शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर विश्वास टाका, भारत महासत्ता बनेल; राजू शेट्टी यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 08:39 IST

सत्ताधारी आणि विरोधकांना शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिलेले नाही.

महाड : सत्ताधारी आणि विरोधकांना शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिलेले नाही. जनतेच्या पैशांची लूट आणि विकासकामांची टक्केवारी घेणाऱ्यांना शिवरायांच्या विचारांचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांना किल्ले रायगडावर येऊन महाराजांचे आशीर्वाद घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असे परखड मत व्यक्त करताना शेतकऱ्यांवर विश्वास टाकला तर भारत महासत्ता बनेल, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाचाड येथील मेळाव्यात व्यक्त केला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती हे ९० दिवसांचे राज्यव्यापी अभियान सुरू होत असून त्याचा प्रारंभ किल्ले रायगड येथून शनिवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, संदीप जगताप, युवा जिल्हाध्यक्ष सागर शंभू शेट्टे, प्रदेश युवती अध्यक्ष पूजा मोरे, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, जि. प. सदस्य रामचंद्र शिंदे, राजेश पाटील आदी उपस्थित होते. 

देशाची अर्थव्यवस्था उद्योगधंद्यांमुळे नव्हे तर शेतकऱ्यांमुळे वृद्धिंगत झालेली आहे. त्यांच्यावर विश्वास टाकला तर भारत हा जगाचा अन्नदाता बनू शकतो. मात्र, त्यांचा विचार करण्याची मानसिकता केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नाही. - राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

शनिवारी सकाळी शेट्टी यांनी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत या अभियानाचा प्रारंभ केला.  या  मेळाव्यात शेट्टी यांनी सत्ताधारी व विरोधक या दोघांवरही टीका केली. राज्यकर्ते शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनेतून भ्रष्टाचार करत आहेत. एखादा अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी लाखो रुपये घेत आहेत. या लाचखोरीचा परिणाम सर्व सामान्य जनतेच्या जीवनावर होत आहे. आपल्या या अभियानातून शेतकऱ्यांच्या खऱ्या परिस्थितीचा लेखाजोखा मांडू, असे ते म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी