शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ; नाइलाजास्तव निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे गेले दीड वर्ष अन्य व्यवसायांप्रमाणे ट्रॅव्हल्स व्यवसायावर परिणाम झाला आहे. शासनाच्या परवानगीने व्यवसाय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे गेले दीड वर्ष अन्य व्यवसायांप्रमाणे ट्रॅव्हल्स व्यवसायावर परिणाम झाला आहे. शासनाच्या परवानगीने व्यवसाय सुरू असला तरी कोरोनामुळे प्रवासी भारमान कमी आहे. गणेशोत्सवातील मोजक्याच दिवसात व्यवसाय होतो, अन्यथा उर्वरित दिवसात तुटपुंज्या उत्पन्नावरच भागवावे लागते. त्यामुळे सध्या ट्रॅव्हल्सची हंगामी दरवाढ झाली आहे.

रत्नागिरीतून मुंबई व पुणे मार्गावर ट्रॅव्हल्स गाड्या सुरू असून, निकृष्ट रस्ते व त्यामुळे देखभाल-दुरुस्ती खर्चातील झालेली वाढ. शिवाय, येताना प्रवासी भारमान नसल्यामुळे माेजक्या प्रवाशांनाच घेऊन यावे लागते. काहीवेळा तर गाडी रद्द करण्याची वेळ येते. निकृष्ट रस्त्यामुळे टायर खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. इंधन दरातील वाढीमुळे खर्चात वाढ होत असल्याने गर्दीच्या काळात तिकीट दर वाढविण्यात येतात. याहीवेळी दरात चारशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. नाइलाजास्तव ही दरवाढ करावी लागत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

मुंबई, पुणे मार्गावर धावतात गाड्या

रत्नागिरी - बोरिवली

रत्नागिरी - दादर

रत्नागिरी - पुणे

रत्नागिरी - पुणे (पिंपरी-चिंचवड)

भाडे वाढले

रत्नागिरी १००० /१२००

बोरिवली

रत्नागिरी ८०० ते ९००

पुणे

निकृष्ट रस्त्यामुळे टायर खराब होण्याच्या प्रमाणात वाढ

इंधन दरातील वाढीमुळे खर्चात वाढ

कोरोनापासून आर्थिक संकटाचा करावा लागतोय सामना

मोजक्या दिवसांच्या व्यवसायामुळे तूट भरून काढणे अशक्य

उत्सवासाठी एखादा दिवस तरी घरी यावे लागते. सुटी मिळत नसल्याने वेळेवर कामावर हजर रहावे लागते. रेल्वे व बस फुल्ल असल्याने ट्रॅव्हल्सचा पर्याय योग्य ठरत असला तरी तिकीट मात्र दामदुप्पट आकारले जाते. नाइलाज म्हणून तिकीट घ्यावे लागले तरी खिशाला कात्री आमच्याच बसते. तिकीट दर निश्चित असणे गरजेचे आहे.

- जयेश सुतार, जयगड, ता. रत्नागिरी

खर्चातही वाढ

कोरोनामुळे दीड वर्षात आर्थिक संकट झेलावे लागत आहे. उन्हाळी हंगामात कोरोनामुळे गाड्या बंद ठेवाव्या लागत आहेत. गणेशोत्सवातही मोजक्याच दिवसांचा व्यवसाय होतो. रस्ते निकृष्ट असल्यामुळे देखभाल दुरुस्ती खर्च, इंधन दरात वाढ, इन्शुरन्स, चालक वेतन आदी सर्व खर्च जाऊन मिळणारे उत्पन्न कमी आहे. शिवाय, येताना प्रवासी नसल्यामुळे अनेकवेळा रिकामेच यावे लागते. नाइलाजाने तिकीट दरात वाढ करावी लागते.

- बाबू चव्हाण, व्यावसायिक, रत्नागिरी

कोरोनामुळे शासन निर्णयानुसार वाहतूक बंद ठेवावी लागते. त्या काळात वाहनांची देखभाल दुरुस्ती, चालक वेतन हा खर्च भागवावाच लागतो. वाहनांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते सुद्धा निघत नाहीत. मोजक्या दिवसांचा व्यवसाय असतो. तिकीट दरात वाढ झाली की, प्रवाशातून ओरड होते. त्यामुळे मध्यवर्ती निर्णय घ्यावा लागतो. गाडी भरलेली असो वा रिकामी खर्च तेवढाच येतो. जीएसटी भरावाच लागतो. त्यामुळे प्रवाशांचे सहकार्य आवश्यक आहे.

- संदेश निकम, व्यावसायिक, रत्नागिरी

नाइलाजाने ट्रॅव्हल्सचा पर्याय

गणेशोत्सवासाठी गावी यावेच लागते. परंतु सुटीनंतर कामावर वेळेवर पोहोचावे लागते. रेल्वे, बसचे तिकीट मिळत नसल्याने अखेर ट्रॅव्हल्सचा पर्याय अवलंबावा लागतो. वास्तविक कोरोना संकटाचा सामना आम्हीही करीत आहोत. त्यामुळे तिकीट दर वाढविणे अयोग्य आहे. कुठेतरी नियंत्रणाची आवश्यकता आहे.

- शुभम शिंदे, गोळप, रत्नागिरी