शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

आंबा उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करा, पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 19:28 IST

गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी आंब्याचे उत्पन्न फारच कमी असल्याचे दिसत असून, उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.

ठळक मुद्देआंबा उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करापालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील कृषी विभागाची आढावा बैठक

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी आंब्याचे उत्पन्न फारच कमी असल्याचे दिसत असून, उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.पालकमंत्री वायकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. आंबा हे फळ जास्त दिवस टिकणारे नाही. त्यामुळे त्याचा साठा करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. या फळावर वातावरणाचा परिणाम होऊ नये, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विभाग व कृषी विद्यापीठाने शेतकरीवर्गाचे प्रबोधन करण्यासाठी शेतकरी मेळावे आयोजित करावेत, असेही यावेळी त्यांनी सूचित केले.कृषी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संबंधीत विभागाने शेतकऱ्यांपर्यंत जाऊन योजनेची माहिती द्यावी. आधुनिक पध्दतीने शेती करून आंब्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहन द्यावे, असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, उपाध्यक्ष संतोष थेराडे, नगराध्यक्ष राहुल पंडित, जिल्हाधिकारी प्रदीप पी., मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप उपस्थित होते. 

टॅग्स :Ravindra Vaikarरवींद्र वायकरRatnagiriरत्नागिरी