शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तुंबाड येथे नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

By मनोज मुळ्ये | Updated: May 20, 2024 20:33 IST

मासेमारी करणाऱ्याने तिघांना वाचवले

खेड : तालुक्यातील तुंबाड येथे जगबुडी नदीत पोहायला गेलेले पाच जण बुडाल्याची घटना सोमवार, २० मे रोजी घडली. यातील तिघांना वाचविण्यात यश आले असून, दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. सौरभ हरिश्चंद्र नाचरे (१९, रा. पन्हाळजे, ता. खेड ) व अंकेश संतोष भागणे (२०, रा. मधली वाडी, बहिरवली, ता. खेड) अशी या मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सौरभ आणि अंकेश यांच्यासह अभय पांडुरंग भागणे, महेश मारुती गमरे, मयंक प्रकाश बाणाईत असे पाच जण तुंबाड येथील जगबुडी नदीपात्रात पोहायला गेले होते. नेमकी ती वेळ भरतीची असल्याने या पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाचही जण गटांगळ्या खाऊ लागले.

तेथे एका मासेमारी करणाऱ्या नावाड्याने ही घटना बघितली आणि त्यातील तिघांना वाचवले. परंतु सौरभ आणि अंकेश हे भरतीच्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने ते बोटीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ते मृत्युमुखी पडले. स्थानिक ग्रामस्थांनी नंतर त्या दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. या घटनेची माहिती समजताच खेड पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

मृत सौरभ हा वायरमन म्हणून काम करत होता, तर अंकेश भागणे मुंबई येथे एका बेकरीमध्ये कामाला होता. सुटीनिमित्त तो गावी आला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे या दोघांची अधिक माहिती मिळू शकली नाही. या दुर्दैवी घटनेमुळे पन्हाळजे - बहिरवली पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

नवख्या ठिकाणी काळजी घ्याउन्हाळी सुट्टीमुळे परगावाहून अनेकजण येथे सुट्टीची मजा लुटण्यासाठी आले आहेत. परंतु नवख्या ठिकाणी आल्यानंतर नदीच्या प्रवाह, नदीची खोली यासंदर्भात अधिक माहिती नसल्यास पोहताना काळजी घ्या, असे आवाहन खेड पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी केले आहे.

टॅग्स :riverनदीRatnagiriरत्नागिरीdrowningपाण्यात बुडणे