शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

आंबा उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करा, पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 19:28 IST

गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी आंब्याचे उत्पन्न फारच कमी असल्याचे दिसत असून, उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.

ठळक मुद्देआंबा उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करापालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील कृषी विभागाची आढावा बैठक

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी आंब्याचे उत्पन्न फारच कमी असल्याचे दिसत असून, उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.पालकमंत्री वायकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. आंबा हे फळ जास्त दिवस टिकणारे नाही. त्यामुळे त्याचा साठा करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. या फळावर वातावरणाचा परिणाम होऊ नये, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विभाग व कृषी विद्यापीठाने शेतकरीवर्गाचे प्रबोधन करण्यासाठी शेतकरी मेळावे आयोजित करावेत, असेही यावेळी त्यांनी सूचित केले.कृषी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संबंधीत विभागाने शेतकऱ्यांपर्यंत जाऊन योजनेची माहिती द्यावी. आधुनिक पध्दतीने शेती करून आंब्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहन द्यावे, असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, उपाध्यक्ष संतोष थेराडे, नगराध्यक्ष राहुल पंडित, जिल्हाधिकारी प्रदीप पी., मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप उपस्थित होते. 

टॅग्स :Ravindra Vaikarरवींद्र वायकरRatnagiriरत्नागिरी