शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

तुळशी - माहू, केळवत घाटाचे नागरिकांकडून विद्रुपीकरण : कारवाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:30 IST

शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत रत्नागिरी जिल्ह्यासह तालुका, गावपातळीवर स्वच्छतेसाठी सर्वांनी कंबर कसली असतानाच मंडणगडवासीयांकडून या मोहिमेला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देनिसर्गरम्य घाटाला कचरा डेपोचे स्वरूप

मंडणगड : शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गतरत्नागिरी जिल्ह्यासह तालुका, गावपातळीवर स्वच्छतेसाठी सर्वांनी कंबर कसली असतानाच मंडणगडवासीयांकडून या मोहिमेला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील बाणकोट मार्गावरील तुळशी व माहू दरम्यानचा घाट व मंडणगड - खेड मार्गावरील केळवत  घाटात नागरिक, भाजी विक्रेते, मटन, चिकन विक्रेते यांच्याकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे अशाप्रकारे कचरा टाकणाºयांवर कारवाई करण्याकडे  नगरपंचायत, भिंगळोली ग्रामपंचायत व प्रशासनानेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने घाटातील कचºयाची समस्या वाढतच असून, या निसर्गरम्य घाटांना कचरा डेपोचे स्वरुप आले आहे.

मंडणगड नगरपंचायतीकडून गेली काही वर्ष शहरात जमा होणारा कचरा घंटागाडीच्या सहाय्याने या परिसरात आणून टाकला जात होता. त्याविरोधात आवाज उठवल्यानंतर येथे कचरा टाकणे बंद करण्यात आले. मात्र, शहरातील दुकानदार, नागरिक अजूनही येथे रात्री, दुपारी लपूनछपून गाडीतून गोण्या भरून कचरा, घाण, अनावश्यक वस्तू आणून घाटात टाकत आहेत. हीच परिस्थिती भिंगळोली ग्रामपंचायत हद्दीत असणाºया केळवत घाटात असून, याठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. कचरा टाकलेल्या ठिकाणी मोकाट जनावरे जमा होत असल्याने त्यांचा त्रास प्रवासी, वाहनचालक यांना होत आहे. हे निसर्गरम्य घाट कचºयाच्या विळख्यात सापडल्याने विद्रुप झाले आहेत.

वाढत्या शहरीकरणामुळे मंडणगड शहरात व शहरालगत असलेली तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत भिंगळोली येथील कचराप्रश्न अधिक जटील होत आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून कचरा संकलनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज शहरातून सुका, ओला कचरा घंटागाडीच्या सहाय्याने एकत्रित करून त्याचे संकलन अथवा विल्हेवाट लावली जाते. तरीही नागरिक, दुकानदार प्रशासनाला सहकार्य न करता, कचरा घाटात टाकण्यात धन्यता मानतात. हा कचरा चोरीछुपे टाकला जात आहे.

भिंगळोली ग्रामपंचायतीने कचरा समस्येसाठी कोणतेही नियोजन केल्याचे दिसत नाही. स्थानिकांसह  इतर गावांतील आठवडा बाजारासाठी आलेले भाजी विक्रेते हे केळवत घाटात कचरा टाकतात. त्यामुळे घाटातील कचºयाचा प्रश्न अधिकच जटील बनला आहे.

 

माहू, तुळशी घाटात कचरा न टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही जर असा प्रकार होत असेल तर त्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल. - राहुल कोकाटे, उपनगराध्यक्ष, मंडणगड नगरपंचायत

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान