शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रत्नागिरी: जामगे-विसापुरातील 'आदिवासी बांधवांचा' मरणाच्या जागेसाठी संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 18:04 IST

प्रशासनाने स्मशानशेड बांधण्यास परवानगी दिली नाही तर आम्ही आता यापुढे कुणीही मयत झाले तर तहसील कार्यालयात मृतदेह नेणार आहोत, तेथे प्रेत जाळू असा आक्रमक पवित्रा आदिवासी बांधवांनी घेतला आहे.

दापोली : तालुक्यातील जामगे-विसापूर येथील आदिवासी कातकरी बांधवांना मरणाच्या जागेसाठी संघर्ष करावा लागत आहे. या गावातील चार वाडीतील लोकांना त्यांच्या पूर्वीच्या स्मशानभूमीच्या जागेवर अंत्यसंस्काराला जलसंधारण विभागाने मनाई केली आहे. त्यामुळे आदिवासी समाजासमाेर अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्मशान जागेजवळ पाण्यासाठी बोअरवेल खोदण्यास परवानगी देण्यात आली असून, स्मशानशेड बांधण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे स्मशानभूमीची शेड बांधण्यासाठी मंजूर झालेले अडीच लाख रुपयेही परत गेले आहेत.ग्रामपंचायत विसापूर कार्यक्षेत्रातील असणाऱ्या बेंद्रेवाडी, कातकरवाडी, नवानगर कातकरवाडी व जामगे हद्दीतील कातकरवाडी या चार वाड्यांसाठी जामगे - विसापूर लघुपाटबंधारे योजनेसाठी जागा संपादित केली आहे. या संपादित जागेच्या धरणाच्या खालील बाजूला शिल्लक जागेमध्ये स्मशानशेड बांधण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतु, सध्या धरणाचे काम प्रगतीपथावर असून, अद्याप सांडवा, प्रवेश व पुच्छ कालव्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. या धरणाच्या खालील बाजूस असलेल्या जागेमध्ये पुच्छ कालव्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे स्मशानशेड बांधण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.विसापूर येथील बबन बाबाजी बेंद्रे यांच्याबरोबर या कार्यालयाचे जलसंधारण अधिकारी यांच्यासमवेत दि. १६ नाेव्हेंबर २०२१ रोजी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार मौजे जामगे येथील गट क्रमांक २३४ ब मधील योजनेसाठी संपादित क्षेत्र ०-६३-०० हेक्टर आर. वगळून धरणाच्या खालील बाजूला शिल्लक राहिलेल्या जागेमध्ये क्षेत्र ०-३४-५० हेक्टर आर. स्मशानशेड बांधण्यासाठी ना हरकत दाखला देण्यात आला आहे, असे पत्र दापाेलीतील जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण उपविभागातर्फे विसापूर ग्रामपंचायतीला दिले आहे. त्यामुळे आता अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कार्यालयातच प्रेत जाळू

प्रशासनाने स्मशानशेड बांधण्यास परवानगी दिली नाही तर आम्ही आता यापुढे कुणीही मयत झाले तर तहसील कार्यालयात मृतदेह नेणार आहोत, तेथे प्रेत जाळणार आहोत. गावात धरण बांधू देणार नाही, अधिकाऱ्यांना दगड मारू, असा आक्रमक पवित्रा जामगे येथील आदिवासी बांधवांनी घेतला आहे. बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी स्वत: जामगे येथे जाऊन आदिवासी बांधवांची ही समस्या जाणून घेतली. ही समस्या प्रशासनाने सोडवली नाही तर बिरसा फायटर्स संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी