शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल सव्वादोन लाख ‘लाडक्या बहिणीं’चे अर्ज

By शोभना कांबळे | Updated: July 18, 2024 19:19 IST

रत्नागिरी : ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ’ योजनेंतर्गत जिल्ह्यात ऑनलाइन ५७ हजार २६९ तर ऑफलाइन पद्धतीने १ लाख ...

रत्नागिरी : ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ’ योजनेंतर्गत जिल्ह्यात ऑनलाइन ५७ हजार २६९ तर ऑफलाइन पद्धतीने १ लाख ६२ हजार ८०८ असे एकूण २ लाख २० हजार ७७ महिलांचे अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्याला एकूण असलेल्या २ लाख ९३ हजार ६७६ उद्दिष्टांपैकी ७४.९४ टक्के इतके उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात राजापूर तालुक्याने उत्तम कामगिरी केली असून, दिलेल्या २९,९३७ उद्दिष्टांपैकी २८,९०४ दाखल झाले आहेत. या तालुक्याचे ९६.५५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.महिलांना सक्षम करण्यासाठी, तसेच महिला घरातील आर्थिक नियोजन करत असताना त्या आर्थिक नियोजनामध्ये सरकारचा देखील सहभाग असावा, यासाठी राज्य सरकारने १ जुलैपासून ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ’ ही योजना राबविण्याचा देशातील पहिला ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात जोरात सुरु आहे. महिला लाभार्थींना या योजनेचा लाभ घेताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी सरकारने काही अटी शिथिल केल्या आहेत तसेच काही जाचक कागदपत्रेही कमी केली आहेत.२१ ते ६५ वयोगटापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी त्या महिलेच्या कुटुंबातील एकत्रित उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे बंधनकारक आहे. महाराष्ट्राच्या रहिवासी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहेच, पण आता महाराष्ट्राबाहेर असलेल्या माहेरवाशिणींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सध्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी या वयोगटातील महिलांमधून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाइन अर्जाबरोबरच ऑफलाइन अर्जही स्वीकारण्यात येत आहेत. जिल्ह्यात दोन्ही प्रकारे एकूण २ लाख २० हजार ७७ महिलांचे अर्ज दाखल झाले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWomenमहिला