शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

रिफायनरीच्या मंजुरीवरून शिवसेनेत दोन गट, सहा वर्षे प्रकल्पाचे भवितव्य अधांतरीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 16:30 IST

याआधीही नाणार परिसरातील काही शिवसैनिकांनी प्रकल्प हवा, अशी ठाम भूमिका घेतली होती

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प उभारण्यावरून शिवसेनेतच दोन गट असल्याचे गेल्या काही दिवसात स्पष्टपणे पुढे आले आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी प्रकल्प झालाच पाहिजे, अशी भूमिका घेतली असून, खासदार विनायक राऊत यांनी मात्र अजून स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. राज्यातून बाहेर जाणाऱ्या प्रकल्पांवरून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेनेने रिफायनरी प्रकल्पाबाबतचा घोळ अजूनही कायम ठेवला आहे.शिवसेनेने नाणारमध्ये आणलेला आणि शिवसेनेनेच नाणारमधून घालवलेला रिफायनरी प्रकल्प गेली पाच वर्षे लोंबकळत राहिला आहे. प्रकल्पविरोधी लोकांचे म्हणणे ऐकून घेणाऱ्या शिवसेनेने प्रकल्पाच्या कंपनीचे किंवा प्रकल्प हवाय म्हणणाऱ्या लोकांचे म्हणणे कधीही ऐकून घेतले नाही. विरोधकांच्या शंका दूर करण्यासाठी कधीही पुढाकार घेतला नाही आणि हीच शिवसेना प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर टीकेची भूमिका घेत आहे.जानेवारी महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच राजापूर तालुक्यातील बारसू येथे जागा उपलब्ध करून देण्याचे पत्र केंद्र सरकारला पाठवले. मात्र, त्यांचीच शिवसेना अजून या प्रकल्पाला आपला पाठिंबा असल्याची भूमिका घेत नाही. आम्ही लोकांसोबत हे एकच पालूपद आळवणाऱ्या शिवसेनेने रिफायनरीबाबत आपली भूमिका संभ्रमितच ठेवली आहे. त्यामुळे शिवसेनेत प्रकल्पावरून दोन गट असल्याचे आता पुनहा एकदा प्रकर्षाने पुढे आले आहे.

याआधीही नाणार परिसरातील काही शिवसैनिकांनी प्रकल्प हवा, अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. आता स्थानिक आमदार राजन साळवी यांनीच प्रकल्पाला ठाम समर्थन करणारी भूमिका घेतली आहे. अर्थात शिवसेनेतील या दोन भूमिकांमुळे प्रकल्पाचे काम पुढे जाण्यात मोठे अडथळे येत आहेत.

आमदार बाजूने, खासदार विरोधात?प्रकल्प नाणार आणि परिसरातील १३ गावांमध्ये होणार होता, तेव्हा शिवसेनेने सर्वच स्तरावरून विरोध केला. मात्र, बारसूबाबत शिवसेनेनेच पहिल्यापासून जोर लावला आहे. रोजगाराची गरज लक्षात घेता राजापुरातील अनेक संघटनांनी, तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी प्रकल्पाला पाठिंबा दिला. त्यामुळे आमदार राजन साळवी यांनीही प्रकल्पाबाबत समर्थनाची ठाम भूमिका घेतली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीला आमदार साळवी उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या अटीही मांडल्या. खासदार विनायक राऊत मात्र या बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांची भूमिका अजूनही विरोधातीलच असल्याचा अर्थ काढला जात आहे.

गुंतवणूक घटलीज्यावेळी नाणार आणि परिसरातील १३ गावांमध्ये हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन होते, तेव्हा या प्रकल्पासाठी चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. मात्र, आता बारसूमध्ये प्रकल्प करण्याचे ठरत आहे. तेथे जागेची उपलब्धता नाणारइतकी नाही. त्यामुळे प्रकल्पातील गुंतवणूक दोन लाख कोटींवर आली आहे. राजकीय वाद न करता, लोकांचे शंका निरसन करून हा प्रकल्प वेळेत मार्गी लागला असता तर चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असती.

आधीची संमती दुर्लक्षितचबारसूमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पाला २,९०० एकर जागेची संमती मिळाली आहे. आधी ज्या भागात प्रकल्प प्रस्तावित होता, तेथे ८,५०० एकर क्षेत्रासाठी संमतीपत्र आहेत. मात्र, त्याकडे राजकीय पक्षांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. प्रकल्प हवा आहे, अशा त्या भागातील लोकांना कोणत्याही राजकीय पक्षाने पाठिंबा, पाठबळ दिले नाहीच, उलट त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचीही तसदी दाखवली गेली नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्पShiv SenaशिवसेनाRajan Salviराजन साळवीVinayak Rautविनायक राऊत