शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

जिल्ह्यात पाच अपघातात दोन ठार

By admin | Updated: August 31, 2014 23:43 IST

महामार्ग धोकादायक : मृतात एका बालकासह युवकाचा समावेश

खेड : मुंबई - गोवा महामार्गावर मौजे खवटी येथील शंकर पार्वती मंदीराजवळ टाटा सुमोने दुचाकीला ठोकरल्याने झालेल्या अपघातात मुरडे-रामवाडी येथील दहा वर्षांच्या बालकासह दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री आठ वाजता घडला. या अपघातात दुचाकीवरील आणखी एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर डेरवण येथे उपचार सुरु आहे. साहील कृष्णा बंडबे (१०, मुरडे-रामवाडी) व संदेश श्रीधर गोसावी (२५, गिम्हवणे) अशी ठार झालेल्यांची नावे असून, विलास म्हादलेकर (२२, शिरवली, खेड) हा गंभीर जखमी आहे. संदेश गणेशोत्सवासाठी दिवा (ठाणे) येथून आपल्या ताब्यातील बजाज पल्सर (एमएच ०४जीए ४४३२) वरुन साहील व विकास यांना घेऊन खेडकडे येत होता. तो खवटी येथे आला असता मुंबईकडे जाणाऱ्या किशोर पद्माकर सांगले (२४, वागळे इस्टेट, ठाणे) यांच्या टाटा सुमोची (एमएच ०४ एफआर १६३५) दुचाकीला जोरदार धडक बसली. त्यामध्ये चालक संदेशचा जागीच मृत्यू झाला. साहील व विकास रस्त्याच्या कडेला फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. या दोघांवर उपचार सुरु असताना रविवारी पहाटे ५.३० वाजता साहीलची प्राणज्योत मालवली. या अपघातानंतर मुरडे-रामवाडी आणि गिम्हवणे या गावांवर शोककळा पसरली आहे.दुसरा अपघात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भरणे जाधववाडी नजीक घडला. मुंबईहून राजापूरला प्रवासी घेऊन निघालेली पद्मावती ट्रॅव्हल्सची खासगी आरामबस जाधववाडी येथे आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती बस रस्त्याच्या उजव्या बाजूला कलंडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाहीत. तिसरा अपघातात खवटी येथील रेल्वे पुलाखाली घडली. चिपळूणहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेली क्वालिस कार चालकाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यातच पलटी झाली.या अपघातात क्वालिसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाल्याने ते सुदैवाने बचावले. (प्रतिनिधी)आज रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील भोस्ते घाटात आणखी एक अपघात घडला. मुंबईहून कणकवलीकडे निघालेली आय-२० ही कार भोस्ते घाटात आली असता चालकाचा ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला कलंडली. या अपघातात मनुष्यहानी झाली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अन्य एका अपघातात खेड - दापोली मार्गावरील टाळसुरे गावानजीक भरधाव वेगाने चाललेली स्कार्पिओ कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. (प्रतिनिधी)मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या दोन दिवसात अपघातांचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या गणेशभक्तांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे रस्ते निसरडे बनले असून, वाहने जपून चालविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.