शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ट्रकची चार वाहनांना धडक, एक ठार, हातखंबा येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 13:33 IST

accident, truck, car, ratnagirinews कोल्हापूर येथून रत्नागिरीत साखर घेऊन येणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने तीन दुचाकी आणि एका कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला़ तर १० जण जखमी झाले़. हा अपघात रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्याने मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे झाला़. अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

ठळक मुद्देट्रकची चार वाहनांना धडक, एक ठार, हातखंबा येथील घटन, १० जण जखमी

रत्नागिरी : कोल्हापूर येथून रत्नागिरीत साखर घेऊन येणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने तीन दुचाकी आणि एका कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला़ तर १० जण जखमी झाले़. हा अपघात रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्याने मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे झाला़. अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.या अपघातात ठार चालेल्या दुचाकी चालकाचे नांव सतीश कोंडीबा डांगरे (४०, रा. गणेशनगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) असे आहे. ट्रक चालक अजिजुल्लाह असेमोहम्मद (३६, रा. संत कबीरनगर, उत्तरप्रदेश) हा साखर घेऊन (एमएच०८-डब्ल्यू-३९४५) कोल्हापूर ते रत्नागिरी असा घेऊन येत होता. हातखंबा पुलावर गाडी आली असता ट्रकवरील ताबा सुटल्याने कोल्हापूर-गणपतीपुळे येथे निघालेल्या तीन दुचाकी आणि एका कारला एका पाठोपाठ एक धडक दिली.या अपघातात तिन्ही दुचाकींवर प्रत्येकी तीनजण बसून प्रवास करत होते. अपघातात मृत्यू झालेले सतीश डांगरे यांची पत्नी जयश्री डांगरे (३५), मुलगी ऋतुजा सतीश डांगरे (१५) हे प्रवास करत होते. तर अन्य एका दुचाकीवर दुचाकी चालक सोमनाथ कोंडिबा डांगरे (४२), अर्पिता सोमनाथ डांगरे (१५), शुभांगी डांगरे (४०), तर तिसऱ्या दुचाकीचा चालक श्रीशल राजू डांगरे (२१), शोभा राजू डांगरे (५१), प्रिया राजू डांगरे (२३) हे प्रवास करत होते.हातखंबा बाजारपेठेत भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला आणि ट्रकने मारूतीझेन कारला पाठीमागून ठोकर दिली. त्यात कारचालक प्रदीप बाळकृष्ण पटवर्धन (३४, रा. कासारवेली, रत्नागिरी) व त्यांचे वडील बाळकृष्ण पटवर्धन (७२) हे जखमी झाले़. त्यानंतर ट्रकने तीन दुचाकींना धडक देऊन अपघात केला. या अपघातात तीन दुचाकी, कार आणि त्या ट्रकचे नुकसान झाले़ अपघातानंतर सर्व जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हातखंबा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत केली.पर्यटनासाठी दुचाकीवरूनपर्यटनस्थळ खुली झाल्याने अनेकजण कोकणात दाखल होत आहेत. इचलकरंजी येथील डांगरे कुटुंबिय दुचाकीवरून गणपतीपुळे येथे चालले होते. मात्र, साखर घेऊन येणारा ट्रक त्यांच्यासाठी काळ बनून आला. या अपघातामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी