शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

रत्नागिरी: जामगे-विसापुरातील 'आदिवासी बांधवांचा' मरणाच्या जागेसाठी संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 18:04 IST

प्रशासनाने स्मशानशेड बांधण्यास परवानगी दिली नाही तर आम्ही आता यापुढे कुणीही मयत झाले तर तहसील कार्यालयात मृतदेह नेणार आहोत, तेथे प्रेत जाळू असा आक्रमक पवित्रा आदिवासी बांधवांनी घेतला आहे.

दापोली : तालुक्यातील जामगे-विसापूर येथील आदिवासी कातकरी बांधवांना मरणाच्या जागेसाठी संघर्ष करावा लागत आहे. या गावातील चार वाडीतील लोकांना त्यांच्या पूर्वीच्या स्मशानभूमीच्या जागेवर अंत्यसंस्काराला जलसंधारण विभागाने मनाई केली आहे. त्यामुळे आदिवासी समाजासमाेर अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्मशान जागेजवळ पाण्यासाठी बोअरवेल खोदण्यास परवानगी देण्यात आली असून, स्मशानशेड बांधण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे स्मशानभूमीची शेड बांधण्यासाठी मंजूर झालेले अडीच लाख रुपयेही परत गेले आहेत.ग्रामपंचायत विसापूर कार्यक्षेत्रातील असणाऱ्या बेंद्रेवाडी, कातकरवाडी, नवानगर कातकरवाडी व जामगे हद्दीतील कातकरवाडी या चार वाड्यांसाठी जामगे - विसापूर लघुपाटबंधारे योजनेसाठी जागा संपादित केली आहे. या संपादित जागेच्या धरणाच्या खालील बाजूला शिल्लक जागेमध्ये स्मशानशेड बांधण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतु, सध्या धरणाचे काम प्रगतीपथावर असून, अद्याप सांडवा, प्रवेश व पुच्छ कालव्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. या धरणाच्या खालील बाजूस असलेल्या जागेमध्ये पुच्छ कालव्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे स्मशानशेड बांधण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.विसापूर येथील बबन बाबाजी बेंद्रे यांच्याबरोबर या कार्यालयाचे जलसंधारण अधिकारी यांच्यासमवेत दि. १६ नाेव्हेंबर २०२१ रोजी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार मौजे जामगे येथील गट क्रमांक २३४ ब मधील योजनेसाठी संपादित क्षेत्र ०-६३-०० हेक्टर आर. वगळून धरणाच्या खालील बाजूला शिल्लक राहिलेल्या जागेमध्ये क्षेत्र ०-३४-५० हेक्टर आर. स्मशानशेड बांधण्यासाठी ना हरकत दाखला देण्यात आला आहे, असे पत्र दापाेलीतील जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण उपविभागातर्फे विसापूर ग्रामपंचायतीला दिले आहे. त्यामुळे आता अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कार्यालयातच प्रेत जाळू

प्रशासनाने स्मशानशेड बांधण्यास परवानगी दिली नाही तर आम्ही आता यापुढे कुणीही मयत झाले तर तहसील कार्यालयात मृतदेह नेणार आहोत, तेथे प्रेत जाळणार आहोत. गावात धरण बांधू देणार नाही, अधिकाऱ्यांना दगड मारू, असा आक्रमक पवित्रा जामगे येथील आदिवासी बांधवांनी घेतला आहे. बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी स्वत: जामगे येथे जाऊन आदिवासी बांधवांची ही समस्या जाणून घेतली. ही समस्या प्रशासनाने सोडवली नाही तर बिरसा फायटर्स संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी