शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
5
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
6
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
7
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
8
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
9
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
10
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
11
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
12
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
13
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
14
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
15
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
16
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
17
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
18
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
19
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
20
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

शेतकऱ्यांवर विश्वास टाका, भारत महासत्ता बनेल; राजू शेट्टी यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 08:39 IST

सत्ताधारी आणि विरोधकांना शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिलेले नाही.

महाड : सत्ताधारी आणि विरोधकांना शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिलेले नाही. जनतेच्या पैशांची लूट आणि विकासकामांची टक्केवारी घेणाऱ्यांना शिवरायांच्या विचारांचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांना किल्ले रायगडावर येऊन महाराजांचे आशीर्वाद घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असे परखड मत व्यक्त करताना शेतकऱ्यांवर विश्वास टाकला तर भारत महासत्ता बनेल, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाचाड येथील मेळाव्यात व्यक्त केला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती हे ९० दिवसांचे राज्यव्यापी अभियान सुरू होत असून त्याचा प्रारंभ किल्ले रायगड येथून शनिवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, संदीप जगताप, युवा जिल्हाध्यक्ष सागर शंभू शेट्टे, प्रदेश युवती अध्यक्ष पूजा मोरे, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, जि. प. सदस्य रामचंद्र शिंदे, राजेश पाटील आदी उपस्थित होते. 

देशाची अर्थव्यवस्था उद्योगधंद्यांमुळे नव्हे तर शेतकऱ्यांमुळे वृद्धिंगत झालेली आहे. त्यांच्यावर विश्वास टाकला तर भारत हा जगाचा अन्नदाता बनू शकतो. मात्र, त्यांचा विचार करण्याची मानसिकता केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नाही. - राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

शनिवारी सकाळी शेट्टी यांनी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत या अभियानाचा प्रारंभ केला.  या  मेळाव्यात शेट्टी यांनी सत्ताधारी व विरोधक या दोघांवरही टीका केली. राज्यकर्ते शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनेतून भ्रष्टाचार करत आहेत. एखादा अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी लाखो रुपये घेत आहेत. या लाचखोरीचा परिणाम सर्व सामान्य जनतेच्या जीवनावर होत आहे. आपल्या या अभियानातून शेतकऱ्यांच्या खऱ्या परिस्थितीचा लेखाजोखा मांडू, असे ते म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी