शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

तुळशी - माहू, केळवत घाटाचे नागरिकांकडून विद्रुपीकरण : कारवाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:30 IST

शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत रत्नागिरी जिल्ह्यासह तालुका, गावपातळीवर स्वच्छतेसाठी सर्वांनी कंबर कसली असतानाच मंडणगडवासीयांकडून या मोहिमेला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देनिसर्गरम्य घाटाला कचरा डेपोचे स्वरूप

मंडणगड : शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गतरत्नागिरी जिल्ह्यासह तालुका, गावपातळीवर स्वच्छतेसाठी सर्वांनी कंबर कसली असतानाच मंडणगडवासीयांकडून या मोहिमेला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील बाणकोट मार्गावरील तुळशी व माहू दरम्यानचा घाट व मंडणगड - खेड मार्गावरील केळवत  घाटात नागरिक, भाजी विक्रेते, मटन, चिकन विक्रेते यांच्याकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे अशाप्रकारे कचरा टाकणाºयांवर कारवाई करण्याकडे  नगरपंचायत, भिंगळोली ग्रामपंचायत व प्रशासनानेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने घाटातील कचºयाची समस्या वाढतच असून, या निसर्गरम्य घाटांना कचरा डेपोचे स्वरुप आले आहे.

मंडणगड नगरपंचायतीकडून गेली काही वर्ष शहरात जमा होणारा कचरा घंटागाडीच्या सहाय्याने या परिसरात आणून टाकला जात होता. त्याविरोधात आवाज उठवल्यानंतर येथे कचरा टाकणे बंद करण्यात आले. मात्र, शहरातील दुकानदार, नागरिक अजूनही येथे रात्री, दुपारी लपूनछपून गाडीतून गोण्या भरून कचरा, घाण, अनावश्यक वस्तू आणून घाटात टाकत आहेत. हीच परिस्थिती भिंगळोली ग्रामपंचायत हद्दीत असणाºया केळवत घाटात असून, याठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. कचरा टाकलेल्या ठिकाणी मोकाट जनावरे जमा होत असल्याने त्यांचा त्रास प्रवासी, वाहनचालक यांना होत आहे. हे निसर्गरम्य घाट कचºयाच्या विळख्यात सापडल्याने विद्रुप झाले आहेत.

वाढत्या शहरीकरणामुळे मंडणगड शहरात व शहरालगत असलेली तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत भिंगळोली येथील कचराप्रश्न अधिक जटील होत आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून कचरा संकलनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज शहरातून सुका, ओला कचरा घंटागाडीच्या सहाय्याने एकत्रित करून त्याचे संकलन अथवा विल्हेवाट लावली जाते. तरीही नागरिक, दुकानदार प्रशासनाला सहकार्य न करता, कचरा घाटात टाकण्यात धन्यता मानतात. हा कचरा चोरीछुपे टाकला जात आहे.

भिंगळोली ग्रामपंचायतीने कचरा समस्येसाठी कोणतेही नियोजन केल्याचे दिसत नाही. स्थानिकांसह  इतर गावांतील आठवडा बाजारासाठी आलेले भाजी विक्रेते हे केळवत घाटात कचरा टाकतात. त्यामुळे घाटातील कचºयाचा प्रश्न अधिकच जटील बनला आहे.

 

माहू, तुळशी घाटात कचरा न टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही जर असा प्रकार होत असेल तर त्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल. - राहुल कोकाटे, उपनगराध्यक्ष, मंडणगड नगरपंचायत

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान