शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

वेरळमध्ये विहिरीसाठीच्या सुरुंगामुळे घराला तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 14:02 IST

Lanja Ratnagirinews-लांजा तालुक्यातील वेरळ ग्रामपंचायत नळपाणी योजनेच्या विहिरीच्या रुंदीकरणाचे काम करीत असताना लावण्यात येणाऱ्या सुरुंगामुळे शेजारील घरांना तडे जात असल्याची तक्रार महंमद फकी यांनी लांजा तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देनळपाणी योजनेच्या विहिरीचे रुंदीकरण लांजा तहसीलदारांकडे तक्रार

लांजा : तालुक्यातील वेरळ ग्रामपंचायत नळपाणी योजनेच्या विहिरीच्या रुंदीकरणाचे काम करीत असताना लावण्यात येणाऱ्या सुरुंगामुळे शेजारील घरांना तडे जात असल्याची तक्रार महंमद फकी यांनी लांजा तहसीलदार यांच्याकडे केली आहे.तहसीलदार समाधान गायकवाड यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वेरळ येथील आपल्या मिळकतीत पूर्वी जुनी विहीर होती. सन २०१९ मध्ये ग्रामपंचायत वेरळ यांनी या विहिरीचे नवीन बांधकाम दाखवून निधी खर्ची घातला. त्याबाबत आपण दि. २५ फेब्रुवारी २०१९ रोजी ग्रामपंचायत वेरळ यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. त्यानंतर दि. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा एकदा ग्रामपंचायतीमार्फत नळपाणी योजनेतंर्गत विहिरीचे बांधकाम सुरू करण्यात आले.त्याबाबत आपण वेरळ ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर केवळ दोन ते तीन दिवस काम थांबवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा दि. १५ फेब्रुवारीपासून कोणतीही पूर्वसूचना न देता कंत्राटदाराने विहिरीत सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. आपले घर या विहिरीजवळ आहे. घरात वयोवृद्ध आई, छोटा मुलगा, भाची आणि मी राहतो. विहिरीत लावण्यात येणाऱ्या सुरूंगामुळे माझ्या घराला हादरे बसत असून अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे आपले घर राहण्यासाठी धोकादायक बनले आहे.याबाबत दि.२० फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा ग्रामपंचायत सरपंच यांना भेटून सुरूंगामुळे घराला तडे जात असल्याचे सांगून काम थांबवावे, अशी विनंती केली होती. त्यानंतर सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी या घराची पाहणी करून भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते.आधी स्फोट थांबवाग्रामसभेतही आपण हा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, अद्यापही विहिरीत सुरूंग लावण्याचे काम सुरूच असल्याने माझ्या घराला तडे जाऊन आमच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. आपल्याला नुकसान भरपाई मिळावी आणि विहिरीत लावण्यात येणारे सुरुंगाचे काम ताबडतोब थांबविण्यात यावे अशी मागणी महंमद फकी यांनी केली आहे.

टॅग्स :Lanja Police Thaneलांजा पोलीस ठाणेRatnagiriरत्नागिरी