शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

तुळशी - माहू, केळवत घाटाचे नागरिकांकडून विद्रुपीकरण : कारवाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:30 IST

शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत रत्नागिरी जिल्ह्यासह तालुका, गावपातळीवर स्वच्छतेसाठी सर्वांनी कंबर कसली असतानाच मंडणगडवासीयांकडून या मोहिमेला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देनिसर्गरम्य घाटाला कचरा डेपोचे स्वरूप

मंडणगड : शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गतरत्नागिरी जिल्ह्यासह तालुका, गावपातळीवर स्वच्छतेसाठी सर्वांनी कंबर कसली असतानाच मंडणगडवासीयांकडून या मोहिमेला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील बाणकोट मार्गावरील तुळशी व माहू दरम्यानचा घाट व मंडणगड - खेड मार्गावरील केळवत  घाटात नागरिक, भाजी विक्रेते, मटन, चिकन विक्रेते यांच्याकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे अशाप्रकारे कचरा टाकणाºयांवर कारवाई करण्याकडे  नगरपंचायत, भिंगळोली ग्रामपंचायत व प्रशासनानेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने घाटातील कचºयाची समस्या वाढतच असून, या निसर्गरम्य घाटांना कचरा डेपोचे स्वरुप आले आहे.

मंडणगड नगरपंचायतीकडून गेली काही वर्ष शहरात जमा होणारा कचरा घंटागाडीच्या सहाय्याने या परिसरात आणून टाकला जात होता. त्याविरोधात आवाज उठवल्यानंतर येथे कचरा टाकणे बंद करण्यात आले. मात्र, शहरातील दुकानदार, नागरिक अजूनही येथे रात्री, दुपारी लपूनछपून गाडीतून गोण्या भरून कचरा, घाण, अनावश्यक वस्तू आणून घाटात टाकत आहेत. हीच परिस्थिती भिंगळोली ग्रामपंचायत हद्दीत असणाºया केळवत घाटात असून, याठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. कचरा टाकलेल्या ठिकाणी मोकाट जनावरे जमा होत असल्याने त्यांचा त्रास प्रवासी, वाहनचालक यांना होत आहे. हे निसर्गरम्य घाट कचºयाच्या विळख्यात सापडल्याने विद्रुप झाले आहेत.

वाढत्या शहरीकरणामुळे मंडणगड शहरात व शहरालगत असलेली तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत भिंगळोली येथील कचराप्रश्न अधिक जटील होत आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून कचरा संकलनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज शहरातून सुका, ओला कचरा घंटागाडीच्या सहाय्याने एकत्रित करून त्याचे संकलन अथवा विल्हेवाट लावली जाते. तरीही नागरिक, दुकानदार प्रशासनाला सहकार्य न करता, कचरा घाटात टाकण्यात धन्यता मानतात. हा कचरा चोरीछुपे टाकला जात आहे.

भिंगळोली ग्रामपंचायतीने कचरा समस्येसाठी कोणतेही नियोजन केल्याचे दिसत नाही. स्थानिकांसह  इतर गावांतील आठवडा बाजारासाठी आलेले भाजी विक्रेते हे केळवत घाटात कचरा टाकतात. त्यामुळे घाटातील कचºयाचा प्रश्न अधिकच जटील बनला आहे.

 

माहू, तुळशी घाटात कचरा न टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही जर असा प्रकार होत असेल तर त्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल. - राहुल कोकाटे, उपनगराध्यक्ष, मंडणगड नगरपंचायत

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान