शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

उदय सामंत यांची शिष्टाई यशस्वी, शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागे

By मनोज मुळ्ये | Updated: October 22, 2023 12:07 IST

सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे मागे घेतले.

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथील अतिक्रमण हटवण्याच्या मुद्द्यावरून राजीनामे देणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांशी मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी केलेली चर्चा यशस्वी झाली आणि सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे मागे घेतले.

मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी तेथील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला. प्रत्यक्षात ती कारवाई सुरू झाल्यानंतर मच्छीमारांमध्ये नाराजी होती आणि त्यामुळे येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. हा प्रकार घडल्यानंतर विरोधकांमधून आनंद व्यक्त केला जात होता. अतिक्रमण हटवण्याचे सर्व खापर विरोधकांनी मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यावर फोडले होते. या प्रकारामुळे मुस्लिम समाज उदय सामंत यांना साथ देणार नाही, असा दावा विरोधकांकडून केला जात होता.

दरम्यान शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर आल्यानंतर रात्री मंत्री उदय सामंत तसेच उद्योजक किरण सामंत यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष इम्रान मुकादम आणि सर्व सहकारी यांनी झालेला प्रकार हा गैरसमजुतीतून असल्याचे कबूल केले आणि आपण सर्व मच्छिमार उदय सामंत यांच्याच पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. आपण सर्वजण आपले राजीनामे मागे घेऊन पुन्हा एकदा सामंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहू, अशी ग्वाही यावेळी सर्व मच्छीमारांनी दिली.

मिरकरवाडा येथे मच्छीमारांसाठी सुसज्ज अशी इमारत बांधून त्या ठिकाणी काम करणाऱ्या मच्छीमारांना गाडी उपलब्ध करून दिली जाईल. तसेच खोकेधारकांना गाळे उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.

यावेळी किरण सामंत,अपर जिल्हाधिकारी बर्गे, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम मात्रे, आनंद पालव, तसेच मत्सविभागाचे अधिकारी, आणि जिल्हा प्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख बाबू म्हाप, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, निमेश नायर, इम्रान मुकादम, नुरा पटेल, उबेद होडेकर, सुहेल साखरकर, अल्ताफ संगमेश्वरी, सोहेल मुकादम, शकील डिंगणकर, व शेकडो मच्छिमार बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण