शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुब्रमण्यम् सुबू याची कन्याकुमारी ते काश्मीर भारतभर भ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 16:13 IST

एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या महाव्यवस्थापन पदावर कार्यरत असलेला एक अवलिया वाहतूक सुरक्षा व अपघात सुरक्षेचा संकल्प घेत कन्याकुमारी ते काश्मीर असा संपूर्ण भारतभर भ्रमण करीत आहे तो ही चक्क चालत. या त्याच्या संकल्पपूर्तीसाठी त्याने ३६०० किलोमीटरचे अंतर चालायला सुरुवात केली आहे, त्याचे नाव आहे सुब्रमण्यम नारायणन सुबू.

ठळक मुद्देसुब्रमण्यम् सुबू याची कन्याकुमारी ते काश्मीर भारतभर भ्रमणवाहतूक सुरक्षेसाठी त्याचा पायी प्रवास, वॉक डोनेशन संकल्प

आनंद त्रिपाठीवाटूळ : एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या महाव्यवस्थापन पदावर कार्यरत असलेला एक अवलिया वाहतूक सुरक्षा व अपघात सुरक्षेचा संकल्प घेत कन्याकुमारी ते काश्मीर असा संपूर्ण भारतभर भ्रमण करीत आहे तो ही चक्क चालत. या त्याच्या संकल्पपूर्तीसाठी त्याने ३६०० किलोमीटरचे अंतर चालायला सुरुवात केली आहे, त्याचे नाव आहे सुब्रमण्यम नारायणन सुबू.सुब्रमण्यम हे ५० वर्षीय उच्चशिक्षीत गृहस्थ तरुणांनाही लाजवेल या उत्साहात २८ जुलैपासून पायी चालत आता रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर राजापूर येथे दाखल झाले आहेत. कन्याकुमारीहून २८ जुलै रोजी त्यांचा पायी प्रवास सुरु झाला असून, काश्मिरपर्यंत जवळजवळ ३६०० किलोमीटरचे अंतर ६० दिवसात पूर्ण करण्याचा त्यांचा इरादा आहे.हेल्ला या बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदावर कार्यरत असलेल्या सुब्रमण्यम यांना त्यांच्याच कंपनीने या अभिनव संकल्पासाठी आर्थिक मदत केली असून, एक प्रशस्त कार व आपल्या दहा सहकाऱ्यांसमवेत सुब्रमण्यम यांनी हा प्रवास सुरु केला आहे.कन्याकुमारी ते काश्मीर हे संपूर्ण अंतर फक्त एकटे सुब्रमण्यमच चालणार आहेत. आपल्या देशातील रस्त्यांची अवस्था, सतत होणारे अपघात व वाहतूक सुरक्षा यांच्या जनजागृतीसाठी आपली ही मोहीम असून, भारतात दररोज ४०० लोक रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडत आहेत. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठीच आपण ही मोहीम सुरु केल्याचे सुब्रमण्यम यांनी सांगितले.चांगले रस्ते कर्नाटकातच!आतापर्यंत आपणाला सगळ्यात चांगले रस्ते फक्त कर्नाटकमध्येच मिळाले. तिकडे रस्त्यांवर वाहनांची गर्दीही कमी प्रमाणात दिसते, असेही सुब्रमण्यम म्हणाले. त्यांच्या या मोहिमेला अनेक ह्यएन.जी.ओ.ह्णचा पाठिंबा असून, शासनानेदेखील या संकल्पनेचे स्वागत केले आहे. दररोज पहाटे ३ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते ७ असे १२ तासात ६० ते ६५ किलोमीटर अंतर ते चालतात.पाऊल डोनेट कराआम्हाला या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्वसामान्य नागरिकांकडून डोनेशन हवे आहे. परंतु, ते डोनेशन पैसे नको तर स्टेप (पाऊल) हवे आहे. त्यासाठी गुगलवरुन वन करोड स्टेप.कॉम हे अ‍ॅप घ्या व दररोज १०० ते २०० स्टेप चाला व ते आम्हाला डोनेट करा, असे आवाहन ते करतात. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRatnagiriरत्नागिरीTrafficवाहतूक कोंडी