शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी: जामगे-विसापुरातील 'आदिवासी बांधवांचा' मरणाच्या जागेसाठी संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 18:04 IST

प्रशासनाने स्मशानशेड बांधण्यास परवानगी दिली नाही तर आम्ही आता यापुढे कुणीही मयत झाले तर तहसील कार्यालयात मृतदेह नेणार आहोत, तेथे प्रेत जाळू असा आक्रमक पवित्रा आदिवासी बांधवांनी घेतला आहे.

दापोली : तालुक्यातील जामगे-विसापूर येथील आदिवासी कातकरी बांधवांना मरणाच्या जागेसाठी संघर्ष करावा लागत आहे. या गावातील चार वाडीतील लोकांना त्यांच्या पूर्वीच्या स्मशानभूमीच्या जागेवर अंत्यसंस्काराला जलसंधारण विभागाने मनाई केली आहे. त्यामुळे आदिवासी समाजासमाेर अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्मशान जागेजवळ पाण्यासाठी बोअरवेल खोदण्यास परवानगी देण्यात आली असून, स्मशानशेड बांधण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे स्मशानभूमीची शेड बांधण्यासाठी मंजूर झालेले अडीच लाख रुपयेही परत गेले आहेत.ग्रामपंचायत विसापूर कार्यक्षेत्रातील असणाऱ्या बेंद्रेवाडी, कातकरवाडी, नवानगर कातकरवाडी व जामगे हद्दीतील कातकरवाडी या चार वाड्यांसाठी जामगे - विसापूर लघुपाटबंधारे योजनेसाठी जागा संपादित केली आहे. या संपादित जागेच्या धरणाच्या खालील बाजूला शिल्लक जागेमध्ये स्मशानशेड बांधण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतु, सध्या धरणाचे काम प्रगतीपथावर असून, अद्याप सांडवा, प्रवेश व पुच्छ कालव्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. या धरणाच्या खालील बाजूस असलेल्या जागेमध्ये पुच्छ कालव्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे स्मशानशेड बांधण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.विसापूर येथील बबन बाबाजी बेंद्रे यांच्याबरोबर या कार्यालयाचे जलसंधारण अधिकारी यांच्यासमवेत दि. १६ नाेव्हेंबर २०२१ रोजी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार मौजे जामगे येथील गट क्रमांक २३४ ब मधील योजनेसाठी संपादित क्षेत्र ०-६३-०० हेक्टर आर. वगळून धरणाच्या खालील बाजूला शिल्लक राहिलेल्या जागेमध्ये क्षेत्र ०-३४-५० हेक्टर आर. स्मशानशेड बांधण्यासाठी ना हरकत दाखला देण्यात आला आहे, असे पत्र दापाेलीतील जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण उपविभागातर्फे विसापूर ग्रामपंचायतीला दिले आहे. त्यामुळे आता अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कार्यालयातच प्रेत जाळू

प्रशासनाने स्मशानशेड बांधण्यास परवानगी दिली नाही तर आम्ही आता यापुढे कुणीही मयत झाले तर तहसील कार्यालयात मृतदेह नेणार आहोत, तेथे प्रेत जाळणार आहोत. गावात धरण बांधू देणार नाही, अधिकाऱ्यांना दगड मारू, असा आक्रमक पवित्रा जामगे येथील आदिवासी बांधवांनी घेतला आहे. बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी स्वत: जामगे येथे जाऊन आदिवासी बांधवांची ही समस्या जाणून घेतली. ही समस्या प्रशासनाने सोडवली नाही तर बिरसा फायटर्स संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी