शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सुब्रमण्यम् सुबू याची कन्याकुमारी ते काश्मीर भारतभर भ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 16:13 IST

एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या महाव्यवस्थापन पदावर कार्यरत असलेला एक अवलिया वाहतूक सुरक्षा व अपघात सुरक्षेचा संकल्प घेत कन्याकुमारी ते काश्मीर असा संपूर्ण भारतभर भ्रमण करीत आहे तो ही चक्क चालत. या त्याच्या संकल्पपूर्तीसाठी त्याने ३६०० किलोमीटरचे अंतर चालायला सुरुवात केली आहे, त्याचे नाव आहे सुब्रमण्यम नारायणन सुबू.

ठळक मुद्देसुब्रमण्यम् सुबू याची कन्याकुमारी ते काश्मीर भारतभर भ्रमणवाहतूक सुरक्षेसाठी त्याचा पायी प्रवास, वॉक डोनेशन संकल्प

आनंद त्रिपाठीवाटूळ : एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या महाव्यवस्थापन पदावर कार्यरत असलेला एक अवलिया वाहतूक सुरक्षा व अपघात सुरक्षेचा संकल्प घेत कन्याकुमारी ते काश्मीर असा संपूर्ण भारतभर भ्रमण करीत आहे तो ही चक्क चालत. या त्याच्या संकल्पपूर्तीसाठी त्याने ३६०० किलोमीटरचे अंतर चालायला सुरुवात केली आहे, त्याचे नाव आहे सुब्रमण्यम नारायणन सुबू.सुब्रमण्यम हे ५० वर्षीय उच्चशिक्षीत गृहस्थ तरुणांनाही लाजवेल या उत्साहात २८ जुलैपासून पायी चालत आता रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर राजापूर येथे दाखल झाले आहेत. कन्याकुमारीहून २८ जुलै रोजी त्यांचा पायी प्रवास सुरु झाला असून, काश्मिरपर्यंत जवळजवळ ३६०० किलोमीटरचे अंतर ६० दिवसात पूर्ण करण्याचा त्यांचा इरादा आहे.हेल्ला या बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदावर कार्यरत असलेल्या सुब्रमण्यम यांना त्यांच्याच कंपनीने या अभिनव संकल्पासाठी आर्थिक मदत केली असून, एक प्रशस्त कार व आपल्या दहा सहकाऱ्यांसमवेत सुब्रमण्यम यांनी हा प्रवास सुरु केला आहे.कन्याकुमारी ते काश्मीर हे संपूर्ण अंतर फक्त एकटे सुब्रमण्यमच चालणार आहेत. आपल्या देशातील रस्त्यांची अवस्था, सतत होणारे अपघात व वाहतूक सुरक्षा यांच्या जनजागृतीसाठी आपली ही मोहीम असून, भारतात दररोज ४०० लोक रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडत आहेत. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठीच आपण ही मोहीम सुरु केल्याचे सुब्रमण्यम यांनी सांगितले.चांगले रस्ते कर्नाटकातच!आतापर्यंत आपणाला सगळ्यात चांगले रस्ते फक्त कर्नाटकमध्येच मिळाले. तिकडे रस्त्यांवर वाहनांची गर्दीही कमी प्रमाणात दिसते, असेही सुब्रमण्यम म्हणाले. त्यांच्या या मोहिमेला अनेक ह्यएन.जी.ओ.ह्णचा पाठिंबा असून, शासनानेदेखील या संकल्पनेचे स्वागत केले आहे. दररोज पहाटे ३ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते ७ असे १२ तासात ६० ते ६५ किलोमीटर अंतर ते चालतात.पाऊल डोनेट कराआम्हाला या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्वसामान्य नागरिकांकडून डोनेशन हवे आहे. परंतु, ते डोनेशन पैसे नको तर स्टेप (पाऊल) हवे आहे. त्यासाठी गुगलवरुन वन करोड स्टेप.कॉम हे अ‍ॅप घ्या व दररोज १०० ते २०० स्टेप चाला व ते आम्हाला डोनेट करा, असे आवाहन ते करतात. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRatnagiriरत्नागिरीTrafficवाहतूक कोंडी