शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरीच्या मंजुरीवरून शिवसेनेत दोन गट, सहा वर्षे प्रकल्पाचे भवितव्य अधांतरीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 16:30 IST

याआधीही नाणार परिसरातील काही शिवसैनिकांनी प्रकल्प हवा, अशी ठाम भूमिका घेतली होती

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प उभारण्यावरून शिवसेनेतच दोन गट असल्याचे गेल्या काही दिवसात स्पष्टपणे पुढे आले आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी प्रकल्प झालाच पाहिजे, अशी भूमिका घेतली असून, खासदार विनायक राऊत यांनी मात्र अजून स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. राज्यातून बाहेर जाणाऱ्या प्रकल्पांवरून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेनेने रिफायनरी प्रकल्पाबाबतचा घोळ अजूनही कायम ठेवला आहे.शिवसेनेने नाणारमध्ये आणलेला आणि शिवसेनेनेच नाणारमधून घालवलेला रिफायनरी प्रकल्प गेली पाच वर्षे लोंबकळत राहिला आहे. प्रकल्पविरोधी लोकांचे म्हणणे ऐकून घेणाऱ्या शिवसेनेने प्रकल्पाच्या कंपनीचे किंवा प्रकल्प हवाय म्हणणाऱ्या लोकांचे म्हणणे कधीही ऐकून घेतले नाही. विरोधकांच्या शंका दूर करण्यासाठी कधीही पुढाकार घेतला नाही आणि हीच शिवसेना प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर टीकेची भूमिका घेत आहे.जानेवारी महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच राजापूर तालुक्यातील बारसू येथे जागा उपलब्ध करून देण्याचे पत्र केंद्र सरकारला पाठवले. मात्र, त्यांचीच शिवसेना अजून या प्रकल्पाला आपला पाठिंबा असल्याची भूमिका घेत नाही. आम्ही लोकांसोबत हे एकच पालूपद आळवणाऱ्या शिवसेनेने रिफायनरीबाबत आपली भूमिका संभ्रमितच ठेवली आहे. त्यामुळे शिवसेनेत प्रकल्पावरून दोन गट असल्याचे आता पुनहा एकदा प्रकर्षाने पुढे आले आहे.

याआधीही नाणार परिसरातील काही शिवसैनिकांनी प्रकल्प हवा, अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. आता स्थानिक आमदार राजन साळवी यांनीच प्रकल्पाला ठाम समर्थन करणारी भूमिका घेतली आहे. अर्थात शिवसेनेतील या दोन भूमिकांमुळे प्रकल्पाचे काम पुढे जाण्यात मोठे अडथळे येत आहेत.

आमदार बाजूने, खासदार विरोधात?प्रकल्प नाणार आणि परिसरातील १३ गावांमध्ये होणार होता, तेव्हा शिवसेनेने सर्वच स्तरावरून विरोध केला. मात्र, बारसूबाबत शिवसेनेनेच पहिल्यापासून जोर लावला आहे. रोजगाराची गरज लक्षात घेता राजापुरातील अनेक संघटनांनी, तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी प्रकल्पाला पाठिंबा दिला. त्यामुळे आमदार राजन साळवी यांनीही प्रकल्पाबाबत समर्थनाची ठाम भूमिका घेतली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीला आमदार साळवी उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या अटीही मांडल्या. खासदार विनायक राऊत मात्र या बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांची भूमिका अजूनही विरोधातीलच असल्याचा अर्थ काढला जात आहे.

गुंतवणूक घटलीज्यावेळी नाणार आणि परिसरातील १३ गावांमध्ये हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन होते, तेव्हा या प्रकल्पासाठी चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. मात्र, आता बारसूमध्ये प्रकल्प करण्याचे ठरत आहे. तेथे जागेची उपलब्धता नाणारइतकी नाही. त्यामुळे प्रकल्पातील गुंतवणूक दोन लाख कोटींवर आली आहे. राजकीय वाद न करता, लोकांचे शंका निरसन करून हा प्रकल्प वेळेत मार्गी लागला असता तर चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असती.

आधीची संमती दुर्लक्षितचबारसूमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पाला २,९०० एकर जागेची संमती मिळाली आहे. आधी ज्या भागात प्रकल्प प्रस्तावित होता, तेथे ८,५०० एकर क्षेत्रासाठी संमतीपत्र आहेत. मात्र, त्याकडे राजकीय पक्षांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. प्रकल्प हवा आहे, अशा त्या भागातील लोकांना कोणत्याही राजकीय पक्षाने पाठिंबा, पाठबळ दिले नाहीच, उलट त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचीही तसदी दाखवली गेली नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्पShiv SenaशिवसेनाRajan Salviराजन साळवीVinayak Rautविनायक राऊत