शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाच अपघातात दोन ठार

By admin | Updated: August 31, 2014 23:43 IST

महामार्ग धोकादायक : मृतात एका बालकासह युवकाचा समावेश

खेड : मुंबई - गोवा महामार्गावर मौजे खवटी येथील शंकर पार्वती मंदीराजवळ टाटा सुमोने दुचाकीला ठोकरल्याने झालेल्या अपघातात मुरडे-रामवाडी येथील दहा वर्षांच्या बालकासह दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री आठ वाजता घडला. या अपघातात दुचाकीवरील आणखी एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर डेरवण येथे उपचार सुरु आहे. साहील कृष्णा बंडबे (१०, मुरडे-रामवाडी) व संदेश श्रीधर गोसावी (२५, गिम्हवणे) अशी ठार झालेल्यांची नावे असून, विलास म्हादलेकर (२२, शिरवली, खेड) हा गंभीर जखमी आहे. संदेश गणेशोत्सवासाठी दिवा (ठाणे) येथून आपल्या ताब्यातील बजाज पल्सर (एमएच ०४जीए ४४३२) वरुन साहील व विकास यांना घेऊन खेडकडे येत होता. तो खवटी येथे आला असता मुंबईकडे जाणाऱ्या किशोर पद्माकर सांगले (२४, वागळे इस्टेट, ठाणे) यांच्या टाटा सुमोची (एमएच ०४ एफआर १६३५) दुचाकीला जोरदार धडक बसली. त्यामध्ये चालक संदेशचा जागीच मृत्यू झाला. साहील व विकास रस्त्याच्या कडेला फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. या दोघांवर उपचार सुरु असताना रविवारी पहाटे ५.३० वाजता साहीलची प्राणज्योत मालवली. या अपघातानंतर मुरडे-रामवाडी आणि गिम्हवणे या गावांवर शोककळा पसरली आहे.दुसरा अपघात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भरणे जाधववाडी नजीक घडला. मुंबईहून राजापूरला प्रवासी घेऊन निघालेली पद्मावती ट्रॅव्हल्सची खासगी आरामबस जाधववाडी येथे आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती बस रस्त्याच्या उजव्या बाजूला कलंडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाहीत. तिसरा अपघातात खवटी येथील रेल्वे पुलाखाली घडली. चिपळूणहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेली क्वालिस कार चालकाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यातच पलटी झाली.या अपघातात क्वालिसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाल्याने ते सुदैवाने बचावले. (प्रतिनिधी)आज रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील भोस्ते घाटात आणखी एक अपघात घडला. मुंबईहून कणकवलीकडे निघालेली आय-२० ही कार भोस्ते घाटात आली असता चालकाचा ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला कलंडली. या अपघातात मनुष्यहानी झाली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अन्य एका अपघातात खेड - दापोली मार्गावरील टाळसुरे गावानजीक भरधाव वेगाने चाललेली स्कार्पिओ कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. (प्रतिनिधी)मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या दोन दिवसात अपघातांचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या गणेशभक्तांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे रस्ते निसरडे बनले असून, वाहने जपून चालविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.