शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
3
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
4
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
5
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
6
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
7
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
8
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
9
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
10
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
11
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
12
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
13
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
14
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
15
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
16
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
17
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
18
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
19
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
20
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ; नाइलाजास्तव निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे गेले दीड वर्ष अन्य व्यवसायांप्रमाणे ट्रॅव्हल्स व्यवसायावर परिणाम झाला आहे. शासनाच्या परवानगीने व्यवसाय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे गेले दीड वर्ष अन्य व्यवसायांप्रमाणे ट्रॅव्हल्स व्यवसायावर परिणाम झाला आहे. शासनाच्या परवानगीने व्यवसाय सुरू असला तरी कोरोनामुळे प्रवासी भारमान कमी आहे. गणेशोत्सवातील मोजक्याच दिवसात व्यवसाय होतो, अन्यथा उर्वरित दिवसात तुटपुंज्या उत्पन्नावरच भागवावे लागते. त्यामुळे सध्या ट्रॅव्हल्सची हंगामी दरवाढ झाली आहे.

रत्नागिरीतून मुंबई व पुणे मार्गावर ट्रॅव्हल्स गाड्या सुरू असून, निकृष्ट रस्ते व त्यामुळे देखभाल-दुरुस्ती खर्चातील झालेली वाढ. शिवाय, येताना प्रवासी भारमान नसल्यामुळे माेजक्या प्रवाशांनाच घेऊन यावे लागते. काहीवेळा तर गाडी रद्द करण्याची वेळ येते. निकृष्ट रस्त्यामुळे टायर खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. इंधन दरातील वाढीमुळे खर्चात वाढ होत असल्याने गर्दीच्या काळात तिकीट दर वाढविण्यात येतात. याहीवेळी दरात चारशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. नाइलाजास्तव ही दरवाढ करावी लागत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

मुंबई, पुणे मार्गावर धावतात गाड्या

रत्नागिरी - बोरिवली

रत्नागिरी - दादर

रत्नागिरी - पुणे

रत्नागिरी - पुणे (पिंपरी-चिंचवड)

भाडे वाढले

रत्नागिरी १००० /१२००

बोरिवली

रत्नागिरी ८०० ते ९००

पुणे

निकृष्ट रस्त्यामुळे टायर खराब होण्याच्या प्रमाणात वाढ

इंधन दरातील वाढीमुळे खर्चात वाढ

कोरोनापासून आर्थिक संकटाचा करावा लागतोय सामना

मोजक्या दिवसांच्या व्यवसायामुळे तूट भरून काढणे अशक्य

उत्सवासाठी एखादा दिवस तरी घरी यावे लागते. सुटी मिळत नसल्याने वेळेवर कामावर हजर रहावे लागते. रेल्वे व बस फुल्ल असल्याने ट्रॅव्हल्सचा पर्याय योग्य ठरत असला तरी तिकीट मात्र दामदुप्पट आकारले जाते. नाइलाज म्हणून तिकीट घ्यावे लागले तरी खिशाला कात्री आमच्याच बसते. तिकीट दर निश्चित असणे गरजेचे आहे.

- जयेश सुतार, जयगड, ता. रत्नागिरी

खर्चातही वाढ

कोरोनामुळे दीड वर्षात आर्थिक संकट झेलावे लागत आहे. उन्हाळी हंगामात कोरोनामुळे गाड्या बंद ठेवाव्या लागत आहेत. गणेशोत्सवातही मोजक्याच दिवसांचा व्यवसाय होतो. रस्ते निकृष्ट असल्यामुळे देखभाल दुरुस्ती खर्च, इंधन दरात वाढ, इन्शुरन्स, चालक वेतन आदी सर्व खर्च जाऊन मिळणारे उत्पन्न कमी आहे. शिवाय, येताना प्रवासी नसल्यामुळे अनेकवेळा रिकामेच यावे लागते. नाइलाजाने तिकीट दरात वाढ करावी लागते.

- बाबू चव्हाण, व्यावसायिक, रत्नागिरी

कोरोनामुळे शासन निर्णयानुसार वाहतूक बंद ठेवावी लागते. त्या काळात वाहनांची देखभाल दुरुस्ती, चालक वेतन हा खर्च भागवावाच लागतो. वाहनांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते सुद्धा निघत नाहीत. मोजक्या दिवसांचा व्यवसाय असतो. तिकीट दरात वाढ झाली की, प्रवाशातून ओरड होते. त्यामुळे मध्यवर्ती निर्णय घ्यावा लागतो. गाडी भरलेली असो वा रिकामी खर्च तेवढाच येतो. जीएसटी भरावाच लागतो. त्यामुळे प्रवाशांचे सहकार्य आवश्यक आहे.

- संदेश निकम, व्यावसायिक, रत्नागिरी

नाइलाजाने ट्रॅव्हल्सचा पर्याय

गणेशोत्सवासाठी गावी यावेच लागते. परंतु सुटीनंतर कामावर वेळेवर पोहोचावे लागते. रेल्वे, बसचे तिकीट मिळत नसल्याने अखेर ट्रॅव्हल्सचा पर्याय अवलंबावा लागतो. वास्तविक कोरोना संकटाचा सामना आम्हीही करीत आहोत. त्यामुळे तिकीट दर वाढविणे अयोग्य आहे. कुठेतरी नियंत्रणाची आवश्यकता आहे.

- शुभम शिंदे, गोळप, रत्नागिरी