शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

उदय सामंत यांची शिष्टाई यशस्वी, शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागे

By मनोज मुळ्ये | Updated: October 22, 2023 12:07 IST

सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे मागे घेतले.

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथील अतिक्रमण हटवण्याच्या मुद्द्यावरून राजीनामे देणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांशी मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी केलेली चर्चा यशस्वी झाली आणि सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे मागे घेतले.

मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी तेथील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला. प्रत्यक्षात ती कारवाई सुरू झाल्यानंतर मच्छीमारांमध्ये नाराजी होती आणि त्यामुळे येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. हा प्रकार घडल्यानंतर विरोधकांमधून आनंद व्यक्त केला जात होता. अतिक्रमण हटवण्याचे सर्व खापर विरोधकांनी मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यावर फोडले होते. या प्रकारामुळे मुस्लिम समाज उदय सामंत यांना साथ देणार नाही, असा दावा विरोधकांकडून केला जात होता.

दरम्यान शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर आल्यानंतर रात्री मंत्री उदय सामंत तसेच उद्योजक किरण सामंत यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष इम्रान मुकादम आणि सर्व सहकारी यांनी झालेला प्रकार हा गैरसमजुतीतून असल्याचे कबूल केले आणि आपण सर्व मच्छिमार उदय सामंत यांच्याच पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. आपण सर्वजण आपले राजीनामे मागे घेऊन पुन्हा एकदा सामंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहू, अशी ग्वाही यावेळी सर्व मच्छीमारांनी दिली.

मिरकरवाडा येथे मच्छीमारांसाठी सुसज्ज अशी इमारत बांधून त्या ठिकाणी काम करणाऱ्या मच्छीमारांना गाडी उपलब्ध करून दिली जाईल. तसेच खोकेधारकांना गाळे उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.

यावेळी किरण सामंत,अपर जिल्हाधिकारी बर्गे, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम मात्रे, आनंद पालव, तसेच मत्सविभागाचे अधिकारी, आणि जिल्हा प्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख बाबू म्हाप, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, निमेश नायर, इम्रान मुकादम, नुरा पटेल, उबेद होडेकर, सुहेल साखरकर, अल्ताफ संगमेश्वरी, सोहेल मुकादम, शकील डिंगणकर, व शेकडो मच्छिमार बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण