शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

रत्नागिरी जिल्ह्यात आणखीन दोघांचा मृत्यू, आत्तापर्यंत २१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 17:47 IST

रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने आणखी दोघांचा बळी घेतल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या २१ झाली आहे़ तर ४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले़.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात आणखीन दोघांचा मृत्यू, आत्तापर्यंत २१ जणांचा मृत्यू४ रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले, कोरोनाबाधित एकूण ४८४ रुग्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने आणखी दोघांचा बळी घेतल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या २१ झाली आहे़ तर ४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले़.मुंबई, ठाणे, पुणे व अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे़ मधुमेह व अन्य आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, असे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येते. मधुमेह असलेल्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.सुुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्यातील ६ जणांना कोरोनाची लागण झाली होती़ त्यामध्ये एकाचा रुग्णाचा मृत्यूही झाला होता़ त्याचा इतिहास दुबईतून आल्याचा होता़ मात्र, त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आलेले ९५ टक्के रुग्ण मुंबई व अन्य जिल्ह्यातून आल्याचे स्पष्ट झाले आहे़ तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेले हे अन्य जिल्ह्यातूनच आलेले रुग्ण आहेत़सोमवारी जिल्हा रुग्णालयात २ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला़ यामध्ये रत्नागिरी शहराजवळील शिरगांव येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्ण असून, त्याला मधुमेह व किडनीचा आजार होता़ तर दुसरा रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील महिला (४२ वर्षे) असून तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी