकी २ मिळून एकूण १० किलोवॅटची कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यासाठी सात लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ही कामे सुरू करण्यात आली आहेत.खेडमध्ये अंशत: काम सुरूमहावितरणतर्फे ग्राहकांना विजेचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे भूमिगत वाहिन्यांसाठीच्या खोदकामाचा दर कमी असावा, अशी अपेक्षा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी खोदकामासाठी परवानगी दिली तर लवकरात लवकर काम सुरू होईल. पावसाळा दोन महिन्यांवर आल्यामुळे लवकर परवानगी मिळणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी लोकसेवेमुळे दर कमी केला असल्याने कराचे पैसे महावितरणने भरले आहेत. खेडमध्ये अंशत: काम सुरू झाले असले तरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये परवानगीअभावी काम रखडले आहे.- पी. जी. पेठकर,प्रभारी मुख्य अभियंता, महावितरण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmahavitaranमहावितरण