शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Uday Samant: "ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, तेही नाराज न होता काम करतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 15:57 IST

Uday Samant: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीती आयोग आणि हर घर तिरंगा मोहिमेच्या मिटिंगसाठी दिल्लीत आहेत

मुंबई - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यातच, मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असल्याने विरोधकांकडून सातत्याने सरकारवर टिका केली जात आहे. तर, मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच हा शब्द घेऊन या प्रश्नावर निश्चित उत्तर देण्याचं टाळत आहेत. आता, शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनीही मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असे म्हटले. तसेच, ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, ते नाराज होणार नाहीत, असेही ते म्हणाले. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीती आयोग आणि हर घर तिरंगा मोहिमेच्या मिटिंगसाठी दिल्लीत आहेत. तेथूनच त्यांनी मंत्री मंडळ विस्ताराची भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधक आम्हाला हिणवत आहेत. परंतु, सुप्रीम कोर्टात चालू असलेल्या केसचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नाही. येत्या काही कालावधीतच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे उदय सामंत यांनी रत्नागिरीत आपल्या पाली येथील निवास्थानी बोलताना सांगितले. 

ज्यावेळी मंत्री मंडळाचा विस्तार होत असतो, त्यावेळी प्रत्येकाला आपण मंत्री व्हावे असे वाटत असते. पण, आम्ही शिंदे साहेबांवर विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जो विस्तार करतील, ज्यांच्यावर जी जबाबदारी देतील ती आम्ही पार पाडू. ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही तेही नाराज न होता काम करतील. कारण, आम्ही शिंदे समर्थक आहोत, असे सामंत यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना सांगितले. 

वैयक्तिक टीका टिपण्णी नको

दरम्यान, दीपक केसरकर यांच्या बद्दल बोलताना ते म्हणाले युतीमध्ये काम करत असताना वैयक्तिक टीका टिपण्णी करणे हे दोन्ही बाजुने योग्य नाही. दीपक केसरकर हे चांगले प्रवक्ते आहेत. तसेच युतीचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते परिपक्व आहेत. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील. परंतु, वैयक्तिक टीका टिप्पणी करणे, दोन्ही बाजूने थांबले पाहिजे असा सल्लादेखील सामंत यांनी राणे व केसरकर वादावर बोलताना दिला आहे.

याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात कुठल्याही परिस्थितीत होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होतोय का असा प्रश्न विचारला जाऊ लागला. त्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघांनी नकार दिला. परंतु आता मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होईल असं खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंतministerमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस